शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रक्तातच अहिंसा -नरेंद्र मोदी

By admin | Updated: September 3, 2014 01:54 IST

कोणतेही आंतरराष्ट्रीय करार किंवा प्रक्रियांच्या पलीकडील आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.

टोकियो : शांतता आणि अहिंसेशी भारताची बांधिलकी ही भारतीय समाजाच्या रक्तातच रुजलेली असून ती कोणतेही आंतरराष्ट्रीय करार किंवा प्रक्रियांच्या पलीकडील आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
अण्वस्त्रे प्रसारबंदी करारावर (एनपीटी) भारत स्वाक्षरी करीत नसल्याबद्दल जगात जी चिंता व्यक्त केली जाते त्या पाश्र्वभूमीवर मोदी सेक्रेड हार्ट युनिव्हर्सिटीत विद्याथ्र्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. मोदी म्हणाले,‘‘भारत ही भगवान गौतम बुद्धांची भूमी असून त्यांनी त्यांचे सगळे आयुष्य शांततेसाठी ङिाजविले. शांततेसाठी त्यांनी त्रस भोगला आणि त्यांचा तो संदेश भारतभर पसरलेला आहे.’’
भारताकडे अण्वस्त्रे असताना त्याने अण्वस्त्रे प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. या परिस्थितीत भारत आपली भूमिका न बदलता आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:बद्दल विश्वास कसा वृद्धिंगत करणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. मोदी यांनी भारताने ब्रिटिशांविरुद्धचा स्वातंत्र्य लढा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण समाजाची अहिंसेशी बांधिलकी राखत कसा लढला व त्याने जग कसे आश्चर्यचकित झाले, याचा दाखला दिला. भारताची अहिंसेशी पूर्ण बांधिलकी असल्याचे मोदी यांनी ठामपणो सांगितले. अण्वस्त्रे प्रसारबंदी करार हा दोषपूर्ण असल्याचे सांगून भारताने त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिलेला आहे. (वृत्तसंस्था)
 
चीनवरील मोदींच्या अप्रत्यक्ष टीकेमुळे चीनला राग
च्बीजिंग/टोक्यो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या दौ:यात काही देशांच्या विस्तारवादी प्रवृत्तीच्या केलेल्या उल्लेखामुळे चीनच्या अधिकृत प्रसारमाध्यमात राग व्यक्त होत आहे. ‘भारतीय नेते (मोदी) हे जास्तच भावनिकदृष्टय़ा जपानच्या जवळ आहेत’ असे भाष्य करण्यात आले आहे. 
 
च्मंगळवारी मोदी यासंदर्भातील प्रश्नापासून दूर राहिले. या उलट जपानच्या वृत्तपत्रने सोमवारी जपानचे पंतप्रधान शिंझो अबे व नरेंद्र मोदी यांच्यातील अनिर्णीत राहिलेल्या शिखर परिषदेत चीनचा मोठा अडथळा होता, अशी उघड भावना व्यक्त केली.
 
च्मोदी यांनी सोमवारी काही राष्ट्रांच्या विस्तारवादी प्रवृत्तीबद्दल केलेल्या टीकेवर चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. चीनचा पूर्व चिनी समुद्रातील सेनकाकू बेटांवरून जपानशी बाद सुरू आहे. मोदी म्हणाले होते की, काही विस्तारवादी मनोवृत्तीचे देश इतरांच्या जमिनीवर व समुद्रात अतिक्रमण करतात. चीनच्या अधिकृत प्रसारमाध्यमाने मंगळवारी चीनविरोधात जपान भारताबरोबर एकजूट करणार असल्यास ती ‘वेडी कल्पना’ ठरेल, अशा शब्दात जपानला इशारा दिला.
 
सेकड्र हार्ट युनिव्हर्सिटीत विद्याथ्र्याने विचारले होते की, चीनची विस्तारवादी कारस्थाने असताना अशियात शांतता कशी टिकविली जाईल. यावर मोदी विद्याथ्र्याला म्हणाले की, तुला चीनने खूपच त्रस दिलेला दिसतोय. तू पत्रकारांसारखा प्रश्न विचारलाय.
 
जपानचे दैनिक ‘असाही शिंबून’ने आपल्या संपादकीयात म्हटले आहे की, भारताचा चीनशी प्रदीर्घ काळापासून सीमावाद आहे त्यामुळे त्याच्याशी वैरभाव न वाढण्यासाठी भारताने जपानबरोबर अणू करार करण्याचे टाळले व मंत्रीपातळीवरील संवाद वाढविण्याचे टाळले.