शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडूनच शस्त्रसंधीचे उल्लंघन, नवाज शरीफांच्या उलट्या बोंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2016 17:57 IST

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर कोणताही तपास न करता काही तासातच भारताने पाकिस्तानला जबाबदार धरलं असं म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कोलांटीउडी मारण्यास सुरुवात केली आहे

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 5 - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर कोणताही तपास न करता काही तासातच भारताने पाकिस्तानला जबाबदार धरलं असं म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कोलांटीउडी मारण्यास सुरुवात केली आहे. आम्ही युद्धाविरोधात आहोत, आम्हाला शांतता हवी आहे. काश्मीरचा मुद्दा आम्ही शांततेने सोडवायचा आहे असंही नवाज शरीफ बोलले आहेत. संसदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
यावेळी बोलताना नवाज शरीफ यांनी दहशतवादी बु-हान वाणीचं पुन्हा एकदा उदात्तीकरण करत त्याला नायक ठरवला. भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याच्या उलट्या बोंबा मारत उरी हल्ल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी करण्यात यावी अशी मागणीही नवाज शरीफ यांनी केली. काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी जगातील देशांनी प्रयत्न करायला हवे असंही नवाज शरीफ बोलले आहेत.
 
 
१८ सप्टेंबर रोजी बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. ज्यामध्ये २० जवान शहीद झाले. 
 
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ४ तळांवर हल्ले करून  38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. हे दहशतवादी भारतात घुसखोरी करून घातपात घडवण्याच्या तयारीत होते, मात्र भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवादी संघटना व पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. 
 
भारतीय कमांडोनी POK मध्ये घुसून कारवाई केली - प्रत्यक्षदर्शींची माहिती
 
भारत-पाकिस्तानदरम्यान १९४९ साली कराची करार झाला, तेव्हापासून ७७५ कि.मी. अंतराच्या नियंत्रण रेषेला शस्त्रसंधी रेषा म्हणून ओळखले जात होते. १९७१पासून ती एलओसी म्हणून ओळखली जाते. तेव्हापासून प्रथमच भारतीय सैन्याने एलओसी ओलांडून थेट पीओकेमध्ये प्रवेश केला. गतवर्षी म्यानमारमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राइक केला होता. मात्र जाहीरपणे त्याची कबुली दिली नव्हती. यंदा मात्र पीओकेतील दहशतवाद्यांच्या तळावर सर्जिकल स्ट्राइक केल्याची जाहीर कबुली दिली.