शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

तवांगच्या बदल्यात भारताला मिळणार अक्साई चीन ?

By admin | Updated: March 3, 2017 07:33 IST

अरुणाचल प्रदेशमधल्या तवांगच्या बदल्यात भारताला स्वतःच्या ताब्यातील दुसरा भूभाग देण्याची तयारी दर्शवली आहे.

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 3 - भारत आणि चीनचा सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र चीननं भारतासोबत असलेला हा सीमावाद मिटवण्यासाठी अरुणाचल प्रदेशमधल्या तवांगच्या बदल्यात भारताला स्वतःच्या ताब्यातील दुसरा भूभाग देण्याची तयारी दर्शवली आहे. चीनचे माजी वरिष्ठ राजनैतिक अधिकारी दायी बिंगुओ यांनी एका मुलाखतीत याचे संकेत दिले आहेत. त्यांनी तवांगच्या बदल्यात अक्साई चीनच्या दुस-या भूभागाच्या देवाण-घेवाणीबाबत सूतोवाच केले आहेत. तवांग हा भारत आणि चीन या सीमेकडच्या पूर्वेतील सामरिक आणि राजनैतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील भूभाग आहे.भारताच्या सीमावादावर चीनचे माजी वरिष्ठ कम्युनिस्ट नेते दायी बिंगुओ एका पब्लिकेशन हाऊसला मुलाखत दिली होती. 2013 साली निवृत्त होण्याआधी दायी बिंगुओ यांनी दशकाहून अधिक काळ भारतासोबत चीनचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम पाहिलं होतं. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारत-चीनच्या सीमेच्या वाटाघाटी झाल्या होत्या. मात्र तवांग या भूभागाची देवाण-घेवाण भारतासाठी सहजशक्य नाही. कारण तवांग मठ तिबेट आणि भारतातल्या बौद्ध धर्मीयांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. परंतु दायी यांच्या सूचक वक्तव्यालाही महत्त्व प्राप्त झालं आहे. कोणतीही अधिकृत मान्यता असल्याशिवाय दायी असं वक्तव्य करणार नाहीत, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दायी अजूनही चीन सरकारच्या खूप जवळचे समजले जातात. तसेच राजकीयदृष्ट्या चीनमध्ये त्यांना गांभीर्यानं घेतलं जातं. कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहमतीशिवाय दायी मुलाखतीत याची वाच्यता करणार नाहीत, असं अनेकांचं म्हणणं आहे. दायी म्हणाले, चीनच्या मागण्या अजूनपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे सीमेचे वाद अद्यापही सुरूच आहेत. पूर्वेकडे भारतानं चीनची काळजी घेतल्यास चीनही त्याच्या मोबदल्यात (अक्साई चीन) इतर भूभाग देण्याचा विचार करेल. दायी यांनी गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकातही याचा उल्लेख केला आहे. 2005पासून चीननं भारताच्या पूर्वेकडच्या क्षेत्रात लुडबुड करण्यास सुरुवात केल्याचंही चीन संबंधित विश्लेषक श्रीकांत कोंडापल्ली यांनी सांगितलं आहे. तवांगवर चीनची नजर आहे आणि त्याला तो दक्षिण तिबेट म्हणून संबोधतो. 15व्या शतकात दलाई लामा यांचा येथेच जन्म झाला. भारतासोबत झालेल्या1962च्या युद्धात चीन या क्षेत्रातून मागे हटला होता. तवांगवर चीननं अधिपत्य स्थापन केल्यास तिबेट आणि पर्यायानं बौद्ध केंद्रांवर त्यांचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे.