शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

मंगळयानाचे काम व्यवस्थित सुरू

By admin | Updated: September 13, 2014 02:12 IST

मंगळ ग्रहाच्या अगदी जवळ पोहोचलेल्या भारताच्या मंगळयानाने आपले काम व्यवस्थित सुरू असल्याचा संदेश भारताला पाठवला आहे

नवी दिल्ली : मंगळ ग्रहाच्या अगदी जवळ पोहोचलेल्या भारताच्या मंगळयानाने आपले काम व्यवस्थित सुरू असल्याचा संदेश भारताला पाठवला आहे. येत्या २४ सप्टेंबर रोजी ते मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.या यानाने पाठविलेल्या या संदेशात आपली सर्व यंत्रणा उत्तमरीतीने काम करीत असल्याचे म्हटले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) टिष्ट्वटरवर प्रसिद्ध केलेल्या एका नोंदीनुसार, हे मंगळयान इस्रोकडे नियमितरूपाने संदेश पाठवीत आहे. त्यांना टेलीमेट्री सिग्नल असे संबोधले जाते. शुक्रवारी मिळालेल्या या संदेशानुसार हे यान ठरल्याबरहुकूम काम करीत आहे. या यानाने आपला ९५ टक्के प्रवास पूर्ण केला असून, मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी त्याला आपल्या तरल इंजिनाला पुन्हा सुरू करण्याचे आव्हानात्मक काम करावे लागणार आहे. हे इंजिन गेल्या दहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले होते. मंगळाच्या कक्षेत शिरण्यासाठी यानाला सध्याच्या असलेल्या २२ कि.मी. प्रति सेकंद या वेगाला कमी करून दीड कि.मी.प्रति सेकंद करणे गरजेचे आहे. इस्रोच्या मते, गरज पडल्यास १४ सप्टेंबरला मंगळयानाच्या दिशेला बदलले जाईल व नंतर १६ व १७ तारखांना मंगळग्रहाच्या कक्षेत शिरण्याचा सराव या यानाकडून करवून घेतला जाईल. या मोहिमेत २५० अभियंते सहभागी होणार आहेत. २१ सप्टेंबर रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत शिरण्यासाठी यानाला संबंधित आज्ञा दिल्या जातील व २२ रोजी त्याच्या तरल इंजिनाची चाचणी घेतली जाणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)