शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
5
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
6
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
7
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
9
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
10
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
11
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
12
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
13
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
14
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
15
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
17
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
19
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
20
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!

चीनमधल्या भारतीयासंमोर वाजला नरेंद्र मोदींचा डंका

By admin | Updated: May 16, 2015 15:40 IST

शांघायमधल्या भारतीयांसमोर नेहमीच्या ओघवत्या शैलीत भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांची मने जिंकली आणि शांघायमध्येही मोदी मोदी असा गजर घुमला.

ऑनलाइन लोकमत 
शांघाय, दि. १६ - शांघायमधल्या भारतीयांसमोर नेहमीच्या ओघवत्या शैलीत भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांची मने जिंकली आणि शांघायमध्येही मोदी मोदी असा गजर घुमला.
चीन आणि भारत हे दोन देश एकत्र येत केवळ स्वताचंच नाही तर जगाचं भलं करू शकतात असे सांगणा-या मोदींनी चीनमधल्या भारतीयांनीही महत्त्वाची भूमिका बजावावी असं आवाहन केलं. मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- हे शतक आशियाचं आहे त्यामुळे चीन व भारत यांचं हे शतक असल्याचं मोदी म्हणाले. - चीनमध्ये असलेल्या प्रत्येक भारतीयाने वर्षाला पाच चिनी नागरिकांना भारतात यायला उद्युक्त केलं तर केवळ पर्यटनाला चालना मिळणार नाही तर चिनी लोकांना भारत समजायला मदत होईल.
- ज्यावेळी जगात पर्यावरण संकटात नव्हतं त्यावेळी भारतीय ऋषीमुनींनी निसर्गावर प्रेम करायला शिकवलं. सकाळी उठल्यावर जमिनीला पाय लावण्याआधी पृथ्वीमातेला नमन करण्याचे संस्कार आपल्यावर झाले आहेत. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगवरही भारत उत्तर शोधेल असं मोदी म्हणाले. 
- जगाला सध्या आतंकवादानं ग्रासलं असून वसुधैव कुटुंबकम हा हजारो वर्षांपूर्वी मंत्र जपणारा भारत यावर जगाला मदत करेल असं मोदी म्हणाले.
- चीन आणि भारत दोघांची लोकसंख्या मिळून जगाच्या एक तृतीयांश असून हे दोन्ही देश एकत्र आले तर केवळ त्यांचंच भलं होणार नाही तर ते जगाचं भलं करतिल.
- चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी बीजिंगच्या बाहेर जाऊन दुस-या शहरात अन्य देशांच्या प्रतिनिधीमंडळाचे स्वागत केल्याची घटना इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचे सांगत, हे स्वागत मोदींचे नव्हते तर सव्वाशे करोड भारतीयांचे होते असे मोदी म्हणाले.
- उद्या रविवारी मंगोलियाने सुट्टीच्या दिवशी संसदेचे अधिवेशन बोलावले असून मी सहभागी होणार आहे, असे सांगत नरेंद्र मोदींनी काळ बदलला असल्याचे सांगितले.
- गेल्या एका वर्षात माझ्या सरकारवर कुठलेही भलते सलते आरोप झाले नाहीत हे आमचे यश असल्याचे मोदी म्हणाले.
- माझ्या विरोधकांनी माझ्यावर खूप टीका केली होती, परंतु मी गेल्या एका वर्षात दिलेल्या वचनांना जागलो की नाही असे विचारत उपस्थित भारतीयांकडून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद वदवून घेतला.
- लोकसभेचा ऐतिहासिक निकाल लागल्याला आज बरोबर एक वर्ष झालं आणि दुखभरे दिन संपले आणि चांगले दिवस आले.
- शांघायमध्ये मोदींच्या नावाचा गजर. लवकरच शांघायमधल्या भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण होणार असून सुमारे ७००० भारतीय मोदींचे भाषण ऐकण्यासाठी आतूर झाले आहेत.