शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

भारत-पाक चर्चा रद्द होणे दुर्भाग्यपूर्ण - अमेरिका

By admin | Updated: August 19, 2014 12:12 IST

पाकिस्तानसोबत होणारी सचिव स्तरावरील चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय दुर्दैवी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १९ - पाकिस्तानसोबत होणारी सचिव स्तरावरील चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय दुर्दैवी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. फुटिरतावाद्यांशी पाकिस्तानने चर्चा केल्यामुळे भारताने पाकिस्तानविरोधात हे कडक पाऊल उचलले आहे. 
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते मारी हार्फ यांच्या म्हणण्यानुसार, भारत व पाकिस्तानदरम्यान होणारी चर्चा रद्द होणे दुर्दैवी आहे. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. अमेरिकेकडून दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी नेहमीच मदत करण्यात येईल, असेही आमचे दोन्ही देशांना सांगणे असल्याचे, हार्फ म्हणाले. तसेच काश्मीर मुद्याबाबत अमेरिकेची भूमिका बदललेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिका-याने सोमवारी एका विघटनवाद्यासोबत बैठक घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला ‘भारत किंवा विघटनवादी यापैकी एकाचीच निवड करावी लागेल’ या शब्दात विदेश सचिव सुजाता सिंग यांनी भारताची नाराजी कळवली. २५ ऑगस्ट रोजी इस्लामाबाद येथे दोन देशांदरम्यान सचिव स्तरावरील चर्चा होणार होती. सध्याच्या वातावरणात या चर्चेचा उद्देश साध्य होणार नाही, असेही भारताने स्पष्ट केले. 
भारत व पाकिस्तान दोघांसाठी महत्त्वाच्या असलेल्या काश्मिर प्रश्नावर दोन देशांमध्ये चर्चा होणार होती. मात्र, पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी हुरियतच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावलं.
त्यामुळे भारताने पाकिस्तानशी चर्चा न करण्याची भूमिका घेत पाकिस्तानला 'एकतर भारताशी चर्चा करा नाहीतर फुटीरतावाद्यांशी' असा  खणखणीत इशारा दिला.