शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

बलोच नेत्यांवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे

By admin | Updated: August 23, 2016 05:11 IST

अत्याचाराचा उल्लेख केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणाऱ्या बलोची नेत्यांवर पाकिस्तानात राष्ट्रद्रोहाचे गुन्हे नोंदविण्यात आले

इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलोचिस्तानातील जनतेवर पाकिस्तान सरकारकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचाराचा उल्लेख केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणाऱ्या बलोची नेत्यांवर पाकिस्तानात राष्ट्रद्रोहाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. बलोची जनतेचा मोदी यांच्या विधानांना पाठिंबा असल्याचे वक्तव्य या बलोची नेत्यांनी केले होते.गेली अनेक वर्षे बलोचिस्तानात पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. या जनतेवर पाकिस्तान सरकार आणि पोलीस सातत्याने अन्याय आणि अत्याचार करीत आहेत. काश्मिरात पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीची भारताची तक्रार जुनी आहे. त्यातच अलीकडील काळात काश्मीर खोऱ्यात जो हिंसाचार सुरू आहे, त्यातही पाकचा हात असल्याचे भारताने म्हटले आहे. मात्र काश्मीर प्रश्नावर भारताने आपल्याशी चर्चा करावी, असे पाकिस्तानचे म्हणणे असून, ते फेटाळून लावत, भारताने बलोचिस्तानातील अत्याचारांचा उल्लेख केला होता.या साऱ्या प्रकारामुळे पाकिस्तान पोलिसांनी ब्रह्मदाग बुगती, करिमा बलोच, हरबियार मार्री यांच्याविरुद्ध देशद्रोह, देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा प्रयत्न करण्याचे गुन्हे नोंदविले आहेत. शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळे आणण्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नेत्यांविरुद्ध काही बलोची नागरिकांनी पाच पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. त्याआधारे पाचही पोलीस ठाण्यांमध्ये या नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. या गुन्ह्यांसाठी पाकिस्तानात मोठ्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र या नेत्यांवर कारवाई झाल्यास त्याची तीव्र प्रतिक्रिया बलोचिस्तानात उमटू शकेल. (वृत्तसंस्था) >पंतप्रधान मोदी यांना केले होते आवाहनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात गिलगिट आणि बलोचिस्तानमधील अत्याचारांचा उल्लेख केल्यामुळे पाकिस्तानचा संतापच झाला. भारत आमच्या देशात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोपही पाकतर्फे करण्यात आला. मात्र बलोचिस्तानी जनतेला आपली बाजू मोदी मांडत असल्याचा आनंद झाला. तेथील अनेक नेत्यांनी मोदी यांच्या विधानाचे स्वागत व अभिनंदन केले. तेथील एक सेलिब्रिटी करिमा बलोच यांनी तर उघडपणे मोदी यांचे अभिनंदन करताना भारतीय पंतप्रधानांनी बलोची जनतेचा आवाज बनावे, असे आवाहन केले होते.>बलोच व गिलगिट आंदोलकांना दडपण्यास सरकार जे मार्ग अवलंबत आहे, त्यामुळे आंदोलनाला जोर चढत असल्याचे सांगण्यात येते.