शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

२० वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या भारतीयाचा मृत्यू

By admin | Updated: April 12, 2016 10:26 IST

२० वर्षाहून अधिक काळ पाकिस्तानातील लाहोर तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय नागरीकाचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

लाहोर, दि. १२ - २० वर्षाहून अधिक काळ पाकिस्तानातील लाहोर तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय नागरीकाचा मृत्यू झाला आहे. कीरपाल सिंग (५०) असे या व्यक्तीचे नाव असून, त्याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाली होती. सोमवारी तो सेलमध्ये मृतावस्थेत आढळला. १९९२ साली कीरपालला पाकिस्तानच्या हद्दीत अटक झाली होती. 
 
पंजाब प्रांतातील बॉम्ब स्फोटा प्रकरणी त्याला देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. शवविच्छेदनासाठी कीरपालचा मृतदेह लाहोरच्या जिन्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सहकैद्यांकडे कीरपालच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले की, कीरपालने छातीत दु:खत असल्याची तक्रार केली त्यानंतर लगेचच त्याने प्राण सोडला. 
 
पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील असलेल्या कीरपालची बॉम्ब स्फोटाच्या आरोपातून लाहोर उच्च न्यायालयाने मुक्तता केली होती. पण अज्ञात कारणामुळे त्याची देहदंडाची शिक्षा कायम ठेवली होती. 
 
आर्थिक दुर्बलतेमुळे आम्ही कीरपालच्या सुटकेसाठी आवाज उठवू शकलो नाही आणि कुठल्याही राजकरण्याने किरपालच्या सुटकेचा विषय लावून धरला नाही असे कीरपालची बहिण जागिर कौरने सांगितले. यापूर्वी कोट लखपत जेलमध्ये एप्रिल २०१३ मध्ये सरबजित सिंग या भारतीय कैद्यावर सहकैद्यांनी अत्यंत क्रूर हल्ला केला होता. त्यामध्ये सरबजितचा मृत्यू झाला होता. सरबजितच्या सुटकेचे प्रकरण भारताने लावून धरले होते.