शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

बलोच नेत्यांवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे

By admin | Updated: August 23, 2016 05:11 IST

अत्याचाराचा उल्लेख केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणाऱ्या बलोची नेत्यांवर पाकिस्तानात राष्ट्रद्रोहाचे गुन्हे नोंदविण्यात आले

इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलोचिस्तानातील जनतेवर पाकिस्तान सरकारकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचाराचा उल्लेख केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणाऱ्या बलोची नेत्यांवर पाकिस्तानात राष्ट्रद्रोहाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. बलोची जनतेचा मोदी यांच्या विधानांना पाठिंबा असल्याचे वक्तव्य या बलोची नेत्यांनी केले होते.गेली अनेक वर्षे बलोचिस्तानात पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. या जनतेवर पाकिस्तान सरकार आणि पोलीस सातत्याने अन्याय आणि अत्याचार करीत आहेत. काश्मिरात पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीची भारताची तक्रार जुनी आहे. त्यातच अलीकडील काळात काश्मीर खोऱ्यात जो हिंसाचार सुरू आहे, त्यातही पाकचा हात असल्याचे भारताने म्हटले आहे. मात्र काश्मीर प्रश्नावर भारताने आपल्याशी चर्चा करावी, असे पाकिस्तानचे म्हणणे असून, ते फेटाळून लावत, भारताने बलोचिस्तानातील अत्याचारांचा उल्लेख केला होता.या साऱ्या प्रकारामुळे पाकिस्तान पोलिसांनी ब्रह्मदाग बुगती, करिमा बलोच, हरबियार मार्री यांच्याविरुद्ध देशद्रोह, देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा प्रयत्न करण्याचे गुन्हे नोंदविले आहेत. शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळे आणण्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नेत्यांविरुद्ध काही बलोची नागरिकांनी पाच पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. त्याआधारे पाचही पोलीस ठाण्यांमध्ये या नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. या गुन्ह्यांसाठी पाकिस्तानात मोठ्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र या नेत्यांवर कारवाई झाल्यास त्याची तीव्र प्रतिक्रिया बलोचिस्तानात उमटू शकेल. (वृत्तसंस्था) >पंतप्रधान मोदी यांना केले होते आवाहनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात गिलगिट आणि बलोचिस्तानमधील अत्याचारांचा उल्लेख केल्यामुळे पाकिस्तानचा संतापच झाला. भारत आमच्या देशात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोपही पाकतर्फे करण्यात आला. मात्र बलोचिस्तानी जनतेला आपली बाजू मोदी मांडत असल्याचा आनंद झाला. तेथील अनेक नेत्यांनी मोदी यांच्या विधानाचे स्वागत व अभिनंदन केले. तेथील एक सेलिब्रिटी करिमा बलोच यांनी तर उघडपणे मोदी यांचे अभिनंदन करताना भारतीय पंतप्रधानांनी बलोची जनतेचा आवाज बनावे, असे आवाहन केले होते.>बलोच व गिलगिट आंदोलकांना दडपण्यास सरकार जे मार्ग अवलंबत आहे, त्यामुळे आंदोलनाला जोर चढत असल्याचे सांगण्यात येते.