शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

भारताच्या दणक्याने पाकिस्तान बिथरला

By admin | Updated: June 11, 2015 23:55 IST

म्यानमारच्या हद्दीत घुसून भारताने १०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर, दहशतवाद्यांना खुलेआम आश्रय देणाऱ्या पाकच्या छातीत धडकी भरली

इस्लामाबाद : म्यानमारच्या हद्दीत घुसून भारताने १०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर, दहशतवाद्यांना खुलेआम आश्रय देणाऱ्या पाकच्या छातीत धडकी भरली असून, पाक बिथरला आहे. पाक म्हणजे म्यानमार नव्हे, पाककडे अण्वस्त्रे आहेत हे विसरू नका, असा इशारा पाक भारताला देत आहे. म्यानमारच्या भूमीचा आश्रय घेऊन भारतात कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. आॅपरेशन फत्ते नावाने केलेल्या या कारवाईत भारताने फक्त ४५ मिनिटांत १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या कारवाईनंतर भारतातील राजकीय पातळीवर या कारवाईची प्रशंसा होत असून, हा पाकलाही इशारा असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पाकिस्तान बिथरला असून, पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली व लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी भारताला लगेचच प्रतिइशारा दिला आहे. पाकिस्तान म्हणजे म्यानमार नव्हे, सीमेपलीकडून आलेल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. पाकविरोधात कोणाचे मनसुबे असतील तर ते उधळून लावू असा इशारा या पाकिस्तानी नेत्यांनी दिला आहे. अशी वक्तव्ये करून या पाक नेत्यांनी भारतातील दहशतवादी कारवायात पाकिस्तानचा हात असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे. (वृत्तसंस्था)