शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

पाकमधील पूरासाठी भारतच जबाबदार - हाफीज सईद

By admin | Updated: September 9, 2014 14:44 IST

पाकमधील पूरासाठी भारताला जबाबदार ठरवत हा भारताचा दहशतवादी हल्ला असल्याचा आरोप हाफिज सईदने केला आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ९ - मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि 'जमात- उद- दावा' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदने पाकमधील पूरासाठी भारताला जबाबादार ठरवत हा भारताचा दहशतवादी हल्ला असल्याचा आरोप केला आहे. 
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उभारण्यात आलेल्या एका मदतकेंद्राला भेट दिल्यानंतर सईदने हा आरोप करत भारताला दोषी ठरवले. ' एकीकडे भारताने पूर्वसूचना न देताच धरणांचे पाणी पाकिस्तानातील नद्यांमध्ये सोडले, जनतेला चुकीची माहिती दिली, ज्यामुळे अनेक निरपराधांचे प्राण गेले. आणि आता दुसरीकडे भारत पूरग्रस्तांना मदत करत आहे. हा खोडसाळपणाच आहे, असे त्याने म्हटले आहे. 
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूरग्रस्तांसाठी देऊ केलेली मदत म्हणजे काश्मिरी व पाकिस्तानी जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याचेही सईद याने म्हटले आहे. पाकिस्तानात मुसळधार पावसाने शेकडो नागरिकांचे प्राण घेतले असून अनेक जण जखमी झाले आहेत. पावसाने पाकिस्तानमध्ये हाहाकार माजवला असून अनेक नागरिक बेघर झाले आहेत. २०१० मध्ये पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात भयंकर पाऊस होऊन त्यात १,७०० लोक ठार झाले होते.