शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

अण्वस्त्र स्पर्धेला भारत जबाबदार- सरताज अजिज

By admin | Updated: February 13, 2017 11:52 IST

अण्वस्त्र स्पर्धेला भारत जबाबदार असून, हिंदी महासागरात सामर्थ्य वाढवून भारत सुरक्षेला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला

ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 13 - भारताच्या वाढत्या नौदल सामर्थ्याची पाकिस्तानने धास्ती घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजिज यांनी अण्वस्त्र स्पर्धेला भारत जबाबदार असून, हिंदी महासागरात सामर्थ्य वाढवून भारत सुरक्षेला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. भारताच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या आण्विक शक्तीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानमधल्या कराची येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. पाकिस्तानचा 95 टक्के व्यापार हा हिंदी महासागरातून होतो. हिंदी महासागरात भारतानं आण्विक परीक्षण केल्यास पूर्ण क्षेत्र प्रभावित होऊन धोको वाढण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, हिंदी महासागरात विदेशी सैन्याकडून संचलन, सामूहिकरीत्या नाश करणा-या शस्त्रास्त्रांचं परीक्षण, क्षेपणास्त्र क्षमता वाढवल्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता याआधीच वर्तवण्यात आली आहे. तसेच तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनमध्ये भारतानं 'सिक्रेट न्यूक्लिअर सिटी' बनवल्याचंही छापण्यात आलं होत. त्यामुळे दक्षिण आशियात संतुलन बिघडण्याची भीती आहे. भारत आण्विक शस्त्रास्त्रे जमा करत असल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता नफीस जकारिया यांनीसुद्धा केला आहे.