शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

राष्ट्रहितासाठी हाफिज सईद नजरकैदत - पाकिस्तान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2017 10:33 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना अमेेरिका प्रवेशबंदी केल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. हाफिज सईदला राष्ट्रहितासाठी नजरकैद ठेवले असून आम्हाला भारतासोबत युद्ध नकोय, अशी भूमिका पाकिस्तानने मांडली आहे.

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 1 -  सात मुस्लिम बहुल देशांतील नागरिकांना अमेरिका प्रवेश बंदी घालण्यात आल्यानंतर या यादीत आगामी काळात पाकिस्तानाचाही समावेश होणार असल्याचे अमेरिकेकडून देण्यात आले आहेत. यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचे पाहायला मिळत आहे.  

या पार्श्वभूमीवर 'जमात-उद-दावाचा प्रमुख आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला राष्ट्रहितासाठी नजरकैद ठेवण्यात आले असून भारतासोबत आम्हाला युद्ध करायचे नाही', अशी भूमिका पाकिस्तानी सैन्याने मांडली आहे. 'राष्ट्रहितासाठी घेण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयांतर्गत हाफिज सईदवर नजरकैदेची कारवाई करण्यात आली आहे', असे पाकिस्तानी सैन्याने मंगळवारी सांगितले.  शिवाय, आम्हाला भारतासोबत युद्ध करायचे नाही, असा दावा करतेवेळी या निर्णयाला पाकिस्तानची कमजोरी समजू नका, अशा फुशारक्याही पाकिस्ताननं मारल्या आहेत. 
 
पाकिस्तानातील इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्स (ISPR)चे डीजी मेजर जनरल आसिफ गफूर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना हे विधान केले आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्र 'डॉन'ने दिलेल्या माहितीनुसार, आसिफ गफूर यांनी हाफिज सईदला नजरकैदेत ठेवण्यामागे कोणत्याही अन्य देशांचा दबाव असल्याच्या बातम्यांना फेटाळून लावले. जमात-उद-दावाचा प्रमुख आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला सोमवारी पाकिस्तानात नजरकैदेत ठेवण्यात आले. पाकिस्तान सरकारकडून जमात-उद-दावावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
(हाफिज सईदवर विश्वासार्ह कारवाई करा, भारतानं पाकला ठणकावलं)
 
दरम्यान, आसिफ गफूर यांनी भारत-पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावासंदर्भात भाष्य करताना सांगितले की, 'आम्हाला कुणाही सोबत युद्ध नकोय. युद्ध हे कोणत्याही समस्येवरील समाधान नाही', असा सभ्यपणाचा आव आणला. मात्र याचवेळी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत 'संयुक्त राष्ट्रांच्या चर्चेच्या माध्यमातून आम्हाला काश्मीर समस्येवर तोडगा हवाय, मात्र शांततेसाठीच्या आमच्या इच्छेला कमजोरी समजण्याची चूक करू नका', अशी दुटप्पी भूमिकाही पाकिस्तानने यावेळी मांडली.
 
डॉनने दिलेल्या बातमीनुसार, आसिफ गफूर यांनी भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक कारवाईला 'ड्रामा'चा एक 'भाग' असल्याचा थयथयाट केला. शिवाय, काश्मीरच्या मुद्यावरुन जगाचे लक्ष भरकटवण्यासाठी भारत असे वागत असल्याचा कांगावाही त्यांनी केला.