शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

आम्हाला मोकळे सोडा, मग भारताला दाखवतो, मसुद अझरने ओकली गरळ

By admin | Updated: October 13, 2016 11:43 IST

भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी काश्मीरमध्ये दहशतवादी समुह वाढण्यात यावेत, यासाठी पाकिस्तानच्या सरकारने हिम्मत दाखवावी, असे सांगत त्याने पाकिस्तानी सरकारलाच चुचकारले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 13 - कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए- मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली आहे. भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी काश्मीरमध्ये जिहादी समुह वाढण्यात यावेत, यासाठी पाकिस्तानच्या सरकारने हिम्मत दाखवावी, असे सांगत त्याने पाकिस्तानी सरकारलाच चुचकारले आहे. जैश-ए-मोहम्मदचे मॅगझिन अल-कलामद्वारे अझरने ही गरळ ओकली आहे. निर्णायक निर्णय घेण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे पाकिस्तान काश्मीरमधील ऐतिहासिक संधी गमावू शकतो, असेही त्याने म्हटले आहे. मसूद अझरच्या या मागणीमुळे भारत आणि पाकिस्तानातील संबंध आणखी ताणण्याची शक्यता आहे. 
 
काश्मीरमधील दहशतवादी हालचाली वाढवण्यासाठी पाकिस्तान सरकारने थोडेशी जरी हिम्मत दाखवली, तरी काश्मीरमधील समस्या, येथील पाण्यासंदर्भातील वाद संपुष्टात येतील, हे जमत नसेल तर, सरकारने जिहादींचे मार्ग मोकळे करावेत, अशी थेट मागणी त्याने मॅगझिनद्वारे केली आहे. असे झाल्यास 1971मधील कटू आठवणी या वर्षातील विजयामुळे पुसल्या जातील, असेही म्हणत अझरने विष पेरण्याचे काम केले आहे. अखंड भारत हे भारताचे स्वप्न आहे, मात्र जिहादी समुहांनी त्यांचे अंग-अंग जखमी केल्यामुळे अखंड भारताची त्यांची आशा अपूर्ण राहिली आहे.  तसेच, पठाणकोट आणि उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराची क्षमता किती आहे, हे उघड झाल्याचे देखील त्याने म्हटले आहे.  दरम्यान,1990 पासून चालत आलेल्या जिहादी नीतीमुळे पाकिस्तानला फायदा झाल्याचा दावाही त्याने केला आहे.  
 
आणखी बातम्या 
उरी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानावर दबाव निर्माण करत आहे. मात्र काश्मीममधील परिस्थिती पाहिली असता, पाकिस्तानने भारतावर दबाव टाकायला हवा होता, असेही त्याने पाकिस्तानी सरकारला डिवचण्याचे काम केले आहे. काश्मीर हा आपल्यासाठी जीवन मरणाचा मुद्दा असून, सार्क परिषद आणि नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी आपण रद्द करायला हवी होती. काश्मीरमधील जिहाद आधीचा आणि नंतरच्या भारताबाबत विचार करा, तुम्हाला यात मोठा फरक जाणवेल. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय लष्कराला धक्का बसला आहे, असा कांगावाही त्याने केला आहे, असा पोकळ दावाही त्याने केला आहे.  
 
दरम्यान, भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादी समुहांविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यावरुन पाकिस्तानचे सरकार आणि त्यांच्या लष्करातच मतभेद असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी डॉनचे पत्रकार सायरिल अलमिडा यांनी छापली होती. याप्रकरणी त्यांच्यावर देशाबाहेर जाण्यासाठी बंदीही घालण्यात आली.