शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

हिंदू धर्मामुळे भारतात कट्टर इस्लाम फोफावला नाही, चिनी मीडियाकडून हिंदू धर्माचं कौतुक

By शिवराज यादव | Updated: August 31, 2017 15:02 IST

डोकलाम वादाला पुर्णविराम मिळाल्यानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-याआधी चीनी मीडियाने मवाळ भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली, दि. - डोकलाम वादाला पुर्णविराम मिळाल्यानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-याआधी चिनी मीडियाने मवाळ भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समकडून भारत आणि हिंदू धर्माचं तोंडभरुन कौतुक करण्यात आलं आहे. हिंदू धर्मामुळेच भारतात कट्टर इस्लामचा प्रसार होऊ शकला नाही अशी स्तुतीसुमनं ग्लोबल टाईम्सने उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला जाणार आहेत. 

ग्लोबल टाईम्समध्ये छापण्यात आलेल्या या लेखात सांगण्यात आलं आहे की, 'भारतातील हिंदू धर्मामुळे कट्टर इस्लाम आपली जागा निर्माण करु शकला नाही'. या लेखात भारतामधील हिंदू धर्माचं कौतुक करत असताना कशाप्रकारे फक्त धर्म म्हणून आपली ओळख न ठेवता हिंदू धर्माने एक जीवनशैली आणि सामाजिक व्यवस्थेचं रुप घेतलं हेदेखील सांगण्यात आलं आहे. 

या लेखाची सुरुवात 1995 रोजी रिलीज झालेल्या 'बॉम्बे' चित्रपटाच्या उल्लेखाने होते. हा चित्रपट एक मुस्लिम तरुणी आणि हिंदू तरुणावर आधारित असून, कशाप्रकारे ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि नंतर कुटंब, धर्माची बंधनं जुगारत विवाहबंधनात अडकतात हे दाखवण्यात आलं आहे. यानंतर दोघेही जातीय दंगलीत अडकतात, आणि त्यानंतर होणा-या घटना या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट 1992 च्या दंगलीवर आधारित होता. ग्लोबल टाईम्सने चित्रपटाचं उदाहरण देत, भारतात कट्टर इस्लाम आपली जागा निर्माण का करु शकला नाही याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं सांगितलं आहे. 

आशियामधील दुस-या देशांमध्ये असणा-या इस्लामिक संघटनांची संख्या पाहता भारतामध्ये अशा संघटनांची उपस्थिती जवळपास नाहीच आहे असंही लेखातून सांगण्यात आलं आहे. यावेळी फिलीपाईन्सचं उदाहरण देत, कट्टरतावाद्यांनी संपुर्ण देशाचं नुकसान केलं असल्याचं लिहिलं आहे. 

चिनी वृत्तपत्राने भारताचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 'भारतात इस्लामिक अतिरेक्यांचं अस्तिव नसल्यासारखंच आहे. आशियातील इतर देशांशी तुलना करता हीच गोष्ट भारताला उजवा ठरवते. संपुर्ण जग यासाठी भारताचं कौतूक करतं. जेव्हा कधी आशियाशी संबंधित धोरणांवर चर्चा केली जाते तेव्हा अमेरिका, रशिया, जपान आणि युरोपीय देश याच गोष्टीवरुन भारताचं महत्व लक्षात घेतात', असं लेखात सांगितलं आहे. 

टॅग्स :chinaचीनDoklamडोकलामNarendra Modiनरेंद्र मोदी