शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

काहीही चुकीचे केले नाही

By admin | Updated: June 16, 2017 03:34 IST

मी आणि माझ्या कुटुंबीयांनी काहीही चुकीचे केले नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी सांगितले. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या

इस्लामाबाद : मी आणि माझ्या कुटुंबीयांनी काहीही चुकीचे केले नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी सांगितले. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारविरुद्ध षड्यंत्र रचल्याबद्दल त्यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांवर हल्ला केला. पनामा गेट घोटाळ्याच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या संयुक्त तपास पथकासमोर (जेआयटी) शरीफ आज हजर झाले. जेआयटी पनामा पेपरफुटीतून समोर आलेल्या शरीफ कुटुंबीयांच्या भ्रष्टाचाराचा तपास करीत आहे. पंतप्रधान असताना अशा तपास पथकासमोर हजर होणारे शरीफ हे पहिले पंतप्रधान आहेत. या आरोपांचा आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाशी संबंध नाही, तसेच ते भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. हे आरोप कुटुंबाच्या व्यवसायावरून मी आणि माझ्या कुटुंबावर करण्यात आलेले वैयक्तिक पातळीवरचे आरोप आहेत, असे शरीफ म्हणाले. तत्पूर्वी सहा सदस्यीय जेआयटीने शरीफ यांची जवळपास तीन तास चौकशी केली. माजी मुख्यमंत्री आणि आता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ झालो असताना मी अब्जावधी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले. तथापि, माझे विरोधक माझ्यावर गैरप्रकारांचे आरोप करू शकत नाहीत. मी व माझ्या कुटुंबीयांचा चौकशीद्वारे नेहमीच असा छळ करण्यात येतो. मात्र, आजपर्यंत भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)चौकशीचा निष्कर्षही वेगळा नसेल- माझ्या विरोधकांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तथापि, यापूर्वी किंवा आताही यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही. - काही घटक मी आणि लोकशाहीविरुद्ध कट रचत असून, त्यामुळे देशाची हानी होणार आहे. आमच्या राजकीय विरोधकांची सर्व कारस्थाने अयशस्वी होतील, असेही ते म्हणाले.- मी किंवा माझ्या कुटुंबीयांनी काहीही चुकीचे केले नसल्यामुळे सध्याच्या चौकशीचा निष्कर्षही वेगळा नसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.