शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

सौदीत बेकायदा राहणारा भारतीय नागरिक परतणार

By admin | Updated: June 14, 2017 22:28 IST

सौदी अरेबियातल्या वाळवंटात गेल्या 24 वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत असलेले भारतीय नागरिक गना प्रकासम राजामरीयन (52, रा. कन्याकुमारी, तामिळनाडू) लवकरच भारतात परतणार असल्याची आनंदाची बातमी मिळते आहे

ऑनलाइन लोकमतदुबई, दि. 14 -  सौदी अरेबियातल्या वाळवंटात गेल्या 24 वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत असलेले भारतीय नागरिक गना प्रकासम राजामरीयन (52, रा. कन्याकुमारी, तामिळनाडू) लवकरच भारतात परतणार असल्याची आनंदाची बातमी मिळते आहे. सरकारने 90 दिवस माफीचा कालावधी दिला आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. गना हे ऑगस्ट 1994मध्ये हैल प्रांतातील एका गावात शेती करण्यासाठी आले होते. तामिळनाडूतील कन्याकुमारीला राहणारे राजमरियन म्हणाले, माझ्या पहिल्या मालकानं सहा महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला फक्त 100 सऊदी रियाल दिले होते.  त्यानंतर माझी दोन मालकांकडे बदली झाली. त्यामुळे माझा स्पॉन्सर कोण हेच मला नक्की माहीत नाही. मला त्यांच्याकडून पगारही मिळाला नाही. त्यामुळे मी बेकायदेशीरपणेच इथे राहू लागलो. माझं नशीब हे वाळवंटातच होते. येथेच मी माझं अर्धे आयुष्य इथे घालवलं आहे. मी घर सोडलं तेव्हा माझी चौथी मुलगी खूपच तरुण होती. ज्या वयात मी घर सोडलं त्या वयाची आता माझी नातवंडे आहेत. सौदी अरेबियातील कमाईवर मी माझ्या तीन मुलींचं लग्न करून देण्यास सक्षम होतो. मात्र आता माझ्याजवळ स्वतःच घर नाही. तसेच आधार कार्ड आणि मतदान कार्डही नाही. मी माझ्या पत्नीला 2015मध्ये शेवटचा फोन केला, त्यावेळी तिला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यानंतर माझं तिच्याशी कधीच बोलणं झालं नाही आणि हल्लीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अशा प्रकारे अनेक भारतीय प्रवासी सौदी अरेबियात अनधिकृतरीत्या वास्तव्य करत आहेत. त्यांना भारतात येण्याची इच्छा असून, सौदीतील कायद्यामुळे परतताना अडचणी येत आहेत. रियादमधल्या भारतीय दूतावास आणि जेद्दातल्या वाणिज्य दूतावासकडे आणीबाणीच्या प्रवासाकरता 26,713 अर्ज करण्यात आले आहेत. त्यातील उत्तर प्रदेशमधल्या 11,390, तेलंगणा 2733, प. बंगाल 2022, केरळ 1736, बिहार 1491, आंध्र प्रदेश 1120 आणि राजस्थानमधील 853 लोकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. भारतातील जवळपास हजारोंहून अधिक निर्वासित हे अनधिकृतपणे सौदी अरेबियात प्रवास करत आहेत.