शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

शांततेसाठी झटूनही भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत स्थान नाहीच - नरेंद्र मोदी

By admin | Updated: June 8, 2015 10:37 IST

पहिल्या महायुद्धापासून बांगलादेश मुक्तीच्या लढ्यापर्यंत भारताने जागतिक शांततेसाठी प्रयत्न केले असतानाही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अद्याप भारताला स्थान मिळू शकले नाही असे नरेंद्र मोदींनी म्हटले.

ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. ७ - पहिल्या महायुद्धापासून बांगलादेश मुक्तीच्या लढ्यापर्यंत भारताने जागतिक शांतता व सुरक्षेसाठी प्रयत्न केले असतानाही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अद्याप भारताला स्थान मिळू शकलेले नाही, ही खेदाची बाब असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ढाका येथे व्यक्त केले. मोदींच्या दोन दिवसीय बांगलादेश दौ-याची आज समाप्ती झाली, त्यापूर्वी ढाका येथे पाच हजार नागरिकांना संबोधित करताना त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. ' ज्या देशाने बांगलादेशवर जुलूम केले त्यांच्याच ९० हजार सैनिकांचे भारताने आत्मसमर्पण केले. भारताला सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व देण्यासाठी ही एकच बाब पुरेशी आहे.' असेही ते म्हणाले. गरीब देशांना एकत्र घेऊन आम्ही जगाच्या मंचावर पुढे जाऊ इच्छितो, असे त्यांनी सांगितले. 'दहशतवादाला कोणीतीही सीमा नसते, दहशतवाद हा मानवतेच्या विरोधात आहे. त्याला हरवण्यासाठी मानवतावादी देशांनी एकत्र येणे अनिवार्य आहे. आपल्याला मानवतेच्या रक्षणासाठी पुढे यायला हवे. बांगलादेश हा एकमेव देश आहे, ज्याने दहशतवादाविरोधात 'झिरो टॉलरेंस'ची नीती अवलंबली आहे, त्याचे मी स्वागत करतो' असेही मोदींनी यावेळी सांगितले. 
 पक्षी, वारा आणि पाणी यांना व्हिसा लागत नाही. गंगा- व ब्रह्मपुत्रा नदीवर आपण एकत्र चाललो आहोत. पाणी हा राजकीय मुदा नसून मानवी मूल्यांच्या आधारे या मुद्याचे निरसन व्हायला हवे, असे ते म्हणाले.  
महिला सबलीकरणासाठी बांगलादेशमध्ये करण्यात आलेले कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तसेच भारत -बांगलादेशदरम्यान झालेला लँड बाऊंड्री करार हा हृदयांना जोडणारा करार असल्याचेही ते म्हणाले.