शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

सौदी अरेबियातील नव्या करामुळे अनेक भारतीयांचे कुटुंबीय माघारी

By admin | Updated: June 23, 2017 00:21 IST

सौदी अरेबिया सरकारच्या एका नवीन करामुळे परदेशांतून तिथे रोजगारासाठी गेलेल्यांना नव्या त्रासाला तोंड द्यावे लागणार आहे.

रियाध : सौदी अरेबिया सरकारच्या एका नवीन करामुळे परदेशांतून तिथे रोजगारासाठी गेलेल्यांना नव्या त्रासाला तोंड द्यावे लागणार आहे. अनेक भारतीय सौदी अरेबियामध्ये असून, या करामुळे अनेक भारतीयांच्या कुटुंबीयांना भारतात परतावे लागण्याची चिन्हे आहेत. सौदी अरेबियाने परदेशातून आलेल्या लोकांवर अवलंबून असलेल्यांवर १ जुलैपासून अवलंबित्व कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमामुळे सौदी अरेबियात रोजगार करणाऱ्यांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमागे दरमहा १०० रियाल म्हणजे १७00 रुपये अवलंबित्व कर द्यावा लागेल. एखादा कर्मचारी तिथे पत्नी व दोन मुलांसह राहत असेल, तर त्याला दरमहा ३00 रियाल म्हणजेच तब्बल ५१00 रुपये कर भरावा लागेल. सौदी अरेबियामध्ये ४१ लाख भारतीय राहतात. त्या देशातील परदेशी नागरिकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. या निर्णयामुळे अनेक भारतीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांना भारतामध्ये परत पाठवायला सुरुवातही केली आहे. कराचा हा बोजा मोठा आहे आणि तो भरणे आम्हाला शक्य नाही, त्यामुळे आम्ही कुटुंबांना परत पाठवायचे ठरवले आहे, असे काही भारतीयांनी बोलूनही दाखविले आहे. ज्यांचे मासिक उत्पन्न दरमहा पाच हजार रियालहून (८५ हजार रुपये) अधिक आहे, त्यांनाच त्या देशात फॅमिली व्हिसा दिला जातो. एवढे उत्पन्न असणाऱ्यांना कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार प्रत्येकी १00 रियाल इतका कर देणे भागच आहे. इतकेच नव्हे, तर पुढील चार वर्षांत म्हणजे २0१0 पर्यंत या कराची रक्कम वाढवली जाणार आहे. याचा फटका भारतीयांसह सर्वच परदेशी कामगार, कर्मचाऱ्यांना बसणार आहे. परराष्ट्र मंत्रालय मात्र अजूनही गप्पभारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सौदी अरेबिया प्रशासनाशी यासंदर्भात चर्चा करावी, अशी येथील भारतीयांची इच्छा आहे. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने यावर बोलण्यास नकार दिला आहे. शिवाय अन्य देशाने कोणावर आणि किती कर लावावा, हे भारताने सांगणे शक्यही नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबातील अधिकाधिक व्यक्तींना मायदेशी पाठवणे हाच भारतीयांपुढे पर्याय आहे.