शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

तर 'एकटे' पडाल, पाक सरकारला प्रसार माध्यमांकडूनच चेतावणी

By admin | Updated: October 17, 2016 14:31 IST

पाकिस्तान जागतिक पातळीवर एकटे पडण्याच्या दिशेने जवळ जात आहे, असा इशारा खुद्द पाकिस्तानी मीडियाने पाक सरकारला दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 17 - पाकिस्तान जागतिक पातळीवर एकटे पडण्याच्या दिशेने जवळ जात आहे, असा इशारा खुद्द पाकिस्तानी मीडियाने पाक सरकारला दिला आहे. 'दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई होत नसल्याने पाकिस्तान जागतिक पातळीवर एकटे पडण्याची शक्यता आहे', असे चेतावणी देणारी वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र 'द नेशन'ने छापले आहे. पाकिस्तानचे सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना यासंदर्भातील इशारा देत, दोन आठवड्यांमध्ये दुस-यांदा या वृत्तपत्राने कठोर भूमिका मांडणार लेख छापला आहे.  
 
'द नेशन' हे वृत्तपत्र पाकिस्तान सरकार आणि लष्कर दोघांच्याही जवळचे असल्याचे मानले जाते. यामुळे छापलेल्या लेखाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 'चीननेही दहशतवादाविरोधात कठोर भूमिका न मांडण्याबाबत पाकिस्तानकडे चिंता व्यक्त केली आहे', याची देखील वृत्तपत्राने आठवण करुन दिली आहे. तसेच, 'भेदभाव न करता दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली पाहिजे', असेही 'द नेशन'च्या वृत्तात म्हटले गेले आहे. गोव्यातील ब्रिक्स शिखर परिषदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख 'दहशतवाद पोसणार देश' असा केला होता. याचा दाखला देत 'पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटे पाडण्यासाठी भारत कसून प्रयत्न करत आहे, हे मोदींच्या भाषणावरुन समोर येत', असेही देखील वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. 
 
आणखी बातम्या
दहशतवादाला थारा देणारेही तेवढेच घातक
'ती' बातमी फुटलीच कशी, 5 दिवसांत शोध लावा - पाक लष्कर
'सार्क परिषद रद्द करणे, पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घालणे, यासारखे अनेक निर्णय घेत मोदी सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला दुबळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर आपण एकटे पडलो तर याचा परिणाम फार तीव्र असेल', असा इशाराही पाकिस्तान सरकारला लेखाद्वारे देण्यात आला आहे. 'पाकिस्तानला चांगले-वाईटमधील अजूनही फरक समजत नाही, असे म्हणत या लेखातून थेट पाकिस्तानचे सरकार आणि सुरक्षा यंत्रणांवर दहशतवादावरुन बोचरी टीका करण्यात आली आहे. 'काही दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षातील एका नेत्यानेही दहशतवादी समूहांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती',असेही या लेखात नमूद करण्यात आले आहे. 
 
लेखामध्ये नमुद करण्यात आल्यानुसार, 'हे तेच दहशतवादी समूह आहेत, ज्यावर भारत पाकिस्तान 'दहशतवाद पुरस्कृत देश' असल्याचा आरोप करत आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करणे हेच देशाच्या हिताचे ठरेल', असा सल्लाही 'द नेशन' नवाज सरकारला दिला आहे. या लेखामध्ये 'डॉन' वृत्तपत्रातील सरकार आणि लष्करातील मतभेदासंदर्भातील बातमीचा उल्लेख करत सरकारचे कान टोचले आहेत. 'दहशतवादी समूहावर आपली बाजू मांडण्याऐवजी सरकारने बातमी छापणा-या पत्रकाराला देशाबाहेर जाण्यास बंदी घातली, या निर्णयामुळे सरकारची अपरिपक्वता समोर आली', अशी टीका देखील करण्यात आली आहे.  
 
गोव्यातील ब्रिक्स शिखर परिषदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे स्पष्टपणे नाव घेत दहशतवादाविरोधात कारवाई होत नसल्याने हल्लाबोल चढवला. याकडे लक्ष वेधत पाकिस्तानी वृत्तपत्र 'द नेशन'ने दहशतवाद्यांविरोधात कारवाई न केल्यामुळे जागतिक पातळीवर एकटे पडण्याचा इशारा पाकिस्तान सरकारला दिला आहे. दरम्यान, उरी दहशतवादी हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद झाले होते. याचा बदल घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. तसेच भारताने अद्दल घडवण्यासाठी पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटे पाडण्याचा निर्णय घेतला आहे.