शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

चीनमधल्या भारतीयासंमोर वाजला नरेंद्र मोदींचा डंका

By admin | Updated: May 16, 2015 15:40 IST

शांघायमधल्या भारतीयांसमोर नेहमीच्या ओघवत्या शैलीत भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांची मने जिंकली आणि शांघायमध्येही मोदी मोदी असा गजर घुमला.

ऑनलाइन लोकमत 
शांघाय, दि. १६ - शांघायमधल्या भारतीयांसमोर नेहमीच्या ओघवत्या शैलीत भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांची मने जिंकली आणि शांघायमध्येही मोदी मोदी असा गजर घुमला.
चीन आणि भारत हे दोन देश एकत्र येत केवळ स्वताचंच नाही तर जगाचं भलं करू शकतात असे सांगणा-या मोदींनी चीनमधल्या भारतीयांनीही महत्त्वाची भूमिका बजावावी असं आवाहन केलं. मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- हे शतक आशियाचं आहे त्यामुळे चीन व भारत यांचं हे शतक असल्याचं मोदी म्हणाले. - चीनमध्ये असलेल्या प्रत्येक भारतीयाने वर्षाला पाच चिनी नागरिकांना भारतात यायला उद्युक्त केलं तर केवळ पर्यटनाला चालना मिळणार नाही तर चिनी लोकांना भारत समजायला मदत होईल.
- ज्यावेळी जगात पर्यावरण संकटात नव्हतं त्यावेळी भारतीय ऋषीमुनींनी निसर्गावर प्रेम करायला शिकवलं. सकाळी उठल्यावर जमिनीला पाय लावण्याआधी पृथ्वीमातेला नमन करण्याचे संस्कार आपल्यावर झाले आहेत. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगवरही भारत उत्तर शोधेल असं मोदी म्हणाले. 
- जगाला सध्या आतंकवादानं ग्रासलं असून वसुधैव कुटुंबकम हा हजारो वर्षांपूर्वी मंत्र जपणारा भारत यावर जगाला मदत करेल असं मोदी म्हणाले.
- चीन आणि भारत दोघांची लोकसंख्या मिळून जगाच्या एक तृतीयांश असून हे दोन्ही देश एकत्र आले तर केवळ त्यांचंच भलं होणार नाही तर ते जगाचं भलं करतिल.
- चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी बीजिंगच्या बाहेर जाऊन दुस-या शहरात अन्य देशांच्या प्रतिनिधीमंडळाचे स्वागत केल्याची घटना इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचे सांगत, हे स्वागत मोदींचे नव्हते तर सव्वाशे करोड भारतीयांचे होते असे मोदी म्हणाले.
- उद्या रविवारी मंगोलियाने सुट्टीच्या दिवशी संसदेचे अधिवेशन बोलावले असून मी सहभागी होणार आहे, असे सांगत नरेंद्र मोदींनी काळ बदलला असल्याचे सांगितले.
- गेल्या एका वर्षात माझ्या सरकारवर कुठलेही भलते सलते आरोप झाले नाहीत हे आमचे यश असल्याचे मोदी म्हणाले.
- माझ्या विरोधकांनी माझ्यावर खूप टीका केली होती, परंतु मी गेल्या एका वर्षात दिलेल्या वचनांना जागलो की नाही असे विचारत उपस्थित भारतीयांकडून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद वदवून घेतला.
- लोकसभेचा ऐतिहासिक निकाल लागल्याला आज बरोबर एक वर्ष झालं आणि दुखभरे दिन संपले आणि चांगले दिवस आले.
- शांघायमध्ये मोदींच्या नावाचा गजर. लवकरच शांघायमधल्या भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण होणार असून सुमारे ७००० भारतीय मोदींचे भाषण ऐकण्यासाठी आतूर झाले आहेत.