शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
3
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
4
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
5
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
6
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
7
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
8
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
9
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
10
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
11
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
12
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
13
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
14
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
15
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
16
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
17
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
19
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
20
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
Daily Top 2Weekly Top 5

कायमच मोडला अर्ध्यावर डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:08 IST

‘पंजाब का शेर’ अशी ज्यांची ओळख आहे ते नवाज शरीफ तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले; पण दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत.

इस्लामाबाद : ‘पंजाब का शेर’ अशी ज्यांची ओळख आहे ते नवाज शरीफ तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले; पण दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. कधी राष्ट्रपती कार्यालयामुळे, तर कधी लष्कराच्या उठावामुळे आणि आता न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्या हातून सत्ता गेली.पाकिस्तानच्या राजकारणातील मोठे प्रस्थ आणि राजकारणातील एक मोठे कुटुंब म्हणून नवाज शरीफ यांच्याकडे बघितले जाते. जून २०१३ मध्ये ते तिसºयांदा पंतप्रधान झाले. या काळात अनेक अडचणीही आल्या; पण पनामागेट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरविले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पाकिस्तान एका राजकीय संकटात सापडला आहे. अर्थव्यवस्थेसमोरील अडचणी आणि वाढता दहशतवाद यांचे आव्हान समोर असतानाच देशात राजकीय संकट उभे ठाकले आहे. एक सक्षम नेते म्हणून ओळख असलेले शरीफ पनामा प्रकरणात मात्र स्वत:च समस्यांमध्ये अडकले. शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर विदेशात अवैध संपत्ती घेणे, ब्रिटिश आयलँडमध्ये कंपनी सुरू केल्याचा आरोप होता. याबाबत राष्ट्राला उद्देशून भाषण करताना शरीफ यांनी आपल्या कुटुंबाच्या व्यवसायाचा उल्लेख केला होता. आपल्या दिवंगत वडिलांनी व्यवसायाची उभारणी केली होती. लंडन आणि अन्य ठिकाणी खरेदी केलेल्या संपत्तीचा हा व्यवसायच स्रोत असल्याचे त्यांनी सांगितले होते.पोलिसांची भूमिका पक्षपातीजेआयटीने १० जुलै रोजी आपला अहवाल न्यायालयाला सोपविला होता आणि शरीफ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे नवे प्रकरण दाखल करण्याची शिफारस केली होती. हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत शरीफ यांनी तेव्हा राजीनामा देण्यास नकार दिला होता. २०१३ च्या निवडणुकीत शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग (पीएमएल-एन) हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. शरीफ यांचा जन्म १९४९ मध्ये लाहोरमध्ये एका श्रीमंत कुटुंबात झाला. इंग्रजी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यांनी वडिलांच्या स्टील कंपनीत काम सुरू केले. त्यानंतर शरीफ यांनी राजकारणात प्रवेश केला. अगोदर अर्थमंत्री आणि नंतर ते पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री झाले. १९९० मध्ये ते पंतप्रधान झाले आणि त्यानंतर आता तिसºयांदा पंतप्रधान झाले होते. मात्र, पनामा प्रकरणाने ते हा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत.