शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

नेताजी बोस सापडले होते विमान दुर्घटनेत

By admin | Updated: January 10, 2016 02:21 IST

‘हिंदुस्थान जरूर आझाद होगा, उसको कोई गुलाम नही रख सकता’ हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात जखमी झाल्यानंतरचे शब्द होते, असा दावा एका ब्रिटिश वेबसाईटने केला आहे.

लंडन : ‘हिंदुस्थान जरूर आझाद होगा, उसको कोई गुलाम नही रख सकता’ हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात जखमी झाल्यानंतरचे शब्द होते, असा दावा एका ब्रिटिश वेबसाईटने केला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रहस्यमय मृत्यूवर प्रकाश टाकणारी माहिती  www. bosefiles. i»»ffo या ब्रिटिश वेबसाईटने दिली आहे. ही माहिती प्रत्यक्षदर्शी, तसेच ब्रिटिश गुप्तचर खात्याच्या अहवालावर आधारित असल्याचे या साईटने म्हटले आहे. नेताजी १८ आॅगस्ट १९४८ रोजी विमान अपघातात तैवान येथे मृत्युमुखी पडल्याचे आतापर्यंत सांगण्यात येत होते. प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याच्या आधारे या साईटवर देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, या दिवशी बॉम्बफेक करणाऱ्या जपानी विमानाचा अपघात झाला होता. या विमानात नेताजी होते. व्हिएतनामच्या टुरान या विमानतळावरून उड्डाण घेतल्यावर लगेच विमानात स्फोट होऊन त्याला आग लागली व धावपट्टीपासून १०० मीटर अंतरावर ते कोसळले. कर्नल हबीब उर रेहमान यांच्यासह नेताजी भाजलेल्या अवस्थेत विमानातून बाहेर आले. ते पेट्रोलच्या टाकीजवळ बसलेले असल्यामुळे त्यांना जास्त जखमा झाल्या असाव्यात असे या वेबसाईटवर नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला डाव्या बाजूला मोठी जखम झाली होती, असेही या वेबसाईटने म्हटले आहे. भारतीयांना सांगा शेवटपर्यंत लढत होतोबाहेर पडल्यानंतर झालेला संवाद रेहमान यांनी नोंदवल्याचे सांगण्यात आले. तुम्हाला जास्त तर लागले नाही असे विचारपूस करून नेताजींनी रेहमान यांना सांगितले की, ज्या वेळी तुम्ही भारतात परत जाल, तेव्हा माझ्या भारतीय बांधवांना सांगा की मी शेवटच्या क्षणापर्यंत भारताच्या आझादीसाठी लढत होतो. आझादीसाठी युद्ध सुरू ठेवण्याचा आदेशही बोस यांनी रेहमान यांच्यामार्फ त दिला.यानंतर बोस यांना गंभीर जखमी अवस्थेत नानमोन येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काय झाले, हे १६ जानेवारी रोजी वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल असे सांगत या साईटने उत्कंठा ताणण्याचा खेळ केला आहे.