शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

खुर्शीद पाकमध्ये जाऊन मोदीवर बरसले, तर शरीफ यांचे कौतुक केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2015 12:52 IST

क्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या पाकच्या प्रयत्नांना भारताने योग्य प्रतिसाद दिला नाही असे सांगत काँग्रेस नेते व माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी मोदींवर टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

कराची, दि. १३ - दक्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या पाकच्या प्रयत्नांना भारताने योग्य प्रतिसाद दिला नाही असे सांगत काँग्रेस नेते व माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी मोदींवर टीका केली आहे.  खुर्शीद यांनी पाकमध्ये झालेल्या एका सेमिनारमध्ये हे विधान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 

गुरुवारी इस्लामाबादमधील जीना इन्स्टिट्यूट येथे सलमान खुर्शीद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना थेट नरेंद्र मोदींवर टीका केली तर दुसरीकडे नवाझ शरीफ यांचे कौतुक केले. पाकिस्तानमध्ये एक्सप्रेस ट्रिब्यूनमधील वृत्तानुसार खुर्शीद म्हणाले, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून त्यांची दूरदृष्टी दाखवली. पण भारतातील सरकार पाकिस्तानच्या शांततेच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.   

नरेंद्र मोदी सध्या राजनेता होण्याचे धडे गिरवत असून भारताला पाकिस्तानसोबतची चर्चा पुढे न्यायची असेल तर मोदींनी इस्लामाबादमधील सत्ता केंद्राला अस्थिर करण्याऐवजी त्यांचे लक्ष ठेवले पाहिजे असा सल्लाही त्यांनी मोदींना दिला आहे. १९४७ पासून जगाने अनेक किचकट प्रश्नावर तोडगा काढला. पण भारत - पाकिस्तानमधील वाद अजूनही कायम आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाविरोधात पाकिस्तानच्या मोहीमेचे खुर्शीद यांनी कौतुक केले आहे.  

भारत - पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण असतानाच भारतातील नेत्याने पाकिस्तानमध्ये जाऊन देशातील सत्ताधा-यांवर टीका केल्याने वाद निर्माण झाला आहे.