शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

‘...तरच भारताशी चर्चा’

By admin | Updated: September 1, 2015 00:25 IST

द्विपक्षीय संबंधांतील सर्व मुद्दे जोपर्यंत विषयपत्रिकेवर घेतले जात नाहीत तोपर्यंत आपण भारताशी चर्चा करणार नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

इस्लामाबाद : द्विपक्षीय संबंधांतील सर्व मुद्दे जोपर्यंत विषयपत्रिकेवर घेतले जात नाहीत तोपर्यंत आपण भारताशी चर्चा करणार नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी म्हटले की, सीमेवर तणाव असतानाही रेंजर्सचे महासंचालक व सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांत पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. मात्र, जोपर्यंत सर्व द्विपक्षीय मुद्दे विषयपत्रिकेत घेतले जात नाहीत तोपर्यंत पाकिस्तान भारताशी चर्चा सुरू करणार नाही. सर्व मुद्दे विषयपत्रिकेवर घेतल्याशिवाय पाक भारतासोबत पुन्हा चर्चा सुरू करणार नाही, असे रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तात म्हटले आहे. एका खासगी टी. व्ही. चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अझीज म्हणाले की, भारताने पूर्वअटी घातल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चा होऊ शकली नाही. ही चर्चा गेल्या आठवड्यात राजधानी नवी दिल्लीत होणार होती. सीमा आणि नियंत्रण रेषेवरील तणाव टिपेला गेल्याच्या पार्श्वभूमीवर अझीज यांनी ही भूमिका मांडली आहे. काश्मिरी फुटीरवाद्यांशी सल्लामसलतीची मुभा देण्यास भारताने नकार दिल्यानंतर पाकने गेल्या आठवड्यात अखेरच्या क्षणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चा रद्द केली होती. मुख्यत्वे दहशतवादाच्या मुद्यावर चर्चेसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चर्चेच्या विषयपत्रिकेत काश्मीरचा विषय घुसडवल्याने भारतही नाराज होता. भारत, पाकिस्तानी पंतप्रधानांच्या रशियातील चर्चेदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा स्तरावरील चर्चा घेण्याचा निर्णय झाला होता. (वृत्तसंस्था)