शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भारत-पाकिस्तान चर्चेसाठी मी प्रयत्नशील

By admin | Updated: June 22, 2017 02:03 IST

काश्मीर मुद्दा सोडविण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू करण्यास आपण प्रयत्नशील आहोत, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुतारेस यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र : काश्मीर मुद्दा सोडविण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू करण्यास आपण प्रयत्नशील आहोत, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुतारेस यांनी म्हटले आहे.काश्मीर मुद्दा सोडविण्यास तुम्ही भारत-पाकमध्ये चर्चा सुरू करण्याचे प्रयत्न करीत आहात काय, असा प्रश्न येथील पत्रपरिषदेत गुतारेस यांना विचारण्यात आला. त्यावर ते हसत हसत म्हणाले, तुम्हाला काय वाटते, की मी पाकच्या पंतप्रधानांशी तीन वेळा आणि भारतीय पंतप्रधानांशी दोन वेळा चर्चा कशामुळे केली असेल? काश्मीरवरून भारत आणि पाकदरम्यानचा तणाव कमी करण्याचे प्रयत्न टाळत असल्याची टीका गुतारेस यांच्यावर होते. त्याला उत्तर देताना गुतारेस म्हणाले की, ज्या व्यक्तीवर काही न करण्याचे आरोप होतात त्याने अनेकांच्या भेटी घेऊन चर्चा केली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांना नियंत्रणरेषेवर भारत - पाकदरम्यान वाढता तणाव तसेच शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. तथापि, याबाबत गुतारेस यांंनी विस्ताराने काहीही सांगितले नाही. तथापि, काश्मीर मुद्दा सोडविण्यासाठी भारत-पाकदरम्यान आपण मध्यस्थाची भूमिका बजावू, असे कोणतेही संकेत त्यांनी दिले नाहीत. समस्येच्या सोडवणुकीसाठी संयुक्त राष्ट्रसंघप्रमुखांनी थेट हस्तक्षेप केलेला नाही, तर भारत-पाकने चर्चेद्वारे शांततामयरीत्या मार्ग काढण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला आहे.