शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
3
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
4
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
5
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
6
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
7
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
8
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
9
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
10
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
11
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
12
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
13
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
14
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
15
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
16
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
17
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
18
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
19
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
20
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

शेकडो भारतीयांची होणार ताटातूट

By admin | Updated: February 26, 2017 04:23 IST

परदेशी व्यक्तीशी लग्न केलेल्या ब्रिटिश नागरिकाचे उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तरच त्या व्यक्तीला आपल्या पत्नी किंवा पतीला आणि मुलांना ब्रिटनमध्ये घेऊन

लंडन : परदेशी व्यक्तीशी लग्न केलेल्या ब्रिटिश नागरिकाचे उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तरच त्या व्यक्तीला आपल्या पत्नी किंवा पतीला आणि मुलांना ब्रिटनमध्ये घेऊन येण्याची मुभा देणाऱ्या ब्रिटिश सरकारने केलेल्या नव्या नियमांवर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने शेकडो भारतीय कुटुंबांची ताटातूट होण्याची चिन्हे आहेत.गेली पाच वर्षे ब्रिटिश सरकारने हे नियम उत्तरोत्तर अधिक कडक करून ‘किमान उत्पन्न मर्यादा’ वाढवत नेली. सध्या ती वर्षाला १८,६०० पौंड केली आहे. म्हणजेच युरोपीय संघाखेरीज अन्य देशाची नागरिक असलेल्या आपल्या जोडीदाराला ब्रिटनमध्ये राहण्यासाठी आणायचे असेल तर त्यांचे उत्पन्न किमान एवढे असणे बंधनकारक असेल. मुलालाही आणायचे तर ती २४,४00 पौंड आहे. शिवाय प्रत्येक वाढीव मुलागणिक त्यात २,४०० पौंडांची वाढ होत जाते.पाकिस्तान, लेबेनॉन आणि काँगो या देशांमधील जोडीदार असलेल्या ब्रिटिश नागरिकांनी ‘टेस्ट केस’ म्हणून कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेली प्रकरणे अखेर सर्वोच्च न्यायालयात आली होती. हे नियम युरोपीय मानवाधिकार करारांचे उल्लंघन करणारे आहेत व त्यामुळे मुलांच्या कल्याणाला बाधा येते, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. परंतु या नियमांत तात्त्विकदृष्ट्या काहीच चूक नाही, असे नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ब्रिटिश नागरिकांनी विदेशांतून त्यांची बायका-मुले येथे आणली तर त्यांचे संगोपन त्यांनी स्वत: सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या भरवशावर त्यांनी त्यांना येथे आणू नये, या सरकारच्या विचारात काही चूक नाही. (वृत्तसंस्था)- या नियमांमुळे मुलांची मोठी कुचंबणा होते, ही गोष्ट लक्षात घेऊन सरकारने त्यांच्या संगोपनासाठी अर्जदार नागरिकाला पर्यायी व्यवस्था करण्याची संधी देण्याचा विचार करावा, असे न्यायालय म्हणाले. - या नियमांमुळे कुटुंबाची ताटातूट होत असल्याने व संपर्कात राहण्यासाठी स्काइपसारख्या तंत्रज्ञानावर विसंबून राहावे लागत असल्याने मुलांच्या मानसिकतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो, असे म्हणून ब्रिटनमधील संघटना या नियमांना विरोध करीत आहेत. हा निकाल आश्चर्यकारक नसला तरी निराशाजनक आहे. हे नियम कायद्याच्या काटेकोर चौकटीत बसणारे असले तरी ते नैतिकतेला धरून नाहीत. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या व मध्यम किंवा अल्प उत्पन्न असलेल्या शेकडो भारतीय ब्रिटिश नागरिकांना यांचा फटका बसून त्यांचे कौटुंबिक जीवन विस्कळीत होणार आहे.- हरसेव बैंस, इंडियन वर्कर्स असोसिएशन