शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

शांततेचे नोबेल आयएसीएन संस्थेला जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 15:03 IST

वैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान,  साहित्य आणि रसायनशास्त्राचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले.

ठळक मुद्देवैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान,  साहित्य आणि रसायनशास्त्राचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले.यंदाचे शांतताक्षेत्रातील योगदानाबद्दलचे नोबेल आयएसीएन म्हणजेच इंटरनॅशनल कॅम्पेन टू अॅबोलिश न्यूक्लीअर वेपन्सला जाहीर झाले आहे.

स्टॉकहोम- जगातील सर्वोच्च आणि सर्वाधीक सन्मानाचे समजले जाणारे नोबेल पुरस्कार गेले चार दिवस जाहीर होत आहेत. वैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान,  साहित्य आणि रसायनशास्त्राचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले. यंदाचे शांतताक्षेत्रातील योगदानाबद्दलचे नोबेल आयएसीएन म्हणजेच इंटरनॅशनल कॅम्पेन टू अॅबोलिश न्यूक्लीअर वेपन्सला जाहीर झाले आहे. आयएसीएन जगातल्या १०० देशांमध्ये कार्यरत असून आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अण्वस्त्रांचा वापर सर्व देशांनी बंद करावा या ध्येयासाठी ही संघटना काम करते .काल साहित्याचे नोबेल ब्रिटिश लेखक कॅश्युओ इशिग्युरो यांना जाहीर करण्यात आले.

२७ नोव्हेंबर १८९५ रोजी आल्फ्रेड नोबेलने पॅरिसमध्ये त्याच्या शेवटच्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली. त्यामध्ये आपण मिळवलेल्या संपत्तीमधून वैद्यकशास्त्र,  साहित्य, रसायनशास्त्र, शांतता आणि पदार्थविज्ञान या क्षेत्रात योगदान देणार्या लोकांचा सन्मान करावा असे त्याने लिहून ठेवले होते. १९०१ पासून हे सन्मान देण्यास सुरुवात झाली. आजवर पदार्थविज्ञानाचे ११०, रसायनशास्त्राचे १०८, वैद्यकशास्त्राचे १०७, साहित्याचे १०९, शांततेचे ९७, अर्थशास्त्राचे ४८ नोबेल देण्यात आहेत. यावर्षी जेफ्री सी हाँल, मायकल रोशबॅश, मायकल यंग यांना वैद्यकशास्त्राचे, रेइनर वेईस, बेरी बॅरिश व किप थॉर्न यांना पदार्थविज्ञानाचे तर जँक्स ड्युबोशे, जोआकिम फ्रॅक, रिचर्ड हेंडरसन यांना रसायनशास्त्राचे नोबेल देण्यात आले. रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नोबेल मिळवणारे ते आशियातील पहिले नागरिक होते. त्याचबरोबर हरगोविंद खुराणा, सी. व्ही. रमण, मदर तेरेसा, अमर्त्य सेन, कैलाश सत्यार्थी, व्ही.एस नायपाँल, सुब्रमण्यन चंद्रशेखर, व्यंकटरमण रामकृष्णन या भारतीय किंवा भारतीय वंशाच्या लोकांना नोबेल मिळाले तर भारताशी संबंधित असणाऱ्या रोनाल्ड रॉस, रुडयार्ड किपलिंग आणि दलाई लामा यांचाही नोबेलने सन्मान करण्यात आलेला आहे.