शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत सोयी बळकट करण्याची गरज

By admin | Updated: February 9, 2016 02:00 IST

भारताला पायाभूत सुविधांना बळकट करून मेक इन इंडियासारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमावर लक्ष द्यायची गरज आहे, असे आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर

वॉशिंग्टन : भारताला पायाभूत सुविधांना बळकट करून मेक इन इंडियासारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमावर लक्ष द्यायची गरज आहे, असे आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांनी म्हटले. या दोन्ही मोहिमांना राबविणे ही भारतासाठी मोठी परीक्षाच असेल, असेही त्या म्हणाल्या. कोचर हार्वर्ड विद्यापीठातील ‘भारत संमेलन २०१६’ मध्ये त्या मुख्य वक्ता म्हणून बोलत होत्या.चंदा कोचर म्हणाल्या की, ‘‘प्रामाणिकपणे प्रयत्न होत आहेत आणि बदल व्हावेत ही सरकारचीही इच्छा आहे. ई-गव्हर्नन्सवर खूप जोर दिला जात आहे. दहा किंवा नऊ टक्के विकासदर गाठण्यासाठी आम्हाला आमची इच्छा आणि कार्यक्रम यांना प्रत्यक्ष राबविण्यासाठी प्रत्यक्षात खूप काही करायचे आहे.’’ सरकारने निश्चित केलेला विकास आणि विकास दराच्या मार्गावर आम्हाला लक्ष केंद्रित केले पाहिजे. आम्हाला आम्हीच बनविलेल्या आमच्या योजनांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. भारतासाठी ही मोठी परीक्षा असेल, असेही चंदा कोचर म्हणाल्या. त्यांनी पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर दिला.पायाभूत सुविधांमध्ये आम्ही खूप कमी गुंतवणूक केली आहे. गुंतवणूक न वाढल्यास आम्ही आमच्याच विकासात अडचणी निर्माण करणार आहोत, असा इशारा कोचर यांनी दिला. भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहेत. ‘मेक इन इंडिया’ तसेच गुंतवणुकीसाठी हाती घेतलेले इतर विविध उपक्रम हा या उपाययोजनांचाच भाग आहेत. याचा योग्य परिणाम दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.चालू आर्थिक वर्षात खाण आणि उत्खनन, वीज व वीज पुरवठा व इतर सेवांच्या विकास दरात घट होण्याची अपेक्षा आहे. जीडीपीचे आकडे बरीच सकारात्मक दिशा दाखवित आहेत. गेल्या दीड वर्षात सरकारने धोरण आणि सुधारणांच्या दिशेने जी पावले टाकली त्याचे फळ आता दिसत आहे. (वृत्तसंस्था)