शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

सुदृढ शेजारधर्मास भारत बांधील

By admin | Updated: June 16, 2014 23:46 IST

भारताची मैत्रिपूर्ण संबंधांशी बांधिलकी सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मजबूत आणि वैभवशाली’ भारतच प्रदेशातील छोट्या देशांना मदत करू शकेल, असा स्पष्ट संदेश दिला

थिंपू : भारताची मैत्रिपूर्ण संबंधांशी बांधिलकी सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मजबूत आणि वैभवशाली’ भारतच प्रदेशातील छोट्या देशांना मदत करू शकेल, असा स्पष्ट संदेश दिला. मोदी यांनी आपल्या दोनदिवसीय दौऱ्याच्या समारोपावेळी यापूर्वीच्या सरकारांनी भूतानशी केलेल्या सर्व करारांच्या पूर्ततेची ग्वाही दिली.भूतानी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला पंतप्रधान मोदी यांनी काल संबोधित केले. ते म्हणाले, सत्ता परिवर्तनामुळे दीर्घकाळापासूनच्या मैत्री संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. उभय देशांतील मैत्रीसंबंध हे ऐतिहासिक आणि दोहोंच्या हृदयाची दारे एकमेकांसाठी उघडी असल्याचे ते म्हणाले. भूतानच्या माजी राजाने ‘दूध आणि पाणी’ अशा शब्दांत उभय देशांतील मैत्री संबंधांच्या केलेल्या वर्णनास पंतप्रधानांनी यावेळी दुजोरा दिला.मोदी यांनी केवळ भारताच्या सक्षमतेकडे लक्ष वेधले नाही तर त्यांनी भूतानसह सार्क देशांचा विकास हा दक्षिण आशियाच्या भरभराटीसाठी पूरक असल्याचे नमूद केले. शेजारी देशांसोबत मजबूत मैत्री संबंध निर्माण करण्यास भारत नेहमीच प्रयत्नशील असेल. भारतच विविध समस्यांनी त्रस्त असेल, तर तो शेजाऱ्यांशी कशी मदत करू शकेल याकडे पंतप्रधानांनी यावेळी लक्ष वेधले. भारत आणि भूतान यांच्या भागीदारीतून उभारल्या जाणाऱ्या खोलोनग्याचु जलविद्युत प्रकल्पाचा पायाभरणी समांरभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडला. या प्रकल्पापासून ६०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती होईल.एका संयुक्त निवेदनानुसार, उभय देशांमध्ये परस्पर सुरक्षेच्या मुद्यावर सामंजस्यातून तोडगा काढण्यावर सहमती झाली. राष्ट्रीय हिताच्या मुद्यावर समन्वय आणि सहकार्य कायम ठेवण्यावर तसेच परस्परांना धोकादायक ठरतील अशा कृत्यांसाठी आपल्या भूमीचा वापर करू न देण्यावर दोन्ही देशांत एकमत झाले. मुक्त व्यापार कराराच्या मुद्यावरही मोदी आणि भूतानचे पंतप्रधान तोबग्ये यांच्यात चर्चा झाली. पंतप्रधानांसोबत या दौऱ्यावर आलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ‘अतिशय समाधानी’ व ‘अतिशय यशस्वी’ अशा शब्दांत या दौऱ्याचे यश नमूद केले. सवलतींची घोषणाभूतानशी मजबूत आणि व्यापक मैत्रीसंबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अनेक सवलतींची भारताने घोषणा केली. यात दूध पावडर, गहू, खाद्यतेल, डाळ आणि बासमती वगळता अन्य तांदूळ यांच्या निर्यातीवरील निर्बंधातून भूतानला मुक्त करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)