शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

येत्या सात वर्षांत लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला टाकेल मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 21:57 IST

येत्या सात वर्षांत म्हणजे २०२४ च्या सुमारास लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकेल

ऑनलाइन लोकमतसंयुक्त राष्ट्रे, दि. 22 -  येत्या सात वर्षांत म्हणजे 2024च्या सुमारास लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकेल आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघाने वर्तविला आहे. या अंदाजानुसार सन 2030 पर्यंत भारताची लोकसंख्या 1.5 अब्ज एवढी होईल.

संयुक्त राष्ट्र संघाचा आर्थिक आणि सामाजिक बाबींविषयीचा विभाग जागतिक लोकसंख्येतील बदलाचा सुधारित अंदाज प्रसिद्ध करत असते. यंदा 25वा सुधारित अंदाज प्रसिद्ध केला. याआधी 2015 मधील अंदाजानुसार 2022 मध्ये भारताची लोकसंख्या चीनहून जास्त होणे अपेक्षित होते. ताज्या अंदाजानुसार ही शक्यता दोन वर्षे पुढे वर्तविण्यात आली आहे.
सध्या लोकसंख्येच्या बाबतीत चीन (1.41 अब्ज) व भारत (1.34 अब्ज) हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे देश आहेत. सन 2024 पर्यंत या दोन्ही देशांची लोकसंख्या 1.41 अब्जच्या आसपास राहील. त्यानंतर भारताची लोकसंख्या वाढत राहून सन 2030 मध्ये 1.5 अब्ज व सन 2050 मध्ये 1.66 अब्जापर्यंत पोहोचेल. याउलट चीनची लोकसंख्या सन 2030पर्यंत स्थिर राहील व त्यानंतर तिच्यामध्ये काहीशी घट होणे अपेक्षित आहे.
या अहवालानुसार 2050 नंतरच्या अर्ध्या शतकात भारताच्या लोकसंख्येत घट अपेक्षित असून, सन 2100 पर्यंत ती कमी होत 1.51 अब्जांवर पोहोचेल. तरीही त्यावेळी भारत हाच सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल. 
हा अहवाल म्हणतो की, सध्या 7.6 अब्ज असलेली जगाची लोकसंख्या सन 2030 मध्ये 8.6 अब्ज, सन 2050 मध्ये 9.8 अब्ज व सन 2100 मध्ये 11.2 अब्जांवर पोहोचलेली असेल. सध्या जगाच्या लोकसंख्येत दरवर्षी 8 कोटी 30 लाखांनी भर पडत आहे. पुढील अनेक दशके प्रजनन दरात घट होत जाईल, असे गृहित धरले तरीही जगाची लोकसंख्या मात्र कमी होण्याऐवजी वाढतच जाईल.
सन 2017 ते 2050या काळात जागतिक लोकसंख्येतील एकूण वाढीपैकी निम्मी वाढ भारत, नायजेरिया, काँगो, पाकिस्तान, इथिओपिया, टांझानिया, अमेरिका, युगांडा, इंडोनेशिया व इजिप्त या 10 देशांमध्ये होणे अपेक्षित आहे.
जगातील 10 सर्वात मोठ्या देशांमध्ये लोकसंख्येत सर्वाधिक वेगाने वाढ होण्यात नायजेरियाचा पहिला क्रमांक लागतो. सध्या नायजेरिया सातव्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. मात्र 2050 पूर्वी तो अमेरिकेस मागे टाकून लोकसंख्येच्या बाबतीत भारत व चीननंतर तिसऱ्या क्रमांकाचा देश होईल.
 
देशादेशांमध्ये आर्थिक विकास आणि लोकसंख्या या बाबतीत मोठी विषमता कायम राहणार असल्याने अधिक चांगल्या आयुष्याच्या शोधात आणखी काही दशके आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरुच राहील. सन 2050 पर्यंत ज्या 10 प्रमुख देशांमध्ये वर्षाला एक लाखांहून अधिक लोक स्थलांतर करणे अपेक्षित आहे. त्यांत अमेरिका, जर्मनी, कॅनडा ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व रशिया यांचा समावेश असेल. या काळात ज्या देशांमधून दरवर्षी एक लाखांहून अधिक लोक अन्यत्र स्थलांतर करण्याची शक्यता आहे, त्यांत भारत, इंडोनेशिया, पाकिस्तान, मेक्सिको व फिलिपिन्स यांचा समावेश असेल.