शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी घराघरात पुन्हा लागणार भारतीय टीव्ही मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 17:01 IST

भारतीय टीव्ही मालिकांवर लावण्यात आलेली बंदी पाकिस्तानमधील न्यायालयाने उठवली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - भारतीय टीव्ही मालिकांवर लावण्यात आलेली बंदी पाकिस्तानमधील न्यायालयाने उठवली आहे. "तंत्रज्ञानामुळे देशांमधील अंतर कमी होत चाललं असून सर्वजण जवळ आले आहेत, अशावेळी तुम्ही विनाकारण कोणतीही बंधनं घालू शकत नाही", असं न्यायालयाने खडसावलं आहे. लाहोर उच्च न्यायालयात भारतीय टीव्ही मालिकांवर लावण्यात आलेल्या बंदीविरोधात याचिका करण्यात आली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपलं मत मांडलं, तसंच बंदी उठवली आहे. त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांना पुन्हा एकदा भारतीय मालिका पाहता येणार आहेत.
 
पाकिस्तानात सर्व भारतीय चॅनेल्सवर बंदी
फवाद खान बरळला, "बॉलिवूड कोणाच्या बापाचं नाही"
पाकी सैन्याला संपवणाऱ्या भारतीय जवानाची भूमिका करेल का फवाद खान?
 
लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मन्सूर अली शाह यांनी स्पष्ट केलं की, "एखाद्या मालिकेतील मजकूर आक्षेपार्ह किंवा पाकिस्तानविरोधी असेल तर तुम्ही तो सेन्सर करु शकता. मात्र पुर्ण बंदी आणण्याची काही गरज नाही". 
 
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अॅथोरिटीने (PEMRA) बंदी मागे घेतली असून मालिकांचं प्रसारण करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय मालिकांचं प्रसारण करण्यावर सरकारला काही आक्षेप नसताना, तुम्ही ते घेण्याचं काही कारण दिसत नाही असं सांगत लाहोर उच्च न्यायालयाने बंदी उठवली आहे.
 
गतवर्षी उरी हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते. यानंतर पेमराने ऑक्टोबर महिन्यात सर्व प्रकारच्या भारतीय मजकूरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. अशा प्रकारची एक सूचनाच त्यांनी जारी केली होती. 
 
पेमराच्या बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पेमराला बंदी घालण्याचा कोणताही हक्क नसून पाकिस्तानच्या राज्यघटनेतही तशी तरतूद नाही असा दावा याचिकेत करण्यात आला होता. कारण भारतीय चित्रपट देशभरात प्रदर्शित होण्याची परवानगी दिली असली, तरी ते टीव्हीवर प्रसारित केले जाऊ शकत नाहीत असं सांगत याचिकाकर्त्याने सरकार आपल्या निवडीप्रमाणे देशभक्तीचा आव आणत असल्याचाही आरोप केला होता.
 
पेमराने भारतीय चित्रपटांवर घातलेली बंदी फेब्रुवारी महिन्यात उठवण्यात आली होती. मात्र टीव्ही मालिकांवरील बंदी कायम ठेवण्यात आली होती. भारतामध्ये पाकिस्तानी मालिका, अभिनेत्यांविरोधात भूमिका घेण्यात आल्यानेच पेमराने हा निर्णय घेण्यात आल्याचं पेमराच्या वकिलाने यावेळी सांगितलं होतं.