शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

इस्लामिक स्टेटकडून २१ जणांचा शिरच्छेद

By admin | Updated: February 17, 2015 02:38 IST

इसिस वा इस्लामिक स्टेटस्ने आपल्या क्रौर्याची परिसीमा गाठत नवी चित्रफीत प्रसिद्ध केली

कैरो : इसिस वा इस्लामिक स्टेटस्ने आपल्या क्रौर्याची परिसीमा गाठत नवी चित्रफीत प्रसिद्ध केली असून, या चित्रफितीत लिबियाच्या किनारपट्टीवर इजिप्तमधील ख्रिश्चन समाजाच्या २१ नागरिकांचे सामूहिक हत्याकांड दाखविले आहे. ओलिस असणारे २१ इजिप्शियन नागरिक केशरी पोशाखात हात मागे बांधून उभे आहेत व हल्लेखोर त्यांचे शिरकाण करत आहे.ही चित्रफित प्रसिद्ध झाल्यानंतर इजिप्तने लिबिया या शेजारी देशाावर तत्काळ हवाई हल्ले सुरु केले असून, इजिप्तने वाढत्या दहशतवादाविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. ही चित्रफित पाच मिनिटाची असून, लिबियाची राजधानी त्रिपोलीजवळील एका किनारपट्टीवर हे हत्याकांड घडत असताना दिसत आहे.या चित्रफितीमुळे इसिस पुन्हा क्रूर हत्याकांडाकडे वळताना दिसत आहे. या हल्ल्यातील एका दहशतवाद्याने रोमवर विजय मिळवू असा इशारा दिला आहे. या चित्रफितीनंतर इजिप्तमध्ये सात दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे. या चित्रफितीची भीषणता पाहिल्यानंतर प्रथमच इजिप्तने लिबियाविरोधात लष्करी कारवाईची जाहीर घोषणा केली आहे.ओसामा बिन लादेनच्या शरीरात जे रक्त खेळत होते, तेच रक्त आता तुमच्या रक्तात मिसळणार आहे असे एक दहशतवादी बोलताना दिसत आहे. या नागरिकांचे गेल्या महिन्यात लिबियातून अपहरण झाले होते. नागरिकांची हत्या करून इसिसच्या जिहादींनी इजिप्तचे रक्त सांडले आहे. त्यामुळे त्याचा सूड घेणे भाग आहे. इजिप्त आपल्या नागरिकांचे संरक्षण कोणत्याही पातळीपर्यंत जाऊन करणार असून, दहशतवादाचा बीमोड करतील, असे लष्कराचे प्रवक्ते, मोहंमद समीर यांनी या निवेदनात म्हटले आहे. इजिप्तमध्ये कॉप्टिक ख्रिश्चन नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्के आहे. इजिप्तमध्ये २०११ साली झालेल्या क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन नागरिक लिबियात गेले आहेत. सोमवारी झालेल्या लष्करी कारवाईत तीन लहान मुले व दोन महिला असे नागरिक मारले गेले. (वृत्तसंस्था)चित्रफीत प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासांनी इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांनी सरकारी टीव्हीवर जनतेला उद्देशून भाषण केले असून, या भीषण हत्याकांडाचा अशा प्रकारे प्रतिकार करणे हा इजिप्तचा हक्क असल्याचे म्हटले आहे. या हत्याकांडाचा बदला घेण्याची ही योग्य रीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ख्रिश्चन नागरिकांची अशाप्रकारे करण्यात आलेली हत्या, या विषारी हल्ल्यानंतर दहशतवादाचा जगाला विळखा घालणाऱ्या विषवल्लीचा बीमोड झालाच पाहिजे, असे अल सीसी यांनी म्हटले आहे.