शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

२० वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या भारतीयाचा मृत्यू

By admin | Updated: April 12, 2016 10:26 IST

२० वर्षाहून अधिक काळ पाकिस्तानातील लाहोर तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय नागरीकाचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

लाहोर, दि. १२ - २० वर्षाहून अधिक काळ पाकिस्तानातील लाहोर तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय नागरीकाचा मृत्यू झाला आहे. कीरपाल सिंग (५०) असे या व्यक्तीचे नाव असून, त्याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाली होती. सोमवारी तो सेलमध्ये मृतावस्थेत आढळला. १९९२ साली कीरपालला पाकिस्तानच्या हद्दीत अटक झाली होती. 
 
पंजाब प्रांतातील बॉम्ब स्फोटा प्रकरणी त्याला देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. शवविच्छेदनासाठी कीरपालचा मृतदेह लाहोरच्या जिन्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सहकैद्यांकडे कीरपालच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले की, कीरपालने छातीत दु:खत असल्याची तक्रार केली त्यानंतर लगेचच त्याने प्राण सोडला. 
 
पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील असलेल्या कीरपालची बॉम्ब स्फोटाच्या आरोपातून लाहोर उच्च न्यायालयाने मुक्तता केली होती. पण अज्ञात कारणामुळे त्याची देहदंडाची शिक्षा कायम ठेवली होती. 
 
आर्थिक दुर्बलतेमुळे आम्ही कीरपालच्या सुटकेसाठी आवाज उठवू शकलो नाही आणि कुठल्याही राजकरण्याने किरपालच्या सुटकेचा विषय लावून धरला नाही असे कीरपालची बहिण जागिर कौरने सांगितले. यापूर्वी कोट लखपत जेलमध्ये एप्रिल २०१३ मध्ये सरबजित सिंग या भारतीय कैद्यावर सहकैद्यांनी अत्यंत क्रूर हल्ला केला होता. त्यामध्ये सरबजितचा मृत्यू झाला होता. सरबजितच्या सुटकेचे प्रकरण भारताने लावून धरले होते.