शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

ओलींचा यूटर्न! भारत आणि नेपाळ चांगले मित्र; चीनला थेट शब्दांत दिला इशारा

By देवेश फडके | Updated: January 13, 2021 15:27 IST

नेपाळमधील राजकीय गोंधळ वाढत असताना पंतप्रधान केपी शर्मा ओली भारताबाबत मवाळ झाल्याचे दिसून येत आहेत. भारत आणि नेपाळ चांगले मित्र असल्याचे ओली यांनी म्हटले आहे. 

ठळक मुद्देनेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची भारताबाबत भूमिका मवाळभारत आणि नेपाळ चांगले मित्र; चीनने ढवळाढवळ करू नये; केपी शर्मा ओलीभारताकडून कोरोना लस मिळवण्याचा नेपाळ प्रयत्नशील असल्याचा दावा

काठमांडू :नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी नरमाइची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. नेपाळमधील राजकीय गोंधळ वाढत असताना पंतप्रधान केपी शर्मा ओली भारताबाबत मवाळ झाल्याचे दिसून येत आहेत. भारत आणि नेपाळ चांगले मित्र असल्याचे ओली यांनी म्हटले आहे. 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केपी शर्मा ओली बोलत होते. भारत आणि चीनमध्ये चांगले संबंध असून, या मैत्रीत तिसरा देश येऊ शकत नाही. भारत आणि नेपाळमधील मैत्री ही स्वाभाविक आहे, असे ओली म्हणाले. ओली सध्या भारतासोबत जवळीक वाढवून पक्षामधील नाराज नेते आणि देशातील जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले जात आहे. 

याच मुलाखतीत ओली यांनी चीनला खडे बोल सुनावले आहेत. आमचा देश सर्व निर्णय स्वतंत्रपणे घेतो. चीनने नेपाळच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ करू नये. अन्य देशांचे आदेश आम्ही मानणार नाही, असेही ओली यांनी सांगितले आहे. दुसरीकडे, ओली यांचा हा राजकीय डाव असल्याचे सांगितले जात आहे. भारतासोबतचे संबंध पुन्हा सामान्य करत कोरोना लसीचा पुरवठा भारताकडून होईल, हे सुनिश्चित करण्याचा ओली यांचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा करण्यात येत आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कालापानी-लिंपियाधुरी-लिपुलेख हे प्रदेश नेपाळचा भाग असून, ते भारताकडून घेऊच, असा पवित्रा ओली यांनी घेतला होता. मुसद्दी मार्गाने भारताशी चर्चा करून हे तीनही भूभाग पुन्हा घेतले जातील. सन १९६२ मध्ये भारत-चीन युद्धानंतर भारतीय सैन्य या ठिकाणी तैनात करण्यात आले. मात्र, आता हे तीन भूभाग भारताकडून पुन्हा एकदा नेपाळमध्ये घेऊ, असे ओली यांनी म्हटले होते.

टॅग्स :NepalनेपाळCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत