शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

पायाभूत सोयी बळकट करण्याची गरज

By admin | Updated: February 9, 2016 01:59 IST

भारताला पायाभूत सुविधांना बळकट करून मेक इन इंडियासारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमावर लक्ष द्यायची गरज आहे, असे आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर

वॉशिंग्टन : भारताला पायाभूत सुविधांना बळकट करून मेक इन इंडियासारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमावर लक्ष द्यायची गरज आहे, असे आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांनी म्हटले. या दोन्ही मोहिमांना राबविणे ही भारतासाठी मोठी परीक्षाच असेल, असेही त्या म्हणाल्या. कोचर हार्वर्ड विद्यापीठातील ‘भारत संमेलन २०१६’ मध्ये त्या मुख्य वक्ता म्हणून बोलत होत्या.चंदा कोचर म्हणाल्या की, ‘‘प्रामाणिकपणे प्रयत्न होत आहेत आणि बदल व्हावेत ही सरकारचीही इच्छा आहे. ई-गव्हर्नन्सवर खूप जोर दिला जात आहे. दहा किंवा नऊ टक्के विकासदर गाठण्यासाठी आम्हाला आमची इच्छा आणि कार्यक्रम यांना प्रत्यक्ष राबविण्यासाठी प्रत्यक्षात खूप काही करायचे आहे.’’ सरकारने निश्चित केलेला विकास आणि विकास दराच्या मार्गावर आम्हाला लक्ष केंद्रित केले पाहिजे. आम्हाला आम्हीच बनविलेल्या आमच्या योजनांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. भारतासाठी ही मोठी परीक्षा असेल, असेही चंदा कोचर म्हणाल्या. त्यांनी पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर दिला.पायाभूत सुविधांमध्ये आम्ही खूप कमी गुंतवणूक केली आहे. गुंतवणूक न वाढल्यास आम्ही आमच्याच विकासात अडचणी निर्माण करणार आहोत, असा इशारा कोचर यांनी दिला. भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहेत. ‘मेक इन इंडिया’ तसेच गुंतवणुकीसाठी हाती घेतलेले इतर विविध उपक्रम हा या उपाययोजनांचाच भाग आहेत. याचा योग्य परिणाम दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.चालू आर्थिक वर्षात खाण आणि उत्खनन, वीज व वीज पुरवठा व इतर सेवांच्या विकास दरात घट होण्याची अपेक्षा आहे. जीडीपीचे आकडे बरीच सकारात्मक दिशा दाखवित आहेत. गेल्या दीड वर्षात सरकारने धोरण आणि सुधारणांच्या दिशेने जी पावले टाकली त्याचे फळ आता दिसत आहे. (वृत्तसंस्था)