शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जगभर निनादले भारतीय राष्ट्रगीत

By admin | Updated: August 16, 2016 01:12 IST

जगाच्या कानाकोपऱ्यांतील भारतीयांनी सोमवारी तिरंगा ध्वज फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला. चीन, अमेरिका, थायलंड आणि सिंगापूरमधील भारतीयांनी

बीजिंग/ वॉशिंग्टन : जगाच्या कानाकोपऱ्यांतील भारतीयांनी सोमवारी तिरंगा ध्वज फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला. चीन, अमेरिका, थायलंड आणि सिंगापूरमधील भारतीयांनी राष्ट्रभक्तीपर गीते गाऊन आणि नृत्य सादर करून विविधतेत सामावलेल्या एकतेचे दर्शन घडविले. चीनमध्ये भारतीय राजदूत विजय गोखले यांनी दूतावासाच्या आवारात राष्ट्रध्वज फडकावला. तेथील कर्मचाऱ्यांसह अन्य भारतीयही आपापल्या कुटुंबीयांसह या कार्यक्रमात सहभागी झाले. गोखले यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे अभिभाषण वाचून दाखविले. त्यानंतर राष्ट्रभक्तीपर गीते सादर करण्यात आली. शांघाय येथे भारतीय उच्चायुक्त प्रकाश गुप्ता यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि राष्ट्रपतींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे वाचून दाखविले. अशाच स्वरूपाचा कार्यक्रम गाँगझो येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात झाला. उच्चायुक्त वाय. के. सैलास थांगल अध्यक्षस्थानी होते. अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि न्यू जर्सी येथे भारताचा स्वातंत्र्य दिन भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. हजारो भारतीयांनी त्यात सहभागी होत येथील विविधरंगी संस्कृतीचे दर्शन घडवले. डल्लास, ह्युस्टन, शिकागो, आॅरलँडो या शहरांतील भारतीयांच्या संघटनांनी शनिवारपासूनच विविध कार्यक्रम आयोजित केले होते. बँकॉक येथील भारतीय राजदूत भावंत सिंग बिश्णोई म्हणाले, ‘थायलंड हा पूर्वीपासूनच भारताचा अतिशय जवळचा मित्र देश आहे. आपल्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने २०१६ हे वर्ष अतिशय महत्त्वाचे ठरले. व्यक्ती-व्यक्तींतील बंध हा या दोन देशांतील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. भारतीय समाजाची भूमिका या संबंधांच्या केंद्रस्थानी आहे. भारतीयांनी थायलंडच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासासाठी दिलेले योगदान मोलाचे आहे.’ या कार्यक्रमाला सुमारे ५०० भारतीय उपस्थित होते. सिंगापूर येथे भारतीय उच्चायुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात सुमारे ६०० भारतीय सहभागी झाले. उच्चायुक्त विजय ठाकूर सिंह यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे अभिभाषण वाचून दाखविले. तेथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि नृत्ये सादर केली. सिंगापूर, मलेशिया, थायलंड, म्यानमार येथेही भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. (वृत्तसंस्था) - सिंगापूर येथे भारतीय उच्चायुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात सुमारे ६०० भारतीय सहभागी झाले. उच्चायुक्त विजय ठाकूर सिंह यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे अभिभाषण वाचून दाखविले. तेथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि नृत्ये सादर केली.