शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तेलाच्या घसरत्या किंंमतीचा आखाती देशांमधल्या भारतीयांना सर्वाधिक फटका

By admin | Updated: January 22, 2016 16:15 IST

तेलाच्या घसरत्या किंमतींचा आखाती देशातील अर्थव्यवस्थांना चांगलाच फटका बसला असून, त्याचा सर्वाधिक परिणाम आखाती देशांमध्ये रहाणा-या भारतीयांवर होत आहे.

ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. २२ -  जागतिक तेल बाजारातील तेलाच्या घसरत्या किंमतींचा आखाती देशातील अर्थव्यवस्थांना चांगलाच फटका बसला असून, त्याचा सर्वाधिक परिणाम आखाती देशांमध्ये रहाणा-या भारतीयांवर होत आहे. तेलाच्या घसरलेल्या किंमतींमुळे उत्पन्न वाढवण्यासाठी आखाती देशांनी कठोर आर्थिक उपायोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यात परदेशी नागरीकांच्या उत्पनावर कर आकारण्याची योजना आहे. त्याचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसेल. कारण बहुसंख्य भारतीय मोठया संख्येने आखाती देशांमध्ये स्थायिक आहेत. 
 
 
संभाव्य परिणामांचा विचार करुन तिथे रहाणा-या भारतीय नोकरदार, अधिका-यांनी आपल्या कुटुंबाला भारतात पाठवण्यास सुरुवात केली आहे. विशेषकरुन ओमानने परदेशी नागरीकांच्या उत्पनावर परिणाम करणा-या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली आहे.
 
दुबई वगळता आखाती देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे तेलावर अवलंबून आहे. तेल दराच्या घसरणीमुळे तिथे नोकरकपात सुरु असून, अनेक कंपन्यांनी वेतनवाढ रोखली आहे. अनेक मंजूर केलेले प्रकल्पही रद्द केले आहेत. 
 
जीसीसी देशाच्या संघटनेने नवीन कर लावले असून, देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. जीसीसी देशांनी सहा महिन्यापूर्वी परदेशी नागरीकांच्या उत्पनावर इन्कम टॅक्स सुरु केला तर, यूएईची व्हॅट लागू करण्याची प्रक्रिया सुरु आहे. घर भाडयाचे प्रचंड वाढलेले दर आणि मुलांच्या शाळा प्रवेशामध्ये येणा-या अडचणी हे भारतीय कुटुंब माघारी येण्यामागची प्रमुख कारणे आहेत. 
 
आखातील देशातील अनेक कंपन्या नोकर कपात किंवा वेतन कपात करत आहेत असे सरकारी अधिका-याने सांगितले. आम्हा मध्यमवर्गीयांची इथे फार दयनीय अवस्था झाली आहे. ज्या कंपन्या आपल्या कर्मचा-यांच्या निवासाची व्यवस्था करत नाहीत त्यांना घरभाडयापोटी प्रचंड रक्कम खर्च करावी लागत असून, संपूर्ण कुटुंबाला सोबत ठेवणे कठिण झाले आहे असे इथे रहाणा-या एका भारतीयाने सांगितले. 
 
 - संयुक्त अरब अमिरातीची एकूण लोकसंख्या सुमारे ९४ लाख आहे, ज्यामध्ये भारतीयांचे प्रमाण २६ लाख म्हणजे तब्बल २७ टक्के आहे.
 
 - भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व श्रीलंका या देशातील नागरिकांचे अरब अमिरातीचे प्रमाण बघितले तर ते तब्बल ५५ टक्के आहे.
-  संयुक्त अरब अमिरातीतील मूळच्या नागरिकांची संख्या ११ लाखाच्या आसपास असून एकूण लोकसंख्येच्या ती ११ टक्के एवढी आहे. (संदर्भ bq-magazine.com)
- विदेशांमध्ये वास्तव्यास असलेले अनिवासी भारतीय, दरवर्षी सुमारे ७० अब्ज डॉलर्स भारतात पाठवतात. यामध्ये संयुक्त अरब अमिरातीतून धाडण्यात आलेले पैसे सुमारे १५ अब्ज डॉलर्स आहेत.