शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हार्वेचा तेलगू लोकांना फटका, प्रत्येकी सरासरी ३५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 02:36 IST

हैदराबाद : ह्युस्टनमध्ये हार्वे वादळाचा मोठा आर्थिक फटका तेथे वास्तव्यास असलेल्या तेलगू लोकांना बसला आहे. तेथील प्रत्येक तेलगू घराचे सरासरी ५० हजार डॉलरचे (३५ लाख रुपये) नुकसान झाली आहे. बहुसंख्य तेलगू लोक ग्रेटर ह्युस्टनमध्ये राहत असून, तेथील अनेक घरांची व मालमत्तेची हानी झाली आहे.अमेरिकेच्या इतिहासात हार्वे वादळ हे भयंकर नैसर्गिक ...

हैदराबाद : ह्युस्टनमध्ये हार्वे वादळाचा मोठा आर्थिक फटका तेथे वास्तव्यास असलेल्या तेलगू लोकांना बसला आहे. तेथील प्रत्येक तेलगू घराचे सरासरी ५० हजार डॉलरचे (३५ लाख रुपये) नुकसान झाली आहे. बहुसंख्य तेलगू लोक ग्रेटर ह्युस्टनमध्ये राहत असून, तेथील अनेक घरांची व मालमत्तेची हानी झाली आहे.अमेरिकेच्या इतिहासात हार्वे वादळ हे भयंकर नैसर्गिक संकट ठरले असून, त्याने टेक्सासमध्ये १६० अब्ज डॉलरची आर्थिक हानी केली आहे. या वादळाने ३८ जणांचा बळी घेतला असून, कित्येक हजार लोकांना बेघर केले आहे.अशा नैसर्गिक संकटांना विम्याचे संरक्षण मिळत नसल्यामुळे ती कुटुंबे काळजीत आहेत. या नैसर्गिक संकटाचे स्वरूपच फार मोठे होते. त्यामुळे सरकार पीडितांना काही प्रमाणात आर्थिक मदत करील अशी आशा आहे. परंतु त्याची कोणालाही खात्री कोणालाही. सध्या प्रत्येक जण जीविताची काळजी करीत आहे.कॅटी, शुगरलँड, सायप्रस आणि बेलायरमध्ये १० हजार तेलगू कुटुंबे (किमान ५० हजार लोकसंख्या) वास्तव्यास आहेत. त्या प्रत्येक कुटुंबाचे सरासरी वार्षिक उत्पन्न ७५ हजार डॉलरचे आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर्सशिवाय अनेक डॉक्टर्स व व्यावसायिकही तिथे राहतात. त्या सर्वांना पुन्हा उभे राहण्यासाठी कर्जाचाच आधार घ्यावा लागेल, कारण त्यांच्याकडे बँकांत पुरेशी बचत नाही.गेल्या बुधवारी टेक्सासच्या सीमेनजिकच्या लुईसियाना किनाºयावर हे वादळ धडकले व त्यामुळे विक्रमी असा पाऊस झाला. भयंकर हानी करणारे पूर आला. या वादळाने अमेरिकेच्या इतिहासात सर्वात मोठा पाऊस आणला. टेक्सासमध्ये गेल्या शुक्रवारी ५२ इंचाहून अधिक पाऊस पडला. टेक्सास शहरातील २० लोक अजूनही बेपत्ता आहेत. ह्युस्टन शहराचा काही भाग हा काही आठवडे किंवा काही महिन्यांसाठी राहण्यायोग्य नाही, असे अ‍ॅक्युवेदरचे अध्यक्ष जोएल मायेर्स यांनी सांगितले.टेक्सासमध्ये सुमारे एक लाख भारतीय राहतात. टेक्सासमधील सरोवराच्या पाण्यात बुडून एक भारतीय विद्यार्थी मरण पावला. पाऊस, वादळ आणि पुरामुळे त्रासलेल्या लोकांच्या मदतीला भारतीय-अमेरिकन समाज धावून आला आहे. भारतीय व्यावसायिक ठिकाणे आणि धार्मिक स्थळी अनेकांना निवारा दिला गेला आहे.