शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

"अखेरच्या बुलेटपर्यंत लढलो, जेव्हा गोळ्या संपल्या तेव्हा..."; पोलिसाने सांगितली थरारक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:34 IST

जर पाकिस्तानी सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ते प्रवाशांना मारून ट्रेनही जाळतील अशी धमकी बंडखोरांनी ओलीस बनवलेल्या लोकांना दिली.

जाफर एक्सप्रेस हायजॅक करून १०० हून अधिक लोकांना ओलीस ठेवल्यानंतर ३० तासांनी पाकिस्तानी लष्कराला मोठं यश मिळालं आहे. जाफर एक्सप्रेसमधील सर्व ओलीस ठेवलेल्या लोकांना बंडखोरांकडून सोडवण्यात आलं आहे. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या ३३ बंडखोरांचा खात्मा करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये २१ प्रवाशांचाही जीव गेल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी यांनी दिली आहे.

एका रिपोर्टनुसार, पाकिस्तानी लष्कराने ३०० हून अधिक जणांची सुटका केली आहे. या ट्रेनमध्ये ४०० प्रवाशांपैकी १०० सुरक्षा दलाचे जवान होते. यापैकी एका पोलीस अधिकाऱ्याने ट्रेन हायजॅकची संपूर्ण कहाणी सांगितली. तो म्हणाला की, ट्रेन हायजॅकची घटना खूप भयंकर होती. माझे सहकारी अखेरच्या गोळीपर्यंत बंडखोरांशी लढत राहिलो. हल्ल्याच्या वेळी ट्रेन कुठल्याही बोगद्यात जात नव्हती. ट्रॅकवर एक स्फोट झाला आणि अचानक ट्रेन थांबली. त्यानंतर काही वेळाने आसपासच्या डोंगरातून दहशतवादी बाहेर पडले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला असं त्याने सांगितले.

तसेच ते चहुबाजुने हल्ला करत होते, शेकडोच्या संख्येने होते आणि आम्ही केवळ ७५ पोलीस अधिकारी होतो. त्याशिवाय काही अर्धबल सैनिक होते. जेव्हा बंडखोर ट्रेनच्या दिशेने यायला लागले तेव्हा आम्ही आमच्याकडे जेवढ्या गोळ्या होत्या त्याचा वापर करायचे ठरवले. टीमने एकएक करून गोळीबारी सुरू ठेवली आणि बंडखोरांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे जितका शस्त्रसाठा होता त्याचा वापर केला. दीड तास आमच्यात आणि बंडखोरांमध्ये चकमक सुरू होती अशी थरारक कहाणी पोलीस अधिकाऱ्याने सांगितली.

दरम्यान, आमच्याकडील गोळ्या संपल्यानंतर बंडखोरांना ट्रेनवर कब्जा करण्याची संधी मिळाली. बंडखोरांनी सर्वात आधी ट्रेनमधील प्रवास करणाऱ्या पोलिसांना ताब्यात घेतले. त्यांनी सर्व प्रवाशांना खाली उतरवले होते. प्रवाशांची ओळख पटवून त्यांना वेगवेगळे केले जात होते. जर पाकिस्तानी सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ते प्रवाशांना मारून ट्रेनही जाळतील अशी धमकी बंडखोरांनी ओलीस बनवलेल्या लोकांना दिली.

बंडखोरांच्या तावडीतून कसे सुटले?

घटनेवेळी रात्र झाली तेव्हा बहुतांश हल्लेखोर तिथून निघून गेले आणि केवळ २०-२५ बंडखोर ओलीस प्रवाशांसोबत तिथे सुरक्षेसाठी थांबले. काही ओलीस ठेवलेल्या लोकांनी पळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना गोळी मारून ठार केले. पळून चाललेले लोक गोळी लागल्याने जमिनीवर कोसळून पडत होते. हायजॅकच्या दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रंटियर कॉर्प्सच्या अतिरिक्त दलाकडे बंडखोरांचे लक्ष गेले तेव्हा त्या संधीचा फायदा घेत काही पोलीस अधिकारी बंडखोरांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादी