शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

आमचे हात बांधलेले नाहीत, व्हिएतनामला मिसाइल देण्यावर चीनची प्रतिक्रिया

By admin | Updated: January 11, 2017 20:33 IST

भारत आणि व्हिएतनाममध्ये संबंध सुधारत असल्याचे पाहून चीननं आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 11 - भारत आणि व्हिएतनाममध्ये संबंध सुधारत असल्याचे पाहून चीननं आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. भारत चीनचा सामना करण्यासाठी व्हिएतनामसोबत लष्करी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सीमा सुरक्षा क्षेत्रात अस्थिर वातावरण निर्माण होईल. तसेच आमचे हात काही बांधलेले नाहीत, असं चीनने भारताला ठणकावलं आहे. भारतानं व्हिएतनामला हवेत मारा करणारे आकाश मिसाइल विकण्याच्या वृत्तानंतर चीनचं पित्त खवळलं आहे.भारत सरकार चीनच्या विरोधात राजकीय करारांवर शत्रुत्वाची भावना ठेवत असल्यामुळेच व्हिएतनामशी लष्करी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे दोन्ही देशांमधील वातावरणात तणाव निर्माण होईल. चीनही हातावर हात ठेवून बसणार नाही, असा इशारा चीननं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये छापून आलेल्या एका लेखातून दिला आहे. चीनच्या ग्लोबल टाइम्सच्या मते, भारताला एनएसजी सदस्य बनण्यापासून रोखण्यासोबत जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यापासून रोखल्यामुळे भारत या रणनीतीचा वापर करत आहे. भारताला महासत्ता व्हायचं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला असलेला विरोध पाहता ते स्वप्न प्रत्यक्षात उतरणं कठीण आहे. भारताला दुस-या देशांशी व्यावहारिक संबंध वाढवण्याची गरज असल्याचं मत ग्लोबल टाइम्समधून मांडण्यात आलं आहे. चीन आणि भारतानं एकत्र काम केलं पाहिजे, असाही सल्ला लेखात देण्यात आला आहे.

(चीनला ठेचण्यासाठी भारत व्हिएतनामला देणार मिसाईल)(चीन पाकिस्तानला लागून असलेली सीमा करणार बंद)विशेष म्हणजे व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तायवानसारख्या देशांचा दक्षिण चिनी समुद्राच्या चीनच्या दाव्यावरून वाद आहे. चीन व्हिएतनाममधल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ व्हिएतनामला आमिष दाखवून फूस लावण्याचाही प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.