शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जपानचे अणुसहकार्य

By admin | Updated: November 12, 2016 02:53 IST

जपानने भारतासोबत शुक्रवारी अणुऊर्जेच्या शांततापूर्ण उपयोगात सहकार्य करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे भारताला जपानकडून अणुऊर्जेच्या उत्पादनासाठी आवश्यक इंधन

टोकियो : जपानने भारतासोबत शुक्रवारी अणुऊर्जेच्या शांततापूर्ण उपयोगात सहकार्य करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे भारताला जपानकडून अणुऊर्जेच्या उत्पादनासाठी आवश्यक इंधन, उपकरणे आणि तंत्रज्ञान मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न केलेल्या देशाशी हा करार न करण्याचा जपानचा निर्धार होता. तथापि, त्याने खास भारतासाठी अपवाद केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्यातील शिखर बैठकीनंतर त्यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांनी ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली. याशिवाय दोन्ही देशांदरम्यान अंतराळासह विविध क्षेत्रांत इतरही नऊ करार झाले. अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी न केलेला भारत असा पहिला देश आहे ज्याच्याशी जपानने नागरी अणुसहकार्य करार केला. या करारामुळे अणुऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून देशाची विजेची गरज भागवून भारताला विकासाच्या मार्गावर मोठी मजल मारता येणार आहे. जपानी पंतप्रधानांच्या गेल्यावर्षीच्या भारत दौऱ्यादरम्यान या करारावर सहमती झाली होती. अलीकडेच त्यांना अंतिम स्वरूप देण्यात आले होते. या करारामुळे ४८ देशांच्या अणुइंधन पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. आजचे करार उभय देशांनी स्वच्छ ऊर्जेत भागीदारी तयार करण्याच्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. शिंजो अबे यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोन देशांतील सहा वर्षांच्या कठीण वाटाघाटीनंतर हा करार अस्तित्वात आला आहे. लोकशाही देश असल्यामुळे उभय देश खुलेपणा, पारदर्शकता व कायद्याच्या राज्याचे समर्थन करतात. दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या आमच्या निर्धाराबाबतही आम्ही एकजूट आहोत, असे मोदी म्हणाले. अबे म्हणाले की, अणुऊर्जेच्या शांततामय वापराच्या करारावर स्वाक्षरी झाल्याचा मला आनंद वाटतो. या कराराला कायदेशीर चौकट आहे. अणुऊर्जेच्या शांततामय वापरात भारत जबाबदारीने वागेल तसेच त्याने अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केली नसली तरी तो त्या कराराचे बंधन पाळेल.भारत ही अमर्याद संधींची भूमी - मोदीभारत ‘अमर्याद संधींची भूमी’ असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी जपानी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी निमंत्रण दिले. आपल्या देशात विकासकामे पूर्ण करण्यास मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता असून, त्यासाठी गुंतवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले. भारताला जगातील सर्वात मुक्त अर्थव्यवस्था बनविण्यास सुधारणा सुरू असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. जपानमधील प्रमुख उद्योजक, व्यावसायिकांना संबोधित करताना ते बोलत होते. भारताला जपानहून अधिक गुंतवणूक हवी असून, त्यासाठी आम्ही तुमच्या चिंता दूर करण्याकरिता अधिक सक्रियतेने काम करू, असे ते म्हणाले. ‘मेक इन इंडिया’ला उत्तेजन देण्यास धोरणे आणि प्रक्रियांना आणखी सुलभ करण्यास माझे सरकार कटिबद्ध आहे. यासाठी आपले सरकार स्थिर, विश्वसनीय आणि पारदर्शक नियामक प्रणाली लागू करीत आहे, असे ते म्हणाले. जीएसटी अमलात आणण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीचाही त्यांनी ऊहापोह केला.