शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

बांगलादेशातलं ‘वन किडनी व्हिलेज’! आयुष्य बदलेल म्हणालेले... पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 07:25 IST

साधारणपणे दर ३५ लोकांमागे एका व्यक्तीला फक्त एकच किडनी आहे. अर्थातच एकच निसर्गदत्त किडनी घेऊन ते जन्माला आलेले नाहीत...

बांगलादेशच्या जॉयपूरहाट जिल्ह्यातील बाइगुनी हे एक छोटंसं गाव. हे गाव सध्या ‘वन किडनी व्हिलेज’ म्हणून प्रसिद्ध आहे. का? कारण या गावातील अनेक लोकांना एकच किडनी आहे. हे प्रमाण किती असावं? साधारणपणे दर ३५ लोकांमागे एका व्यक्तीला फक्त एकच किडनी आहे. अर्थातच एकच निसर्गदत्त किडनी घेऊन ते जन्माला आलेले नाहीत, तर त्यांनी आपली एक किडनी विकली आहे किंवा फसवणूक करून त्यांची एक किडनी काढली गेली आहे! यामागे आहे पैशांची अगतिकता, गरिबी, दारिद्र्य आणि तस्करांचं भलंमोठं रॅकेट! 

४५ वर्षीय सफिरुद्दीन हा याच गावचा रहिवासी. गेल्यावर्षी अडीच लाख रुपयांना आपली एक किडनी त्याने विकली. बायकोच्या आजारपणासाठी त्याला पैसे हवे होते. आपल्या तीन मुलांसाठी घर बनवायचं होतं. किडनी विकल्यावर सगळं काही सुरळीत होईल असं त्याला वाटलं होतं; पण त्याच्या बायकोची प्रकृती अजूनही तोळामासाच आहे. बांधायला घेतलेलं घर अजून अर्धवटच आहे आणि स्वत: सफिरुद्दीन मात्र आजारपणाशी झुंजतो आहे. काम करण्यासाठी त्याच्यात ताकदच राहिलेली नाही. 

सफिरुद्दीन म्हणतो, दलालानं मला सांगितलं होतं, सगळं काही अतिशय सोपं आहे. एक किडनी काढली म्हणून आयुष्यात काहीही फरक पडत नाही; पण त्यामुळे तुझं आयुष्य एकदम बदलून जाईल; पण तसं काहीच झालं नाही. उलट ऑपरेशननंतर माझा पासपोर्ट, औषधांची प्रिस्क्रिप्शन्स इतकंच काय, माझी सारी औषधंही गायब झाली! 

याच गावची विधवा जोशना बेगम. पती वारल्यानंतर तिनं बेलालशी दुसरं लग्न केलं. २०१९ मध्ये तिनं आपली एक किडनी विकली. त्यावेळी या किडनीसाठी तिला सात लाख बांगलादेशी टका दिले जातील असं सांगितलं होतं; पण मिळाले फक्त तीन लाख टका. पैसे मिळाल्यानंतर तिचा दुसरा नवराही तिला सोडून निघून गेला. दलालानं तर तिला तिचा पासपोर्टही परत दिला नाही. जोशना म्हणते, माझ्याकडे आता औषधांसाठीही पैसे नाहीत. माझ्याच्यानं फारसं कामही होत नाही.

मोहम्मद सजल हा आणखी एक तरुण. २०२२ मध्ये त्यानं आठ लाख रुपयांना आपली किडनी विकली; पण आश्वासन दिल्याप्रमाणे आठ लाख रुपये त्याला मिळाले नाहीत, तेव्हा तो स्वत: ‘दलाल’ बनला आणि इतर बांगलादेशींसाठी दलाल म्हणून काम करू लागला! गावातल्या बहुसंख्य लोकांची हीच कहाणी. किडनी विकण्यापूर्वी दलालांकडून त्यांना भरमसाठ आश्वासनं दिली जातात, आता तुम्ही श्रीमंत व्हाल, तुमच्या सर्व अडचणी दूर होतील; पण आजपर्यंत एकाही व्यक्तीला हा अनुभव आलेला नाही. ज्यांनी आपल्या किडन्या विकल्या, त्यात तिशीच्या वयोगटातले बहुसंख्य पुरुष आहेत. 

बनावट ओळखपत्रे, नोटरी केलेली बनावट प्रमाणपत्रं, इतकंच काय, अगदी बनावट डीएनए अहवालही तयार केले जातात. त्यामुळे ज्या रुग्णालयांत या किडन्या काढल्या जातात, त्यांना संशय येत नाही किंवा बऱ्याचदा तेही जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करतात. गरजू रुग्णाला साधारणपणे १८ ते २२ लाखांना किडनी विकली जाते; पण विकणाऱ्याची मात्र केवळ अडीच ते चार लाख रुपयांत बोळवण केली जाते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यातल्या बहुसंख्य लोकांचं म्हणणं आहे, किडनी विकण्यासाठी मुख्यत्वे आम्ही भारतात येतो!

टॅग्स :Bangladeshबांगलादेश