शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भारत-पाक चर्चा रद्द होणे दुर्भाग्यपूर्ण - अमेरिका

By admin | Updated: August 19, 2014 12:12 IST

पाकिस्तानसोबत होणारी सचिव स्तरावरील चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय दुर्दैवी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १९ - पाकिस्तानसोबत होणारी सचिव स्तरावरील चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय दुर्दैवी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. फुटिरतावाद्यांशी पाकिस्तानने चर्चा केल्यामुळे भारताने पाकिस्तानविरोधात हे कडक पाऊल उचलले आहे. 
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते मारी हार्फ यांच्या म्हणण्यानुसार, भारत व पाकिस्तानदरम्यान होणारी चर्चा रद्द होणे दुर्दैवी आहे. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. अमेरिकेकडून दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी नेहमीच मदत करण्यात येईल, असेही आमचे दोन्ही देशांना सांगणे असल्याचे, हार्फ म्हणाले. तसेच काश्मीर मुद्याबाबत अमेरिकेची भूमिका बदललेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिका-याने सोमवारी एका विघटनवाद्यासोबत बैठक घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला ‘भारत किंवा विघटनवादी यापैकी एकाचीच निवड करावी लागेल’ या शब्दात विदेश सचिव सुजाता सिंग यांनी भारताची नाराजी कळवली. २५ ऑगस्ट रोजी इस्लामाबाद येथे दोन देशांदरम्यान सचिव स्तरावरील चर्चा होणार होती. सध्याच्या वातावरणात या चर्चेचा उद्देश साध्य होणार नाही, असेही भारताने स्पष्ट केले. 
भारत व पाकिस्तान दोघांसाठी महत्त्वाच्या असलेल्या काश्मिर प्रश्नावर दोन देशांमध्ये चर्चा होणार होती. मात्र, पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी हुरियतच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावलं.
त्यामुळे भारताने पाकिस्तानशी चर्चा न करण्याची भूमिका घेत पाकिस्तानला 'एकतर भारताशी चर्चा करा नाहीतर फुटीरतावाद्यांशी' असा  खणखणीत इशारा दिला.