शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

तर 'एकटे' पडाल, पाक सरकारला प्रसार माध्यमांकडूनच चेतावणी

By admin | Updated: October 17, 2016 14:31 IST

पाकिस्तान जागतिक पातळीवर एकटे पडण्याच्या दिशेने जवळ जात आहे, असा इशारा खुद्द पाकिस्तानी मीडियाने पाक सरकारला दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 17 - पाकिस्तान जागतिक पातळीवर एकटे पडण्याच्या दिशेने जवळ जात आहे, असा इशारा खुद्द पाकिस्तानी मीडियाने पाक सरकारला दिला आहे. 'दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई होत नसल्याने पाकिस्तान जागतिक पातळीवर एकटे पडण्याची शक्यता आहे', असे चेतावणी देणारी वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र 'द नेशन'ने छापले आहे. पाकिस्तानचे सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना यासंदर्भातील इशारा देत, दोन आठवड्यांमध्ये दुस-यांदा या वृत्तपत्राने कठोर भूमिका मांडणार लेख छापला आहे.  
 
'द नेशन' हे वृत्तपत्र पाकिस्तान सरकार आणि लष्कर दोघांच्याही जवळचे असल्याचे मानले जाते. यामुळे छापलेल्या लेखाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 'चीननेही दहशतवादाविरोधात कठोर भूमिका न मांडण्याबाबत पाकिस्तानकडे चिंता व्यक्त केली आहे', याची देखील वृत्तपत्राने आठवण करुन दिली आहे. तसेच, 'भेदभाव न करता दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली पाहिजे', असेही 'द नेशन'च्या वृत्तात म्हटले गेले आहे. गोव्यातील ब्रिक्स शिखर परिषदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख 'दहशतवाद पोसणार देश' असा केला होता. याचा दाखला देत 'पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटे पाडण्यासाठी भारत कसून प्रयत्न करत आहे, हे मोदींच्या भाषणावरुन समोर येत', असेही देखील वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. 
 
आणखी बातम्या
दहशतवादाला थारा देणारेही तेवढेच घातक
'ती' बातमी फुटलीच कशी, 5 दिवसांत शोध लावा - पाक लष्कर
'सार्क परिषद रद्द करणे, पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घालणे, यासारखे अनेक निर्णय घेत मोदी सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला दुबळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर आपण एकटे पडलो तर याचा परिणाम फार तीव्र असेल', असा इशाराही पाकिस्तान सरकारला लेखाद्वारे देण्यात आला आहे. 'पाकिस्तानला चांगले-वाईटमधील अजूनही फरक समजत नाही, असे म्हणत या लेखातून थेट पाकिस्तानचे सरकार आणि सुरक्षा यंत्रणांवर दहशतवादावरुन बोचरी टीका करण्यात आली आहे. 'काही दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षातील एका नेत्यानेही दहशतवादी समूहांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती',असेही या लेखात नमूद करण्यात आले आहे. 
 
लेखामध्ये नमुद करण्यात आल्यानुसार, 'हे तेच दहशतवादी समूह आहेत, ज्यावर भारत पाकिस्तान 'दहशतवाद पुरस्कृत देश' असल्याचा आरोप करत आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करणे हेच देशाच्या हिताचे ठरेल', असा सल्लाही 'द नेशन' नवाज सरकारला दिला आहे. या लेखामध्ये 'डॉन' वृत्तपत्रातील सरकार आणि लष्करातील मतभेदासंदर्भातील बातमीचा उल्लेख करत सरकारचे कान टोचले आहेत. 'दहशतवादी समूहावर आपली बाजू मांडण्याऐवजी सरकारने बातमी छापणा-या पत्रकाराला देशाबाहेर जाण्यास बंदी घातली, या निर्णयामुळे सरकारची अपरिपक्वता समोर आली', अशी टीका देखील करण्यात आली आहे.  
 
गोव्यातील ब्रिक्स शिखर परिषदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे स्पष्टपणे नाव घेत दहशतवादाविरोधात कारवाई होत नसल्याने हल्लाबोल चढवला. याकडे लक्ष वेधत पाकिस्तानी वृत्तपत्र 'द नेशन'ने दहशतवाद्यांविरोधात कारवाई न केल्यामुळे जागतिक पातळीवर एकटे पडण्याचा इशारा पाकिस्तान सरकारला दिला आहे. दरम्यान, उरी दहशतवादी हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद झाले होते. याचा बदल घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. तसेच भारताने अद्दल घडवण्यासाठी पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटे पाडण्याचा निर्णय घेतला आहे.