शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

भारताच्या पंतप्रधानांचे आरोप निराधार - पाक

By admin | Updated: August 13, 2014 13:30 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले आरोप निराधार असून पाकिस्तानने दहशतवादाला कधीच पाठिंबा दिलेला नाही असे प्रत्युत्तर पाकिस्तानने दिले आहे.

ऑनलाइन टीम

इस्लामाबाद, दि. १३ - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले आरोप निराधार असून पाकिस्तानने दहशतवादाला कधीच पाठिंबा दिलेला नाही असे प्रत्युत्तर पाकिस्तानने दिले आहे. दहशतवादाचा सर्वात मोठा फटका पाकिस्तानलाच बसला आहे असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी काश्मीर दौ-यात पाकवर टीका केली होती. पाकची समोरासमोर युद्ध करण्याची हिंमत नसल्याने ते दहशतवाद्यांच्या माध्यमातून छुपे युद्ध लढतात असे मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या विधानावर बुधवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. 'भारताचे पंतप्रधान मोदींचे आरोप हे निराधार असून पाकने दहशतवादाला पाठिंबा दिलेला नाही. याऊलट पाकिस्तानने आत्तापर्यंत विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये तब्बल ५५ हजार नागरिकांना गमावले आहे. तसेच ५ हजार जवान शहीद झाले' असे पाकने म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्य सीमा रेषेची सुरक्षा करण्यास सक्षम असून ते आगळीक करण्याची धमकी देणा-यांना चोख प्रत्युत्तर देतील असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 
पाकिस्तानचे नेते शेजारी राष्ट्रांसोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचे प्रयत्न करत असताना भारताने असे आरोप करणे अनपेक्षीत आहे. आरोपप्रत्यारोप करण्याऐवजी दोन्ही राष्ट्रांनी वादग्रस्त प्रश्नांवर चर्चेद्वारे तोडगा काढणे गरजेचे आहे असा पाकच्या परराष्ट्र मंत्रायलयाने स्पष्ट केले.