शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू धर्मामुळे भारतात कट्टर इस्लाम फोफावला नाही, चिनी मीडियाकडून हिंदू धर्माचं कौतुक

By शिवराज यादव | Updated: August 31, 2017 15:02 IST

डोकलाम वादाला पुर्णविराम मिळाल्यानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-याआधी चीनी मीडियाने मवाळ भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली, दि. - डोकलाम वादाला पुर्णविराम मिळाल्यानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-याआधी चिनी मीडियाने मवाळ भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समकडून भारत आणि हिंदू धर्माचं तोंडभरुन कौतुक करण्यात आलं आहे. हिंदू धर्मामुळेच भारतात कट्टर इस्लामचा प्रसार होऊ शकला नाही अशी स्तुतीसुमनं ग्लोबल टाईम्सने उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला जाणार आहेत. 

ग्लोबल टाईम्समध्ये छापण्यात आलेल्या या लेखात सांगण्यात आलं आहे की, 'भारतातील हिंदू धर्मामुळे कट्टर इस्लाम आपली जागा निर्माण करु शकला नाही'. या लेखात भारतामधील हिंदू धर्माचं कौतुक करत असताना कशाप्रकारे फक्त धर्म म्हणून आपली ओळख न ठेवता हिंदू धर्माने एक जीवनशैली आणि सामाजिक व्यवस्थेचं रुप घेतलं हेदेखील सांगण्यात आलं आहे. 

या लेखाची सुरुवात 1995 रोजी रिलीज झालेल्या 'बॉम्बे' चित्रपटाच्या उल्लेखाने होते. हा चित्रपट एक मुस्लिम तरुणी आणि हिंदू तरुणावर आधारित असून, कशाप्रकारे ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि नंतर कुटंब, धर्माची बंधनं जुगारत विवाहबंधनात अडकतात हे दाखवण्यात आलं आहे. यानंतर दोघेही जातीय दंगलीत अडकतात, आणि त्यानंतर होणा-या घटना या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट 1992 च्या दंगलीवर आधारित होता. ग्लोबल टाईम्सने चित्रपटाचं उदाहरण देत, भारतात कट्टर इस्लाम आपली जागा निर्माण का करु शकला नाही याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं सांगितलं आहे. 

आशियामधील दुस-या देशांमध्ये असणा-या इस्लामिक संघटनांची संख्या पाहता भारतामध्ये अशा संघटनांची उपस्थिती जवळपास नाहीच आहे असंही लेखातून सांगण्यात आलं आहे. यावेळी फिलीपाईन्सचं उदाहरण देत, कट्टरतावाद्यांनी संपुर्ण देशाचं नुकसान केलं असल्याचं लिहिलं आहे. 

चिनी वृत्तपत्राने भारताचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 'भारतात इस्लामिक अतिरेक्यांचं अस्तिव नसल्यासारखंच आहे. आशियातील इतर देशांशी तुलना करता हीच गोष्ट भारताला उजवा ठरवते. संपुर्ण जग यासाठी भारताचं कौतूक करतं. जेव्हा कधी आशियाशी संबंधित धोरणांवर चर्चा केली जाते तेव्हा अमेरिका, रशिया, जपान आणि युरोपीय देश याच गोष्टीवरुन भारताचं महत्व लक्षात घेतात', असं लेखात सांगितलं आहे. 

टॅग्स :chinaचीनDoklamडोकलामNarendra Modiनरेंद्र मोदी