शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

"अखेरच्या बुलेटपर्यंत लढलो, जेव्हा गोळ्या संपल्या तेव्हा..."; पोलिसाने सांगितली थरारक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:34 IST

जर पाकिस्तानी सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ते प्रवाशांना मारून ट्रेनही जाळतील अशी धमकी बंडखोरांनी ओलीस बनवलेल्या लोकांना दिली.

जाफर एक्सप्रेस हायजॅक करून १०० हून अधिक लोकांना ओलीस ठेवल्यानंतर ३० तासांनी पाकिस्तानी लष्कराला मोठं यश मिळालं आहे. जाफर एक्सप्रेसमधील सर्व ओलीस ठेवलेल्या लोकांना बंडखोरांकडून सोडवण्यात आलं आहे. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या ३३ बंडखोरांचा खात्मा करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये २१ प्रवाशांचाही जीव गेल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी यांनी दिली आहे.

एका रिपोर्टनुसार, पाकिस्तानी लष्कराने ३०० हून अधिक जणांची सुटका केली आहे. या ट्रेनमध्ये ४०० प्रवाशांपैकी १०० सुरक्षा दलाचे जवान होते. यापैकी एका पोलीस अधिकाऱ्याने ट्रेन हायजॅकची संपूर्ण कहाणी सांगितली. तो म्हणाला की, ट्रेन हायजॅकची घटना खूप भयंकर होती. माझे सहकारी अखेरच्या गोळीपर्यंत बंडखोरांशी लढत राहिलो. हल्ल्याच्या वेळी ट्रेन कुठल्याही बोगद्यात जात नव्हती. ट्रॅकवर एक स्फोट झाला आणि अचानक ट्रेन थांबली. त्यानंतर काही वेळाने आसपासच्या डोंगरातून दहशतवादी बाहेर पडले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला असं त्याने सांगितले.

तसेच ते चहुबाजुने हल्ला करत होते, शेकडोच्या संख्येने होते आणि आम्ही केवळ ७५ पोलीस अधिकारी होतो. त्याशिवाय काही अर्धबल सैनिक होते. जेव्हा बंडखोर ट्रेनच्या दिशेने यायला लागले तेव्हा आम्ही आमच्याकडे जेवढ्या गोळ्या होत्या त्याचा वापर करायचे ठरवले. टीमने एकएक करून गोळीबारी सुरू ठेवली आणि बंडखोरांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे जितका शस्त्रसाठा होता त्याचा वापर केला. दीड तास आमच्यात आणि बंडखोरांमध्ये चकमक सुरू होती अशी थरारक कहाणी पोलीस अधिकाऱ्याने सांगितली.

दरम्यान, आमच्याकडील गोळ्या संपल्यानंतर बंडखोरांना ट्रेनवर कब्जा करण्याची संधी मिळाली. बंडखोरांनी सर्वात आधी ट्रेनमधील प्रवास करणाऱ्या पोलिसांना ताब्यात घेतले. त्यांनी सर्व प्रवाशांना खाली उतरवले होते. प्रवाशांची ओळख पटवून त्यांना वेगवेगळे केले जात होते. जर पाकिस्तानी सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ते प्रवाशांना मारून ट्रेनही जाळतील अशी धमकी बंडखोरांनी ओलीस बनवलेल्या लोकांना दिली.

बंडखोरांच्या तावडीतून कसे सुटले?

घटनेवेळी रात्र झाली तेव्हा बहुतांश हल्लेखोर तिथून निघून गेले आणि केवळ २०-२५ बंडखोर ओलीस प्रवाशांसोबत तिथे सुरक्षेसाठी थांबले. काही ओलीस ठेवलेल्या लोकांनी पळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना गोळी मारून ठार केले. पळून चाललेले लोक गोळी लागल्याने जमिनीवर कोसळून पडत होते. हायजॅकच्या दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रंटियर कॉर्प्सच्या अतिरिक्त दलाकडे बंडखोरांचे लक्ष गेले तेव्हा त्या संधीचा फायदा घेत काही पोलीस अधिकारी बंडखोरांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादी