शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करणे जरूरी

By admin | Updated: September 26, 2015 02:55 IST

प्रत्येकाला सुरक्षित वाटेल, सर्वांना संधी असेल आणि सर्वांचा आदर होईल, अशा नवीन विश्वाची स्थापना करण्याची हाक देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची

न्यूयॉर्क : प्रत्येकाला सुरक्षित वाटेल, सर्वांना संधी असेल आणि सर्वांचा आदर होईल, अशा नवीन विश्वाची स्थापना करण्याची हाक देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची विश्वसनीयता आणि प्रासंगिकता कायम राहावी म्हणून सुरक्षा परिषदेत व्यापक सुधारणा करणे जरूरी असल्याचे आग्रही प्रतिपादन युनोच्या आमसभेत केले.विकसित देश विकास आणि हवामानातील बदलाबाबत स्वार्थाचा विचार न करता आपापली वित्तीय जबाबदारी पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अलिप्त राहून या आव्हानांचा मुकाबला करणे शक्य नाही. त्यांनी महात्मा गांधी आणि पं. दीनदयाल उपाध्याय यांचाही भाषणात उल्लेख केला.जगातून दारिद्र्याचे निर्मूलन करण्याची गरज अधोरेखित करताना मोदी म्हणाले की, जगाच्या पाठीवर १.३ अब्ज लोकांना दारिद्र्यात जीवन जगावे लागत आहे. भारताने दारिद्र्य निर्मूलन, सर्वसमावेशी विकास, महिला सशक्तीकरण, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी योजलेल्या उपाययोजनांचाही पंतप्रधान मोदी यांनी भाषणात उल्लेख केला.‘सर्वेपि सुखिन: संतु सर्वे संतु निरायम:, सर्वे भद्राणि पश्यंतु मा कश्चिद दु:ख माप्नुयात..’ या शांतीमंत्राने अवघ्या विश्वासाठी मंगलमय कामना करीत पंतप्रधान मोदी यांनी भाषणाचा शेवट केला.दरम्यान, महत्त्वाकांक्षी टिकाऊ विकासाच्या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मंजुरी दिली. येत्या १५ वर्षांत दारिद्र्य आणि उपासमार हद्दपार करून लैंगिक समानतेसह सर्वांना आदरासह संधी उपलब्ध करणे, हा या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा उद्देश आहे. या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधान मोदी यांच्या समवेत जगभरातील नेते उपस्थित होते.येत्या १५ वर्षांत १७ महत्त्वाकांक्षी उद्देशांची पूर्तता करण्यात येणार असून यात दारिद्र्य निर्मूलन, उपासमार संपुष्टात आणण्यासह उच्च शिक्षण, लैंगिक समानता, शुद्ध पेयजल आणि स्वच्छतेचा समावेश आहे.