शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

"अखेरच्या बुलेटपर्यंत लढलो, जेव्हा गोळ्या संपल्या तेव्हा..."; पोलिसाने सांगितली थरारक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:34 IST

जर पाकिस्तानी सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ते प्रवाशांना मारून ट्रेनही जाळतील अशी धमकी बंडखोरांनी ओलीस बनवलेल्या लोकांना दिली.

जाफर एक्सप्रेस हायजॅक करून १०० हून अधिक लोकांना ओलीस ठेवल्यानंतर ३० तासांनी पाकिस्तानी लष्कराला मोठं यश मिळालं आहे. जाफर एक्सप्रेसमधील सर्व ओलीस ठेवलेल्या लोकांना बंडखोरांकडून सोडवण्यात आलं आहे. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या ३३ बंडखोरांचा खात्मा करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये २१ प्रवाशांचाही जीव गेल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी यांनी दिली आहे.

एका रिपोर्टनुसार, पाकिस्तानी लष्कराने ३०० हून अधिक जणांची सुटका केली आहे. या ट्रेनमध्ये ४०० प्रवाशांपैकी १०० सुरक्षा दलाचे जवान होते. यापैकी एका पोलीस अधिकाऱ्याने ट्रेन हायजॅकची संपूर्ण कहाणी सांगितली. तो म्हणाला की, ट्रेन हायजॅकची घटना खूप भयंकर होती. माझे सहकारी अखेरच्या गोळीपर्यंत बंडखोरांशी लढत राहिलो. हल्ल्याच्या वेळी ट्रेन कुठल्याही बोगद्यात जात नव्हती. ट्रॅकवर एक स्फोट झाला आणि अचानक ट्रेन थांबली. त्यानंतर काही वेळाने आसपासच्या डोंगरातून दहशतवादी बाहेर पडले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला असं त्याने सांगितले.

तसेच ते चहुबाजुने हल्ला करत होते, शेकडोच्या संख्येने होते आणि आम्ही केवळ ७५ पोलीस अधिकारी होतो. त्याशिवाय काही अर्धबल सैनिक होते. जेव्हा बंडखोर ट्रेनच्या दिशेने यायला लागले तेव्हा आम्ही आमच्याकडे जेवढ्या गोळ्या होत्या त्याचा वापर करायचे ठरवले. टीमने एकएक करून गोळीबारी सुरू ठेवली आणि बंडखोरांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे जितका शस्त्रसाठा होता त्याचा वापर केला. दीड तास आमच्यात आणि बंडखोरांमध्ये चकमक सुरू होती अशी थरारक कहाणी पोलीस अधिकाऱ्याने सांगितली.

दरम्यान, आमच्याकडील गोळ्या संपल्यानंतर बंडखोरांना ट्रेनवर कब्जा करण्याची संधी मिळाली. बंडखोरांनी सर्वात आधी ट्रेनमधील प्रवास करणाऱ्या पोलिसांना ताब्यात घेतले. त्यांनी सर्व प्रवाशांना खाली उतरवले होते. प्रवाशांची ओळख पटवून त्यांना वेगवेगळे केले जात होते. जर पाकिस्तानी सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ते प्रवाशांना मारून ट्रेनही जाळतील अशी धमकी बंडखोरांनी ओलीस बनवलेल्या लोकांना दिली.

बंडखोरांच्या तावडीतून कसे सुटले?

घटनेवेळी रात्र झाली तेव्हा बहुतांश हल्लेखोर तिथून निघून गेले आणि केवळ २०-२५ बंडखोर ओलीस प्रवाशांसोबत तिथे सुरक्षेसाठी थांबले. काही ओलीस ठेवलेल्या लोकांनी पळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना गोळी मारून ठार केले. पळून चाललेले लोक गोळी लागल्याने जमिनीवर कोसळून पडत होते. हायजॅकच्या दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रंटियर कॉर्प्सच्या अतिरिक्त दलाकडे बंडखोरांचे लक्ष गेले तेव्हा त्या संधीचा फायदा घेत काही पोलीस अधिकारी बंडखोरांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादी