शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करणे जरूरी

By admin | Updated: September 26, 2015 02:55 IST

प्रत्येकाला सुरक्षित वाटेल, सर्वांना संधी असेल आणि सर्वांचा आदर होईल, अशा नवीन विश्वाची स्थापना करण्याची हाक देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची

न्यूयॉर्क : प्रत्येकाला सुरक्षित वाटेल, सर्वांना संधी असेल आणि सर्वांचा आदर होईल, अशा नवीन विश्वाची स्थापना करण्याची हाक देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची विश्वसनीयता आणि प्रासंगिकता कायम राहावी म्हणून सुरक्षा परिषदेत व्यापक सुधारणा करणे जरूरी असल्याचे आग्रही प्रतिपादन युनोच्या आमसभेत केले.विकसित देश विकास आणि हवामानातील बदलाबाबत स्वार्थाचा विचार न करता आपापली वित्तीय जबाबदारी पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अलिप्त राहून या आव्हानांचा मुकाबला करणे शक्य नाही. त्यांनी महात्मा गांधी आणि पं. दीनदयाल उपाध्याय यांचाही भाषणात उल्लेख केला.जगातून दारिद्र्याचे निर्मूलन करण्याची गरज अधोरेखित करताना मोदी म्हणाले की, जगाच्या पाठीवर १.३ अब्ज लोकांना दारिद्र्यात जीवन जगावे लागत आहे. भारताने दारिद्र्य निर्मूलन, सर्वसमावेशी विकास, महिला सशक्तीकरण, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी योजलेल्या उपाययोजनांचाही पंतप्रधान मोदी यांनी भाषणात उल्लेख केला.‘सर्वेपि सुखिन: संतु सर्वे संतु निरायम:, सर्वे भद्राणि पश्यंतु मा कश्चिद दु:ख माप्नुयात..’ या शांतीमंत्राने अवघ्या विश्वासाठी मंगलमय कामना करीत पंतप्रधान मोदी यांनी भाषणाचा शेवट केला.दरम्यान, महत्त्वाकांक्षी टिकाऊ विकासाच्या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मंजुरी दिली. येत्या १५ वर्षांत दारिद्र्य आणि उपासमार हद्दपार करून लैंगिक समानतेसह सर्वांना आदरासह संधी उपलब्ध करणे, हा या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा उद्देश आहे. या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधान मोदी यांच्या समवेत जगभरातील नेते उपस्थित होते.येत्या १५ वर्षांत १७ महत्त्वाकांक्षी उद्देशांची पूर्तता करण्यात येणार असून यात दारिद्र्य निर्मूलन, उपासमार संपुष्टात आणण्यासह उच्च शिक्षण, लैंगिक समानता, शुद्ध पेयजल आणि स्वच्छतेचा समावेश आहे.