शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आयएसने केली ३९ भारतीयांची हत्या?

By admin | Updated: November 28, 2014 14:59 IST

इराकमधील इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या ४० भारतीयांपैकी ३९ जणांची हत्या केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिल्याने खळबळ माजली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८ -  इराकमधील इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या ४० भारतीयांपैकी ३९ जणांची हत्या केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिल्याने खळबळ माजली आहे. दोन बांगलादेशी नागरिकांच्या निवेदनाच्या आधारे हे वृत्त देण्याच आले आहे. केंद्र सरकारने मात्र हा दावा त्वरित फेटाळून लावला आहे. इराकमध्ये  पाच महिन्यांपूर्वी ४० भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते, 
आयएसच्या तावडीतून जिवंत वाचलेल्या भारतीय नागरिक हरजित याच्याशी  या दोन बांगलादेशी नागरिकांशी नागरिकांनी संपर्क साधल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे. कुर्दिस्तानची राजधानी असलेल्या एर्बिल येथे शफी व हसन या दोन बांगलादेशी नागरिकांशी बोलल्यानंतर ३९ भारतीयांची हत्या करण्यात आल्याचा दावा वाहिनीने केला आहे.
आयएसच्या तावडीतून कसाबसा जीव वाचवून पळालेल्या हरजितने इतर सर्व भारतीयांची हत्या करण्यात आली असे शफी व हसन यांना सांगितले. हरजितलाही दोन गोळ्या घालण्यात आल्या होत्या, मात्र त्याने मरण्याचे नाटक केले व संधी मिळताच तो तिथून पळाला. पाच महिन्यांपूर्वी मोसूलहून बगदाद येथे जाताना ४० भारतीयांचे अपहरण केले. आयएसने एकूण ५१ बांगलादेशी व ४० भारतीयांना बंदी बनवले होते,  असे शफीने सांगितले. 
दरम्यान भारतीय सुरक्षा अधिका-यांनीही याआधी हरजितची मुलाखत घेतली होती. त्यावेळी हरजितकडून मिळालेली माहिती व आत्ता बांगलादेशी नागरिकांनी दिलेली माहिती याच बराच फरक असल्याचे सांगत आयएसच्या ताब्यातील भारतीयांची हत्या करण्यात आल्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.