शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

सौदीत बेकायदा राहणारा भारतीय नागरिक परतणार

By admin | Updated: June 14, 2017 22:28 IST

सौदी अरेबियातल्या वाळवंटात गेल्या 24 वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत असलेले भारतीय नागरिक गना प्रकासम राजामरीयन (52, रा. कन्याकुमारी, तामिळनाडू) लवकरच भारतात परतणार असल्याची आनंदाची बातमी मिळते आहे

ऑनलाइन लोकमतदुबई, दि. 14 -  सौदी अरेबियातल्या वाळवंटात गेल्या 24 वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत असलेले भारतीय नागरिक गना प्रकासम राजामरीयन (52, रा. कन्याकुमारी, तामिळनाडू) लवकरच भारतात परतणार असल्याची आनंदाची बातमी मिळते आहे. सरकारने 90 दिवस माफीचा कालावधी दिला आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. गना हे ऑगस्ट 1994मध्ये हैल प्रांतातील एका गावात शेती करण्यासाठी आले होते. तामिळनाडूतील कन्याकुमारीला राहणारे राजमरियन म्हणाले, माझ्या पहिल्या मालकानं सहा महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला फक्त 100 सऊदी रियाल दिले होते.  त्यानंतर माझी दोन मालकांकडे बदली झाली. त्यामुळे माझा स्पॉन्सर कोण हेच मला नक्की माहीत नाही. मला त्यांच्याकडून पगारही मिळाला नाही. त्यामुळे मी बेकायदेशीरपणेच इथे राहू लागलो. माझं नशीब हे वाळवंटातच होते. येथेच मी माझं अर्धे आयुष्य इथे घालवलं आहे. मी घर सोडलं तेव्हा माझी चौथी मुलगी खूपच तरुण होती. ज्या वयात मी घर सोडलं त्या वयाची आता माझी नातवंडे आहेत. सौदी अरेबियातील कमाईवर मी माझ्या तीन मुलींचं लग्न करून देण्यास सक्षम होतो. मात्र आता माझ्याजवळ स्वतःच घर नाही. तसेच आधार कार्ड आणि मतदान कार्डही नाही. मी माझ्या पत्नीला 2015मध्ये शेवटचा फोन केला, त्यावेळी तिला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यानंतर माझं तिच्याशी कधीच बोलणं झालं नाही आणि हल्लीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अशा प्रकारे अनेक भारतीय प्रवासी सौदी अरेबियात अनधिकृतरीत्या वास्तव्य करत आहेत. त्यांना भारतात येण्याची इच्छा असून, सौदीतील कायद्यामुळे परतताना अडचणी येत आहेत. रियादमधल्या भारतीय दूतावास आणि जेद्दातल्या वाणिज्य दूतावासकडे आणीबाणीच्या प्रवासाकरता 26,713 अर्ज करण्यात आले आहेत. त्यातील उत्तर प्रदेशमधल्या 11,390, तेलंगणा 2733, प. बंगाल 2022, केरळ 1736, बिहार 1491, आंध्र प्रदेश 1120 आणि राजस्थानमधील 853 लोकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. भारतातील जवळपास हजारोंहून अधिक निर्वासित हे अनधिकृतपणे सौदी अरेबियात प्रवास करत आहेत.