शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

येत्या सात वर्षांत लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला टाकेल मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 21:57 IST

येत्या सात वर्षांत म्हणजे २०२४ च्या सुमारास लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकेल

ऑनलाइन लोकमतसंयुक्त राष्ट्रे, दि. 22 -  येत्या सात वर्षांत म्हणजे 2024च्या सुमारास लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकेल आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघाने वर्तविला आहे. या अंदाजानुसार सन 2030 पर्यंत भारताची लोकसंख्या 1.5 अब्ज एवढी होईल.

संयुक्त राष्ट्र संघाचा आर्थिक आणि सामाजिक बाबींविषयीचा विभाग जागतिक लोकसंख्येतील बदलाचा सुधारित अंदाज प्रसिद्ध करत असते. यंदा 25वा सुधारित अंदाज प्रसिद्ध केला. याआधी 2015 मधील अंदाजानुसार 2022 मध्ये भारताची लोकसंख्या चीनहून जास्त होणे अपेक्षित होते. ताज्या अंदाजानुसार ही शक्यता दोन वर्षे पुढे वर्तविण्यात आली आहे.
सध्या लोकसंख्येच्या बाबतीत चीन (1.41 अब्ज) व भारत (1.34 अब्ज) हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे देश आहेत. सन 2024 पर्यंत या दोन्ही देशांची लोकसंख्या 1.41 अब्जच्या आसपास राहील. त्यानंतर भारताची लोकसंख्या वाढत राहून सन 2030 मध्ये 1.5 अब्ज व सन 2050 मध्ये 1.66 अब्जापर्यंत पोहोचेल. याउलट चीनची लोकसंख्या सन 2030पर्यंत स्थिर राहील व त्यानंतर तिच्यामध्ये काहीशी घट होणे अपेक्षित आहे.
या अहवालानुसार 2050 नंतरच्या अर्ध्या शतकात भारताच्या लोकसंख्येत घट अपेक्षित असून, सन 2100 पर्यंत ती कमी होत 1.51 अब्जांवर पोहोचेल. तरीही त्यावेळी भारत हाच सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल. 
हा अहवाल म्हणतो की, सध्या 7.6 अब्ज असलेली जगाची लोकसंख्या सन 2030 मध्ये 8.6 अब्ज, सन 2050 मध्ये 9.8 अब्ज व सन 2100 मध्ये 11.2 अब्जांवर पोहोचलेली असेल. सध्या जगाच्या लोकसंख्येत दरवर्षी 8 कोटी 30 लाखांनी भर पडत आहे. पुढील अनेक दशके प्रजनन दरात घट होत जाईल, असे गृहित धरले तरीही जगाची लोकसंख्या मात्र कमी होण्याऐवजी वाढतच जाईल.
सन 2017 ते 2050या काळात जागतिक लोकसंख्येतील एकूण वाढीपैकी निम्मी वाढ भारत, नायजेरिया, काँगो, पाकिस्तान, इथिओपिया, टांझानिया, अमेरिका, युगांडा, इंडोनेशिया व इजिप्त या 10 देशांमध्ये होणे अपेक्षित आहे.
जगातील 10 सर्वात मोठ्या देशांमध्ये लोकसंख्येत सर्वाधिक वेगाने वाढ होण्यात नायजेरियाचा पहिला क्रमांक लागतो. सध्या नायजेरिया सातव्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. मात्र 2050 पूर्वी तो अमेरिकेस मागे टाकून लोकसंख्येच्या बाबतीत भारत व चीननंतर तिसऱ्या क्रमांकाचा देश होईल.
 
देशादेशांमध्ये आर्थिक विकास आणि लोकसंख्या या बाबतीत मोठी विषमता कायम राहणार असल्याने अधिक चांगल्या आयुष्याच्या शोधात आणखी काही दशके आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरुच राहील. सन 2050 पर्यंत ज्या 10 प्रमुख देशांमध्ये वर्षाला एक लाखांहून अधिक लोक स्थलांतर करणे अपेक्षित आहे. त्यांत अमेरिका, जर्मनी, कॅनडा ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व रशिया यांचा समावेश असेल. या काळात ज्या देशांमधून दरवर्षी एक लाखांहून अधिक लोक अन्यत्र स्थलांतर करण्याची शक्यता आहे, त्यांत भारत, इंडोनेशिया, पाकिस्तान, मेक्सिको व फिलिपिन्स यांचा समावेश असेल.