शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

नेताजी बोस सापडले होते विमान दुर्घटनेत

By admin | Updated: January 10, 2016 02:21 IST

‘हिंदुस्थान जरूर आझाद होगा, उसको कोई गुलाम नही रख सकता’ हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात जखमी झाल्यानंतरचे शब्द होते, असा दावा एका ब्रिटिश वेबसाईटने केला आहे.

लंडन : ‘हिंदुस्थान जरूर आझाद होगा, उसको कोई गुलाम नही रख सकता’ हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात जखमी झाल्यानंतरचे शब्द होते, असा दावा एका ब्रिटिश वेबसाईटने केला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रहस्यमय मृत्यूवर प्रकाश टाकणारी माहिती  www. bosefiles. i»»ffo या ब्रिटिश वेबसाईटने दिली आहे. ही माहिती प्रत्यक्षदर्शी, तसेच ब्रिटिश गुप्तचर खात्याच्या अहवालावर आधारित असल्याचे या साईटने म्हटले आहे. नेताजी १८ आॅगस्ट १९४८ रोजी विमान अपघातात तैवान येथे मृत्युमुखी पडल्याचे आतापर्यंत सांगण्यात येत होते. प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याच्या आधारे या साईटवर देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, या दिवशी बॉम्बफेक करणाऱ्या जपानी विमानाचा अपघात झाला होता. या विमानात नेताजी होते. व्हिएतनामच्या टुरान या विमानतळावरून उड्डाण घेतल्यावर लगेच विमानात स्फोट होऊन त्याला आग लागली व धावपट्टीपासून १०० मीटर अंतरावर ते कोसळले. कर्नल हबीब उर रेहमान यांच्यासह नेताजी भाजलेल्या अवस्थेत विमानातून बाहेर आले. ते पेट्रोलच्या टाकीजवळ बसलेले असल्यामुळे त्यांना जास्त जखमा झाल्या असाव्यात असे या वेबसाईटवर नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला डाव्या बाजूला मोठी जखम झाली होती, असेही या वेबसाईटने म्हटले आहे. भारतीयांना सांगा शेवटपर्यंत लढत होतोबाहेर पडल्यानंतर झालेला संवाद रेहमान यांनी नोंदवल्याचे सांगण्यात आले. तुम्हाला जास्त तर लागले नाही असे विचारपूस करून नेताजींनी रेहमान यांना सांगितले की, ज्या वेळी तुम्ही भारतात परत जाल, तेव्हा माझ्या भारतीय बांधवांना सांगा की मी शेवटच्या क्षणापर्यंत भारताच्या आझादीसाठी लढत होतो. आझादीसाठी युद्ध सुरू ठेवण्याचा आदेशही बोस यांनी रेहमान यांच्यामार्फ त दिला.यानंतर बोस यांना गंभीर जखमी अवस्थेत नानमोन येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काय झाले, हे १६ जानेवारी रोजी वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल असे सांगत या साईटने उत्कंठा ताणण्याचा खेळ केला आहे.