शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

भारतीय रक्तातच अहिंसा -नरेंद्र मोदी

By admin | Updated: September 3, 2014 01:54 IST

कोणतेही आंतरराष्ट्रीय करार किंवा प्रक्रियांच्या पलीकडील आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.

टोकियो : शांतता आणि अहिंसेशी भारताची बांधिलकी ही भारतीय समाजाच्या रक्तातच रुजलेली असून ती कोणतेही आंतरराष्ट्रीय करार किंवा प्रक्रियांच्या पलीकडील आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
अण्वस्त्रे प्रसारबंदी करारावर (एनपीटी) भारत स्वाक्षरी करीत नसल्याबद्दल जगात जी चिंता व्यक्त केली जाते त्या पाश्र्वभूमीवर मोदी सेक्रेड हार्ट युनिव्हर्सिटीत विद्याथ्र्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. मोदी म्हणाले,‘‘भारत ही भगवान गौतम बुद्धांची भूमी असून त्यांनी त्यांचे सगळे आयुष्य शांततेसाठी ङिाजविले. शांततेसाठी त्यांनी त्रस भोगला आणि त्यांचा तो संदेश भारतभर पसरलेला आहे.’’
भारताकडे अण्वस्त्रे असताना त्याने अण्वस्त्रे प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. या परिस्थितीत भारत आपली भूमिका न बदलता आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:बद्दल विश्वास कसा वृद्धिंगत करणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. मोदी यांनी भारताने ब्रिटिशांविरुद्धचा स्वातंत्र्य लढा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण समाजाची अहिंसेशी बांधिलकी राखत कसा लढला व त्याने जग कसे आश्चर्यचकित झाले, याचा दाखला दिला. भारताची अहिंसेशी पूर्ण बांधिलकी असल्याचे मोदी यांनी ठामपणो सांगितले. अण्वस्त्रे प्रसारबंदी करार हा दोषपूर्ण असल्याचे सांगून भारताने त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिलेला आहे. (वृत्तसंस्था)
 
चीनवरील मोदींच्या अप्रत्यक्ष टीकेमुळे चीनला राग
च्बीजिंग/टोक्यो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या दौ:यात काही देशांच्या विस्तारवादी प्रवृत्तीच्या केलेल्या उल्लेखामुळे चीनच्या अधिकृत प्रसारमाध्यमात राग व्यक्त होत आहे. ‘भारतीय नेते (मोदी) हे जास्तच भावनिकदृष्टय़ा जपानच्या जवळ आहेत’ असे भाष्य करण्यात आले आहे. 
 
च्मंगळवारी मोदी यासंदर्भातील प्रश्नापासून दूर राहिले. या उलट जपानच्या वृत्तपत्रने सोमवारी जपानचे पंतप्रधान शिंझो अबे व नरेंद्र मोदी यांच्यातील अनिर्णीत राहिलेल्या शिखर परिषदेत चीनचा मोठा अडथळा होता, अशी उघड भावना व्यक्त केली.
 
च्मोदी यांनी सोमवारी काही राष्ट्रांच्या विस्तारवादी प्रवृत्तीबद्दल केलेल्या टीकेवर चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. चीनचा पूर्व चिनी समुद्रातील सेनकाकू बेटांवरून जपानशी बाद सुरू आहे. मोदी म्हणाले होते की, काही विस्तारवादी मनोवृत्तीचे देश इतरांच्या जमिनीवर व समुद्रात अतिक्रमण करतात. चीनच्या अधिकृत प्रसारमाध्यमाने मंगळवारी चीनविरोधात जपान भारताबरोबर एकजूट करणार असल्यास ती ‘वेडी कल्पना’ ठरेल, अशा शब्दात जपानला इशारा दिला.
 
सेकड्र हार्ट युनिव्हर्सिटीत विद्याथ्र्याने विचारले होते की, चीनची विस्तारवादी कारस्थाने असताना अशियात शांतता कशी टिकविली जाईल. यावर मोदी विद्याथ्र्याला म्हणाले की, तुला चीनने खूपच त्रस दिलेला दिसतोय. तू पत्रकारांसारखा प्रश्न विचारलाय.
 
जपानचे दैनिक ‘असाही शिंबून’ने आपल्या संपादकीयात म्हटले आहे की, भारताचा चीनशी प्रदीर्घ काळापासून सीमावाद आहे त्यामुळे त्याच्याशी वैरभाव न वाढण्यासाठी भारताने जपानबरोबर अणू करार करण्याचे टाळले व मंत्रीपातळीवरील संवाद वाढविण्याचे टाळले.