शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला मोकळे सोडा, मग भारताला दाखवतो, मसुद अझरने ओकली गरळ

By admin | Updated: October 13, 2016 11:43 IST

भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी काश्मीरमध्ये दहशतवादी समुह वाढण्यात यावेत, यासाठी पाकिस्तानच्या सरकारने हिम्मत दाखवावी, असे सांगत त्याने पाकिस्तानी सरकारलाच चुचकारले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 13 - कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए- मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली आहे. भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी काश्मीरमध्ये जिहादी समुह वाढण्यात यावेत, यासाठी पाकिस्तानच्या सरकारने हिम्मत दाखवावी, असे सांगत त्याने पाकिस्तानी सरकारलाच चुचकारले आहे. जैश-ए-मोहम्मदचे मॅगझिन अल-कलामद्वारे अझरने ही गरळ ओकली आहे. निर्णायक निर्णय घेण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे पाकिस्तान काश्मीरमधील ऐतिहासिक संधी गमावू शकतो, असेही त्याने म्हटले आहे. मसूद अझरच्या या मागणीमुळे भारत आणि पाकिस्तानातील संबंध आणखी ताणण्याची शक्यता आहे. 
 
काश्मीरमधील दहशतवादी हालचाली वाढवण्यासाठी पाकिस्तान सरकारने थोडेशी जरी हिम्मत दाखवली, तरी काश्मीरमधील समस्या, येथील पाण्यासंदर्भातील वाद संपुष्टात येतील, हे जमत नसेल तर, सरकारने जिहादींचे मार्ग मोकळे करावेत, अशी थेट मागणी त्याने मॅगझिनद्वारे केली आहे. असे झाल्यास 1971मधील कटू आठवणी या वर्षातील विजयामुळे पुसल्या जातील, असेही म्हणत अझरने विष पेरण्याचे काम केले आहे. अखंड भारत हे भारताचे स्वप्न आहे, मात्र जिहादी समुहांनी त्यांचे अंग-अंग जखमी केल्यामुळे अखंड भारताची त्यांची आशा अपूर्ण राहिली आहे.  तसेच, पठाणकोट आणि उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराची क्षमता किती आहे, हे उघड झाल्याचे देखील त्याने म्हटले आहे.  दरम्यान,1990 पासून चालत आलेल्या जिहादी नीतीमुळे पाकिस्तानला फायदा झाल्याचा दावाही त्याने केला आहे.  
 
आणखी बातम्या 
उरी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानावर दबाव निर्माण करत आहे. मात्र काश्मीममधील परिस्थिती पाहिली असता, पाकिस्तानने भारतावर दबाव टाकायला हवा होता, असेही त्याने पाकिस्तानी सरकारला डिवचण्याचे काम केले आहे. काश्मीर हा आपल्यासाठी जीवन मरणाचा मुद्दा असून, सार्क परिषद आणि नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी आपण रद्द करायला हवी होती. काश्मीरमधील जिहाद आधीचा आणि नंतरच्या भारताबाबत विचार करा, तुम्हाला यात मोठा फरक जाणवेल. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय लष्कराला धक्का बसला आहे, असा कांगावाही त्याने केला आहे, असा पोकळ दावाही त्याने केला आहे.  
 
दरम्यान, भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादी समुहांविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यावरुन पाकिस्तानचे सरकार आणि त्यांच्या लष्करातच मतभेद असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी डॉनचे पत्रकार सायरिल अलमिडा यांनी छापली होती. याप्रकरणी त्यांच्यावर देशाबाहेर जाण्यासाठी बंदीही घालण्यात आली.