शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘...तरच भारताशी चर्चा’

By admin | Updated: September 1, 2015 00:25 IST

द्विपक्षीय संबंधांतील सर्व मुद्दे जोपर्यंत विषयपत्रिकेवर घेतले जात नाहीत तोपर्यंत आपण भारताशी चर्चा करणार नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

इस्लामाबाद : द्विपक्षीय संबंधांतील सर्व मुद्दे जोपर्यंत विषयपत्रिकेवर घेतले जात नाहीत तोपर्यंत आपण भारताशी चर्चा करणार नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी म्हटले की, सीमेवर तणाव असतानाही रेंजर्सचे महासंचालक व सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांत पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. मात्र, जोपर्यंत सर्व द्विपक्षीय मुद्दे विषयपत्रिकेत घेतले जात नाहीत तोपर्यंत पाकिस्तान भारताशी चर्चा सुरू करणार नाही. सर्व मुद्दे विषयपत्रिकेवर घेतल्याशिवाय पाक भारतासोबत पुन्हा चर्चा सुरू करणार नाही, असे रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तात म्हटले आहे. एका खासगी टी. व्ही. चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अझीज म्हणाले की, भारताने पूर्वअटी घातल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चा होऊ शकली नाही. ही चर्चा गेल्या आठवड्यात राजधानी नवी दिल्लीत होणार होती. सीमा आणि नियंत्रण रेषेवरील तणाव टिपेला गेल्याच्या पार्श्वभूमीवर अझीज यांनी ही भूमिका मांडली आहे. काश्मिरी फुटीरवाद्यांशी सल्लामसलतीची मुभा देण्यास भारताने नकार दिल्यानंतर पाकने गेल्या आठवड्यात अखेरच्या क्षणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चा रद्द केली होती. मुख्यत्वे दहशतवादाच्या मुद्यावर चर्चेसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चर्चेच्या विषयपत्रिकेत काश्मीरचा विषय घुसडवल्याने भारतही नाराज होता. भारत, पाकिस्तानी पंतप्रधानांच्या रशियातील चर्चेदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा स्तरावरील चर्चा घेण्याचा निर्णय झाला होता. (वृत्तसंस्था)