शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

भारत-चीनने परस्परांच्या इच्छांचा आदर करावा - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: September 4, 2016 13:20 IST

भारत आणि चीन दोन्ही देशांनी पस्परांच्या इच्छा, आकांक्षा आणि गरजांबद्दल संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले.

ऑनलाइन लोकमत 

बिजींग, दि. ४ - भारत आणि चीन दोन्ही देशांनी पस्परांच्या इच्छा, आकांक्षा आणि गरजांबद्दल संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर झालेल्या भेटीत व्यक्त केले. जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर रविवारी नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये चर्चा झाली. 
 
भारत आणि चीन दोन्ही देशांनी  परस्परांच्या इच्छांचा आदर केला पाहिजे असे पंतप्रधानांनी शी जिनपिंग यांना सांगितल्याचे परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी या भेटीसंबंधी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. सध्या भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्यांवर विसंवाद वाढत चालला आहे. 
 
भारत-चीन भागीदारी फक्त दोन देशांसाठी नव्हे तर, आशिया खंड आणि संपूर्ण जगासाठी महत्वाची आहे असे मोदींनी जिनपिंग यांना सांगितले. जिनपिंग यांनी सुद्धा मोदींच्या मताला दुजोरा देताना परस्परांचा आदर करणे दोन्ही देशांचे कर्तव्य असल्याचे सांगितले. 
 
वादग्रस्त मुद्यांवर सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी यावेळी पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घालण्याचा मुद्दा उपस्थित केला. 
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनने वेगवेगळया व्यासपीठांवर भारताला रोखण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. चीनने यापूर्वी भारताचा एनएसजी सदस्यत्वाचा मार्ग रोखला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रातील मसूद अझरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताचा प्रस्तावाला पाठिंबा द्यायला नकार दिला. मसूद अझर पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे.