शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

नवाझ शरीफ यांनीही बोलावली सर्वपक्षीय बैठक

By admin | Updated: October 3, 2016 17:41 IST

सोमवारी नवाझ शरीफ यांनी 'एककलमी अजेंडा'साठी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीसाठी नवाझ शरीफ यांचे राजकीय प्रतिस्पर्धी इमरान खानपासून ते बिलावल भुट्टोपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना बोलावण्यात आले होते.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.3 - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याचे पाकिस्तान एकीकडे नाकारत असताना, दुसरीकडे याच मुद्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ बैठकांवर बैठक घेताना दिसत आहेत. सोमवारी नवाझ शरीफ यांनी 'एककलमी अजेंडा'साठी सर्वपक्षीय बैठक बोलावली.  या बैठकीसाठी नवाझ शरीफ यांचे राजकीय प्रतिस्पर्धी इमरान खानपासून ते बिलावल भुट्टोंपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना बोलावण्यात आले होते. 
 
या बैठकीत भारत आणि काश्मीर मुद्यावर आगामी रणनीती आखण्यासाठी चर्चा झाल्याची  माहिती मिळते आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, युद्धासाठी उकसवणा-या भारताविरोधात आम्ही एकजूट आहोत, असा कांगावखोर पाकिस्तानच्या एका कॅबिनेट मंत्र्याने केला आहे. तर,'अनेक मुद्यांवर सरकारसोबत मतभेद असूनही, काश्मीर आणि नियंत्रण रेषेवरील भारताच्या कारवायांविरोधात पंतप्रधान शरीफ यांच्यासोबत आहोत. भारत-पाकिस्तान संबंधांसाठी हा टर्निंग पॉईंट असेल', असे पाकिस्तानी पीपल्स पक्षाचे नेते बिलावल भुट्टो यांनी म्हटले आहे. शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे इमरान खान या बैठकीला हजर नव्हते. मात्र त्यांचा पक्ष 'तेहरीक-ए-इन्साफ'चे प्रवक्ते या बैठकीला हजर होते. 
 
आणखी बातम्या
भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तान सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर पंतप्रधान शरीफ यांच्यावर देशांतर्गत मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तान एकटा पडताना दिसतो आहे. याच पार्श्वभूमीवर नवाझ शरीफ यांनी ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आल्याचे बोलले जात आहे.