शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

जपानचे अणुसहकार्य

By admin | Updated: November 12, 2016 02:53 IST

जपानने भारतासोबत शुक्रवारी अणुऊर्जेच्या शांततापूर्ण उपयोगात सहकार्य करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे भारताला जपानकडून अणुऊर्जेच्या उत्पादनासाठी आवश्यक इंधन

टोकियो : जपानने भारतासोबत शुक्रवारी अणुऊर्जेच्या शांततापूर्ण उपयोगात सहकार्य करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे भारताला जपानकडून अणुऊर्जेच्या उत्पादनासाठी आवश्यक इंधन, उपकरणे आणि तंत्रज्ञान मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न केलेल्या देशाशी हा करार न करण्याचा जपानचा निर्धार होता. तथापि, त्याने खास भारतासाठी अपवाद केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्यातील शिखर बैठकीनंतर त्यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांनी ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली. याशिवाय दोन्ही देशांदरम्यान अंतराळासह विविध क्षेत्रांत इतरही नऊ करार झाले. अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी न केलेला भारत असा पहिला देश आहे ज्याच्याशी जपानने नागरी अणुसहकार्य करार केला. या करारामुळे अणुऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून देशाची विजेची गरज भागवून भारताला विकासाच्या मार्गावर मोठी मजल मारता येणार आहे. जपानी पंतप्रधानांच्या गेल्यावर्षीच्या भारत दौऱ्यादरम्यान या करारावर सहमती झाली होती. अलीकडेच त्यांना अंतिम स्वरूप देण्यात आले होते. या करारामुळे ४८ देशांच्या अणुइंधन पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. आजचे करार उभय देशांनी स्वच्छ ऊर्जेत भागीदारी तयार करण्याच्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. शिंजो अबे यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोन देशांतील सहा वर्षांच्या कठीण वाटाघाटीनंतर हा करार अस्तित्वात आला आहे. लोकशाही देश असल्यामुळे उभय देश खुलेपणा, पारदर्शकता व कायद्याच्या राज्याचे समर्थन करतात. दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या आमच्या निर्धाराबाबतही आम्ही एकजूट आहोत, असे मोदी म्हणाले. अबे म्हणाले की, अणुऊर्जेच्या शांततामय वापराच्या करारावर स्वाक्षरी झाल्याचा मला आनंद वाटतो. या कराराला कायदेशीर चौकट आहे. अणुऊर्जेच्या शांततामय वापरात भारत जबाबदारीने वागेल तसेच त्याने अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केली नसली तरी तो त्या कराराचे बंधन पाळेल.भारत ही अमर्याद संधींची भूमी - मोदीभारत ‘अमर्याद संधींची भूमी’ असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी जपानी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी निमंत्रण दिले. आपल्या देशात विकासकामे पूर्ण करण्यास मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता असून, त्यासाठी गुंतवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले. भारताला जगातील सर्वात मुक्त अर्थव्यवस्था बनविण्यास सुधारणा सुरू असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. जपानमधील प्रमुख उद्योजक, व्यावसायिकांना संबोधित करताना ते बोलत होते. भारताला जपानहून अधिक गुंतवणूक हवी असून, त्यासाठी आम्ही तुमच्या चिंता दूर करण्याकरिता अधिक सक्रियतेने काम करू, असे ते म्हणाले. ‘मेक इन इंडिया’ला उत्तेजन देण्यास धोरणे आणि प्रक्रियांना आणखी सुलभ करण्यास माझे सरकार कटिबद्ध आहे. यासाठी आपले सरकार स्थिर, विश्वसनीय आणि पारदर्शक नियामक प्रणाली लागू करीत आहे, असे ते म्हणाले. जीएसटी अमलात आणण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीचाही त्यांनी ऊहापोह केला.