शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

आयएसने केली ३९ भारतीयांची हत्या?

By admin | Updated: November 28, 2014 14:59 IST

इराकमधील इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या ४० भारतीयांपैकी ३९ जणांची हत्या केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिल्याने खळबळ माजली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८ -  इराकमधील इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या ४० भारतीयांपैकी ३९ जणांची हत्या केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिल्याने खळबळ माजली आहे. दोन बांगलादेशी नागरिकांच्या निवेदनाच्या आधारे हे वृत्त देण्याच आले आहे. केंद्र सरकारने मात्र हा दावा त्वरित फेटाळून लावला आहे. इराकमध्ये  पाच महिन्यांपूर्वी ४० भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते, 
आयएसच्या तावडीतून जिवंत वाचलेल्या भारतीय नागरिक हरजित याच्याशी  या दोन बांगलादेशी नागरिकांशी नागरिकांनी संपर्क साधल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे. कुर्दिस्तानची राजधानी असलेल्या एर्बिल येथे शफी व हसन या दोन बांगलादेशी नागरिकांशी बोलल्यानंतर ३९ भारतीयांची हत्या करण्यात आल्याचा दावा वाहिनीने केला आहे.
आयएसच्या तावडीतून कसाबसा जीव वाचवून पळालेल्या हरजितने इतर सर्व भारतीयांची हत्या करण्यात आली असे शफी व हसन यांना सांगितले. हरजितलाही दोन गोळ्या घालण्यात आल्या होत्या, मात्र त्याने मरण्याचे नाटक केले व संधी मिळताच तो तिथून पळाला. पाच महिन्यांपूर्वी मोसूलहून बगदाद येथे जाताना ४० भारतीयांचे अपहरण केले. आयएसने एकूण ५१ बांगलादेशी व ४० भारतीयांना बंदी बनवले होते,  असे शफीने सांगितले. 
दरम्यान भारतीय सुरक्षा अधिका-यांनीही याआधी हरजितची मुलाखत घेतली होती. त्यावेळी हरजितकडून मिळालेली माहिती व आत्ता बांगलादेशी नागरिकांनी दिलेली माहिती याच बराच फरक असल्याचे सांगत आयएसच्या ताब्यातील भारतीयांची हत्या करण्यात आल्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.