शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

भारत-बांगला सीमावाद संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2015 03:29 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यात ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी झाली. या करारानुसार काही क्षेत्रातील देवाणघेवाणीतून ४१ वर्षे जुन्या असलेल्या सीमा वादावर तोडगा निघू शकतो.

ढाका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यात ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी झाली. या करारानुसार काही क्षेत्रातील देवाणघेवाणीतून ४१ वर्षे जुन्या असलेल्या सीमा वादावर तोडगा निघू शकतो. पर्यायाने द्विपक्षीय संबंधांतील अडथळेही दूर होऊ शकतात. याखेरीज मोदी यांनी भारत आणि बांगलादेशमधील दोन बससेवांचे उद्घाटन केले आणि बांगलादेशास भारताकडून दोन अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचीही घोषणा केली.दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात येथील विद्यापीठात भित्तीपत्रक लावल्याबद्दल बांगलादेशातील कट्टर विचारांची इस्लामी संघटना ‘हिज्ब उत तहरीर’च्या तीन विद्यार्थी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.उभय देशांनी मोदी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत जमीन सीमा कराराशी (लँड बॉर्डर अ‍ॅग्रिमेंट-एलबीए) संबंधित दस्तावेजांची देवाणघेवाण केली. एलबीएला गेल्या महिन्यात भारतीय संसदेने एकमताने संमत केले होते. भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर व बांगलादेशचे परराष्ट्र सचिव शाहिदूल हक यांनी दस्तावेजांवर स्वाक्षरी केली. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी १९७४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी (पान २ वर)बससेवेचा प्रारंभभारत आणि बांगला देशात संपर्क वाढविण्यासाठी नरेंद्र मोदी, शेख हसीना आणि ममता बॅनर्जी यांनी शनिवारी हिरवा झेंडा दाखवून बससेवा सुरू केली. ही बस कोलकाता-ढाका-आगरतळा आणि ढाका-शिलाँग-गुवाहाटीदरम्यान चालेल.मोदींसोबत ममतांचा कारने प्रवासढाका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फारसे चांगले संबंध नसलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी यांच्यासोबत कारने करारावर स्वाक्षरी झाली त्या ठिकाणापर्यंत प्रवास केला. मोदी व बॅनर्जी हे बांगलादेशला स्वतंत्रपणे गेले व त्यांचा मुक्कामही वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये होता.स्वातंत्र्यापासून रेंगाळत राहिलेल्या समस्येची आम्ही सोडवणूक केली आहे. उभय देशांनी सीमेची हद्दबंदी नक्की केली आहे. यामुळे सीमा अधिक सुरक्षित व दोन्ही देशांतील नागरिकांच्या जीवनास अधिक स्थैर्य येईल. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान