शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

पाकिस्तानी घराघरात पुन्हा लागणार भारतीय टीव्ही मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 17:01 IST

भारतीय टीव्ही मालिकांवर लावण्यात आलेली बंदी पाकिस्तानमधील न्यायालयाने उठवली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - भारतीय टीव्ही मालिकांवर लावण्यात आलेली बंदी पाकिस्तानमधील न्यायालयाने उठवली आहे. "तंत्रज्ञानामुळे देशांमधील अंतर कमी होत चाललं असून सर्वजण जवळ आले आहेत, अशावेळी तुम्ही विनाकारण कोणतीही बंधनं घालू शकत नाही", असं न्यायालयाने खडसावलं आहे. लाहोर उच्च न्यायालयात भारतीय टीव्ही मालिकांवर लावण्यात आलेल्या बंदीविरोधात याचिका करण्यात आली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपलं मत मांडलं, तसंच बंदी उठवली आहे. त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांना पुन्हा एकदा भारतीय मालिका पाहता येणार आहेत.
 
पाकिस्तानात सर्व भारतीय चॅनेल्सवर बंदी
फवाद खान बरळला, "बॉलिवूड कोणाच्या बापाचं नाही"
पाकी सैन्याला संपवणाऱ्या भारतीय जवानाची भूमिका करेल का फवाद खान?
 
लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मन्सूर अली शाह यांनी स्पष्ट केलं की, "एखाद्या मालिकेतील मजकूर आक्षेपार्ह किंवा पाकिस्तानविरोधी असेल तर तुम्ही तो सेन्सर करु शकता. मात्र पुर्ण बंदी आणण्याची काही गरज नाही". 
 
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अॅथोरिटीने (PEMRA) बंदी मागे घेतली असून मालिकांचं प्रसारण करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय मालिकांचं प्रसारण करण्यावर सरकारला काही आक्षेप नसताना, तुम्ही ते घेण्याचं काही कारण दिसत नाही असं सांगत लाहोर उच्च न्यायालयाने बंदी उठवली आहे.
 
गतवर्षी उरी हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते. यानंतर पेमराने ऑक्टोबर महिन्यात सर्व प्रकारच्या भारतीय मजकूरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. अशा प्रकारची एक सूचनाच त्यांनी जारी केली होती. 
 
पेमराच्या बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पेमराला बंदी घालण्याचा कोणताही हक्क नसून पाकिस्तानच्या राज्यघटनेतही तशी तरतूद नाही असा दावा याचिकेत करण्यात आला होता. कारण भारतीय चित्रपट देशभरात प्रदर्शित होण्याची परवानगी दिली असली, तरी ते टीव्हीवर प्रसारित केले जाऊ शकत नाहीत असं सांगत याचिकाकर्त्याने सरकार आपल्या निवडीप्रमाणे देशभक्तीचा आव आणत असल्याचाही आरोप केला होता.
 
पेमराने भारतीय चित्रपटांवर घातलेली बंदी फेब्रुवारी महिन्यात उठवण्यात आली होती. मात्र टीव्ही मालिकांवरील बंदी कायम ठेवण्यात आली होती. भारतामध्ये पाकिस्तानी मालिका, अभिनेत्यांविरोधात भूमिका घेण्यात आल्यानेच पेमराने हा निर्णय घेण्यात आल्याचं पेमराच्या वकिलाने यावेळी सांगितलं होतं.