शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

भारताचे पितळ उघडे पडले - पाकिस्तान

By admin | Updated: February 19, 2015 09:46 IST

पाकिस्तानहून आलेल्या संशयास्पद बोटीसंबंधी तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांच्या बेजबाबदार विधानामुळे पाकिस्तानला भारतावर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. १९ - पाकिस्तानहून आलेल्या संशयास्पद बोटीसंबंधी तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांच्या बेजबाबदार विधानामुळे पाकिस्तानला भारतावर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. पाक बोटीमध्ये कसा स्फोट घडला हे भारताने स्पष्ट करावे अशी मागणी पाकिस्तानने केली असून या घटनेमुळे भारताचा दुष्ट चेहरा समोर आला अशी टीकाही पाकिस्तानी नेत्यांनी सुरु केली आहे. 

३१ डिसेंबर २०१४ रोजी गुजरातमधील पोरबंदरजवळील समुद्रात पाकिस्तानमधून आलेली बोट संशयास्पदस्थितीत आढळली होती. या बोटीचा भारताच्या तटरक्षक दलाने पाठलाग केला असता बोटीतील चौघा संशयित दहशतवाद्यांनी बोटीत बाँबस्फोट घडवत बोटीला उडवले असे सांगितले जात होते. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी बोटीतील संशयीत अतिरेक्यांनी स्वतःच बोटीला आग लावून स्फोट घडवून आणला असा दावा केला होता. मात्र बुधवारी तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्ष बी.के. लोशाली यांच्या एका व्हिडीओने केंद्र सरकारची चांगलीच कोंडी केली. त्या बोटीला उडवण्याचे आदेश मीच दिले होते, मला त्या मंडळींना बिर्यानी द्यायची नव्हती असे लोशाली यांनी म्हटल्याचे व्हिडीओत दिसत आहे. लोशाली यांनी संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाशी विसंगत भूमिका मांडल्याने वाद निर्माण झाला असून पाक बोटीचे नेमके झाले काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाकिस्ताननेही यावरुन भारतावर टीका केली.

भारताचा दुष्ट चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला असून त्यांचे शांततेसाठी काय प्रयत्न सुरु आहेत असा खोचक टोलाही पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी लगावला आहे.तर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या घटनेची माहिती मागवल्याचे सांगितले.