शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाकिस्तानी घराघरात पुन्हा लागणार भारतीय टीव्ही मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 17:01 IST

भारतीय टीव्ही मालिकांवर लावण्यात आलेली बंदी पाकिस्तानमधील न्यायालयाने उठवली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - भारतीय टीव्ही मालिकांवर लावण्यात आलेली बंदी पाकिस्तानमधील न्यायालयाने उठवली आहे. "तंत्रज्ञानामुळे देशांमधील अंतर कमी होत चाललं असून सर्वजण जवळ आले आहेत, अशावेळी तुम्ही विनाकारण कोणतीही बंधनं घालू शकत नाही", असं न्यायालयाने खडसावलं आहे. लाहोर उच्च न्यायालयात भारतीय टीव्ही मालिकांवर लावण्यात आलेल्या बंदीविरोधात याचिका करण्यात आली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपलं मत मांडलं, तसंच बंदी उठवली आहे. त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांना पुन्हा एकदा भारतीय मालिका पाहता येणार आहेत.
 
पाकिस्तानात सर्व भारतीय चॅनेल्सवर बंदी
फवाद खान बरळला, "बॉलिवूड कोणाच्या बापाचं नाही"
पाकी सैन्याला संपवणाऱ्या भारतीय जवानाची भूमिका करेल का फवाद खान?
 
लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मन्सूर अली शाह यांनी स्पष्ट केलं की, "एखाद्या मालिकेतील मजकूर आक्षेपार्ह किंवा पाकिस्तानविरोधी असेल तर तुम्ही तो सेन्सर करु शकता. मात्र पुर्ण बंदी आणण्याची काही गरज नाही". 
 
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अॅथोरिटीने (PEMRA) बंदी मागे घेतली असून मालिकांचं प्रसारण करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय मालिकांचं प्रसारण करण्यावर सरकारला काही आक्षेप नसताना, तुम्ही ते घेण्याचं काही कारण दिसत नाही असं सांगत लाहोर उच्च न्यायालयाने बंदी उठवली आहे.
 
गतवर्षी उरी हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते. यानंतर पेमराने ऑक्टोबर महिन्यात सर्व प्रकारच्या भारतीय मजकूरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. अशा प्रकारची एक सूचनाच त्यांनी जारी केली होती. 
 
पेमराच्या बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पेमराला बंदी घालण्याचा कोणताही हक्क नसून पाकिस्तानच्या राज्यघटनेतही तशी तरतूद नाही असा दावा याचिकेत करण्यात आला होता. कारण भारतीय चित्रपट देशभरात प्रदर्शित होण्याची परवानगी दिली असली, तरी ते टीव्हीवर प्रसारित केले जाऊ शकत नाहीत असं सांगत याचिकाकर्त्याने सरकार आपल्या निवडीप्रमाणे देशभक्तीचा आव आणत असल्याचाही आरोप केला होता.
 
पेमराने भारतीय चित्रपटांवर घातलेली बंदी फेब्रुवारी महिन्यात उठवण्यात आली होती. मात्र टीव्ही मालिकांवरील बंदी कायम ठेवण्यात आली होती. भारतामध्ये पाकिस्तानी मालिका, अभिनेत्यांविरोधात भूमिका घेण्यात आल्यानेच पेमराने हा निर्णय घेण्यात आल्याचं पेमराच्या वकिलाने यावेळी सांगितलं होतं.