शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

सुरळीत वाहतुकीबाबत बैठकीतून सोपस्कार

By admin | Updated: August 27, 2014 01:35 IST

जालना : नवीन व जुना जालना भागातील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून जिल्हा महसूल प्रशासनाने सोमवारी घेतलेल्या संयुक्त बैठकीतून वाहतुकीसंदर्भात थातूरमातूर चर्चा करण्यात आली

दिल्ली/मुंबई : पश्चिम आफ्रिकी देशात इबोला या आजाराने निर्माण केलेल्या दहशतीदरम्यान लायबेरिया व नायजेरियातून भारतात आलेल्या नागरिकांची अतिशय कडक तपासणी केली जात असून दिल्ली विमानतळावर आलेल्या ६ नागरिकांना विमानतळ प्रशासनाने इबोला चाचणीसाठी ४० दिवसांकरिता वेगळे ठेवले असल्याचे तर मुंबई विमानतळावर आलेल्या ८५ नागरिकांमध्ये इबोलाची कुठलीच लक्षणे आढळली नसल्याने विमानतळ आरोग्य संघटनेने घोषित केले आहे. इबोलाग्रस्त देशात या आजाराने १४०० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत.दिल्ली विमानतळावर उतरलेल्या व रुग्णालयात दाखल केलेल्या प्रवाशांमध्ये दोन महिला व एका बालकाचा समावेश असून त्यांच्यात इबोलाची लक्षणे आढळतात अथवा नाही यावर लक्ष ठेवले जाणार आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत दाखल झालेले हे प्रवासी तीन गटात आले असून आज दिवसभरात आणखीही काही प्रवासी येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. २० प्रवाशांचा एक गट साऊथ आफ्रिकन एअरवेजच्या विमानाने येथे पोहचला. त्यांची तपासणी करण्यात येऊन त्यांच्यात इबोलाची लक्षणे आढळली नसल्याचे विमानतळ प्रशासनाने जाहीर केले. लायबेरियाहून आलेले ४६ भारतीयांचे दुसरे पथक येथे पोहचले. या सर्व प्रवाशांची तपासणी करून त्यांना निरोगी जाहीर करण्यात आले. नायजेरियाहून आलेल्या १९ अन्य भारतियांचीही तपासणी करून त्यांना निरोगी घोषित करण्यात आले. इबोलाग्रस्त देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या ४४,७०० एवढी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)