शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

शांततेचे नोबेल आयएसीएन संस्थेला जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 15:03 IST

वैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान,  साहित्य आणि रसायनशास्त्राचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले.

ठळक मुद्देवैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान,  साहित्य आणि रसायनशास्त्राचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले.यंदाचे शांतताक्षेत्रातील योगदानाबद्दलचे नोबेल आयएसीएन म्हणजेच इंटरनॅशनल कॅम्पेन टू अॅबोलिश न्यूक्लीअर वेपन्सला जाहीर झाले आहे.

स्टॉकहोम- जगातील सर्वोच्च आणि सर्वाधीक सन्मानाचे समजले जाणारे नोबेल पुरस्कार गेले चार दिवस जाहीर होत आहेत. वैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान,  साहित्य आणि रसायनशास्त्राचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले. यंदाचे शांतताक्षेत्रातील योगदानाबद्दलचे नोबेल आयएसीएन म्हणजेच इंटरनॅशनल कॅम्पेन टू अॅबोलिश न्यूक्लीअर वेपन्सला जाहीर झाले आहे. आयएसीएन जगातल्या १०० देशांमध्ये कार्यरत असून आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अण्वस्त्रांचा वापर सर्व देशांनी बंद करावा या ध्येयासाठी ही संघटना काम करते .काल साहित्याचे नोबेल ब्रिटिश लेखक कॅश्युओ इशिग्युरो यांना जाहीर करण्यात आले.

२७ नोव्हेंबर १८९५ रोजी आल्फ्रेड नोबेलने पॅरिसमध्ये त्याच्या शेवटच्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली. त्यामध्ये आपण मिळवलेल्या संपत्तीमधून वैद्यकशास्त्र,  साहित्य, रसायनशास्त्र, शांतता आणि पदार्थविज्ञान या क्षेत्रात योगदान देणार्या लोकांचा सन्मान करावा असे त्याने लिहून ठेवले होते. १९०१ पासून हे सन्मान देण्यास सुरुवात झाली. आजवर पदार्थविज्ञानाचे ११०, रसायनशास्त्राचे १०८, वैद्यकशास्त्राचे १०७, साहित्याचे १०९, शांततेचे ९७, अर्थशास्त्राचे ४८ नोबेल देण्यात आहेत. यावर्षी जेफ्री सी हाँल, मायकल रोशबॅश, मायकल यंग यांना वैद्यकशास्त्राचे, रेइनर वेईस, बेरी बॅरिश व किप थॉर्न यांना पदार्थविज्ञानाचे तर जँक्स ड्युबोशे, जोआकिम फ्रॅक, रिचर्ड हेंडरसन यांना रसायनशास्त्राचे नोबेल देण्यात आले. रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नोबेल मिळवणारे ते आशियातील पहिले नागरिक होते. त्याचबरोबर हरगोविंद खुराणा, सी. व्ही. रमण, मदर तेरेसा, अमर्त्य सेन, कैलाश सत्यार्थी, व्ही.एस नायपाँल, सुब्रमण्यन चंद्रशेखर, व्यंकटरमण रामकृष्णन या भारतीय किंवा भारतीय वंशाच्या लोकांना नोबेल मिळाले तर भारताशी संबंधित असणाऱ्या रोनाल्ड रॉस, रुडयार्ड किपलिंग आणि दलाई लामा यांचाही नोबेलने सन्मान करण्यात आलेला आहे.