शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सुदृढ शेजारधर्मास भारत बांधील

By admin | Updated: June 16, 2014 23:46 IST

भारताची मैत्रिपूर्ण संबंधांशी बांधिलकी सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मजबूत आणि वैभवशाली’ भारतच प्रदेशातील छोट्या देशांना मदत करू शकेल, असा स्पष्ट संदेश दिला

थिंपू : भारताची मैत्रिपूर्ण संबंधांशी बांधिलकी सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मजबूत आणि वैभवशाली’ भारतच प्रदेशातील छोट्या देशांना मदत करू शकेल, असा स्पष्ट संदेश दिला. मोदी यांनी आपल्या दोनदिवसीय दौऱ्याच्या समारोपावेळी यापूर्वीच्या सरकारांनी भूतानशी केलेल्या सर्व करारांच्या पूर्ततेची ग्वाही दिली.भूतानी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला पंतप्रधान मोदी यांनी काल संबोधित केले. ते म्हणाले, सत्ता परिवर्तनामुळे दीर्घकाळापासूनच्या मैत्री संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. उभय देशांतील मैत्रीसंबंध हे ऐतिहासिक आणि दोहोंच्या हृदयाची दारे एकमेकांसाठी उघडी असल्याचे ते म्हणाले. भूतानच्या माजी राजाने ‘दूध आणि पाणी’ अशा शब्दांत उभय देशांतील मैत्री संबंधांच्या केलेल्या वर्णनास पंतप्रधानांनी यावेळी दुजोरा दिला.मोदी यांनी केवळ भारताच्या सक्षमतेकडे लक्ष वेधले नाही तर त्यांनी भूतानसह सार्क देशांचा विकास हा दक्षिण आशियाच्या भरभराटीसाठी पूरक असल्याचे नमूद केले. शेजारी देशांसोबत मजबूत मैत्री संबंध निर्माण करण्यास भारत नेहमीच प्रयत्नशील असेल. भारतच विविध समस्यांनी त्रस्त असेल, तर तो शेजाऱ्यांशी कशी मदत करू शकेल याकडे पंतप्रधानांनी यावेळी लक्ष वेधले. भारत आणि भूतान यांच्या भागीदारीतून उभारल्या जाणाऱ्या खोलोनग्याचु जलविद्युत प्रकल्पाचा पायाभरणी समांरभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडला. या प्रकल्पापासून ६०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती होईल.एका संयुक्त निवेदनानुसार, उभय देशांमध्ये परस्पर सुरक्षेच्या मुद्यावर सामंजस्यातून तोडगा काढण्यावर सहमती झाली. राष्ट्रीय हिताच्या मुद्यावर समन्वय आणि सहकार्य कायम ठेवण्यावर तसेच परस्परांना धोकादायक ठरतील अशा कृत्यांसाठी आपल्या भूमीचा वापर करू न देण्यावर दोन्ही देशांत एकमत झाले. मुक्त व्यापार कराराच्या मुद्यावरही मोदी आणि भूतानचे पंतप्रधान तोबग्ये यांच्यात चर्चा झाली. पंतप्रधानांसोबत या दौऱ्यावर आलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ‘अतिशय समाधानी’ व ‘अतिशय यशस्वी’ अशा शब्दांत या दौऱ्याचे यश नमूद केले. सवलतींची घोषणाभूतानशी मजबूत आणि व्यापक मैत्रीसंबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अनेक सवलतींची भारताने घोषणा केली. यात दूध पावडर, गहू, खाद्यतेल, डाळ आणि बासमती वगळता अन्य तांदूळ यांच्या निर्यातीवरील निर्बंधातून भूतानला मुक्त करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)