शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

सौदी अरेबियातील नव्या करामुळे अनेक भारतीयांचे कुटुंबीय माघारी

By admin | Updated: June 23, 2017 00:21 IST

सौदी अरेबिया सरकारच्या एका नवीन करामुळे परदेशांतून तिथे रोजगारासाठी गेलेल्यांना नव्या त्रासाला तोंड द्यावे लागणार आहे.

रियाध : सौदी अरेबिया सरकारच्या एका नवीन करामुळे परदेशांतून तिथे रोजगारासाठी गेलेल्यांना नव्या त्रासाला तोंड द्यावे लागणार आहे. अनेक भारतीय सौदी अरेबियामध्ये असून, या करामुळे अनेक भारतीयांच्या कुटुंबीयांना भारतात परतावे लागण्याची चिन्हे आहेत. सौदी अरेबियाने परदेशातून आलेल्या लोकांवर अवलंबून असलेल्यांवर १ जुलैपासून अवलंबित्व कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमामुळे सौदी अरेबियात रोजगार करणाऱ्यांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमागे दरमहा १०० रियाल म्हणजे १७00 रुपये अवलंबित्व कर द्यावा लागेल. एखादा कर्मचारी तिथे पत्नी व दोन मुलांसह राहत असेल, तर त्याला दरमहा ३00 रियाल म्हणजेच तब्बल ५१00 रुपये कर भरावा लागेल. सौदी अरेबियामध्ये ४१ लाख भारतीय राहतात. त्या देशातील परदेशी नागरिकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. या निर्णयामुळे अनेक भारतीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांना भारतामध्ये परत पाठवायला सुरुवातही केली आहे. कराचा हा बोजा मोठा आहे आणि तो भरणे आम्हाला शक्य नाही, त्यामुळे आम्ही कुटुंबांना परत पाठवायचे ठरवले आहे, असे काही भारतीयांनी बोलूनही दाखविले आहे. ज्यांचे मासिक उत्पन्न दरमहा पाच हजार रियालहून (८५ हजार रुपये) अधिक आहे, त्यांनाच त्या देशात फॅमिली व्हिसा दिला जातो. एवढे उत्पन्न असणाऱ्यांना कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार प्रत्येकी १00 रियाल इतका कर देणे भागच आहे. इतकेच नव्हे, तर पुढील चार वर्षांत म्हणजे २0१0 पर्यंत या कराची रक्कम वाढवली जाणार आहे. याचा फटका भारतीयांसह सर्वच परदेशी कामगार, कर्मचाऱ्यांना बसणार आहे. परराष्ट्र मंत्रालय मात्र अजूनही गप्पभारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सौदी अरेबिया प्रशासनाशी यासंदर्भात चर्चा करावी, अशी येथील भारतीयांची इच्छा आहे. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने यावर बोलण्यास नकार दिला आहे. शिवाय अन्य देशाने कोणावर आणि किती कर लावावा, हे भारताने सांगणे शक्यही नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबातील अधिकाधिक व्यक्तींना मायदेशी पाठवणे हाच भारतीयांपुढे पर्याय आहे.