शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

येत्या सात वर्षांत लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला टाकेल मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 21:57 IST

येत्या सात वर्षांत म्हणजे २०२४ च्या सुमारास लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकेल

ऑनलाइन लोकमतसंयुक्त राष्ट्रे, दि. 22 -  येत्या सात वर्षांत म्हणजे 2024च्या सुमारास लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकेल आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघाने वर्तविला आहे. या अंदाजानुसार सन 2030 पर्यंत भारताची लोकसंख्या 1.5 अब्ज एवढी होईल.

संयुक्त राष्ट्र संघाचा आर्थिक आणि सामाजिक बाबींविषयीचा विभाग जागतिक लोकसंख्येतील बदलाचा सुधारित अंदाज प्रसिद्ध करत असते. यंदा 25वा सुधारित अंदाज प्रसिद्ध केला. याआधी 2015 मधील अंदाजानुसार 2022 मध्ये भारताची लोकसंख्या चीनहून जास्त होणे अपेक्षित होते. ताज्या अंदाजानुसार ही शक्यता दोन वर्षे पुढे वर्तविण्यात आली आहे.
सध्या लोकसंख्येच्या बाबतीत चीन (1.41 अब्ज) व भारत (1.34 अब्ज) हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे देश आहेत. सन 2024 पर्यंत या दोन्ही देशांची लोकसंख्या 1.41 अब्जच्या आसपास राहील. त्यानंतर भारताची लोकसंख्या वाढत राहून सन 2030 मध्ये 1.5 अब्ज व सन 2050 मध्ये 1.66 अब्जापर्यंत पोहोचेल. याउलट चीनची लोकसंख्या सन 2030पर्यंत स्थिर राहील व त्यानंतर तिच्यामध्ये काहीशी घट होणे अपेक्षित आहे.
या अहवालानुसार 2050 नंतरच्या अर्ध्या शतकात भारताच्या लोकसंख्येत घट अपेक्षित असून, सन 2100 पर्यंत ती कमी होत 1.51 अब्जांवर पोहोचेल. तरीही त्यावेळी भारत हाच सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल. 
हा अहवाल म्हणतो की, सध्या 7.6 अब्ज असलेली जगाची लोकसंख्या सन 2030 मध्ये 8.6 अब्ज, सन 2050 मध्ये 9.8 अब्ज व सन 2100 मध्ये 11.2 अब्जांवर पोहोचलेली असेल. सध्या जगाच्या लोकसंख्येत दरवर्षी 8 कोटी 30 लाखांनी भर पडत आहे. पुढील अनेक दशके प्रजनन दरात घट होत जाईल, असे गृहित धरले तरीही जगाची लोकसंख्या मात्र कमी होण्याऐवजी वाढतच जाईल.
सन 2017 ते 2050या काळात जागतिक लोकसंख्येतील एकूण वाढीपैकी निम्मी वाढ भारत, नायजेरिया, काँगो, पाकिस्तान, इथिओपिया, टांझानिया, अमेरिका, युगांडा, इंडोनेशिया व इजिप्त या 10 देशांमध्ये होणे अपेक्षित आहे.
जगातील 10 सर्वात मोठ्या देशांमध्ये लोकसंख्येत सर्वाधिक वेगाने वाढ होण्यात नायजेरियाचा पहिला क्रमांक लागतो. सध्या नायजेरिया सातव्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. मात्र 2050 पूर्वी तो अमेरिकेस मागे टाकून लोकसंख्येच्या बाबतीत भारत व चीननंतर तिसऱ्या क्रमांकाचा देश होईल.
 
देशादेशांमध्ये आर्थिक विकास आणि लोकसंख्या या बाबतीत मोठी विषमता कायम राहणार असल्याने अधिक चांगल्या आयुष्याच्या शोधात आणखी काही दशके आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरुच राहील. सन 2050 पर्यंत ज्या 10 प्रमुख देशांमध्ये वर्षाला एक लाखांहून अधिक लोक स्थलांतर करणे अपेक्षित आहे. त्यांत अमेरिका, जर्मनी, कॅनडा ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व रशिया यांचा समावेश असेल. या काळात ज्या देशांमधून दरवर्षी एक लाखांहून अधिक लोक अन्यत्र स्थलांतर करण्याची शक्यता आहे, त्यांत भारत, इंडोनेशिया, पाकिस्तान, मेक्सिको व फिलिपिन्स यांचा समावेश असेल.