शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

‘गिलगिट-बाल्टिस्तान पाकने सोडून द्यावे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2016 02:13 IST

पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान गिळंकृत केले आहे. या भूभागातून पाकिस्तान हटल्यास काश्मीर प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अमेरिकेतील एका संस्थेने म्हटले आहे.

डलास : पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान गिळंकृत केले आहे. या भूभागातून पाकिस्तान हटल्यास काश्मीर प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अमेरिकेतील एका संस्थेने म्हटले आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध रोष वाढू लागला आहे. हा भूप्रदेश व्यापक काश्मीरचा भाग समजला जातो, सध्या तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे. वॉशिंग्टन येथील गिलगिट-बाल्टिस्तान नॅशनल काँग्रेसचे संचालक सेंगे सेरिंग यांनी एका निवेदनात हे वक्तव्य केले आहे. सेरिंग यांनी म्हटले की, गिलगिट-बाल्टिस्तानमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा मुद्दा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे. हे एक चांगले पाऊल आहे. गिलगिट-बाल्टिस्तान हा प्रदेश पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवला असल्याचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने एक ठराव मंजूर करून जाहीर केलेले आहे. पाकिस्तानचे सर्व शेजारी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला या बाबीची आठवण करून द्यायला हवी. तुम्ही गिलगिट-बाल्टिस्तानात घुसखोर आहात. तुम्ही तिथून बाहेर पडल्यास काश्मीर प्रश्नाची सोडवणूक गतिमान होईल, असे पाकला ठणकावून सांगायला हवे. सेरिंग यांनी म्हटले की, गिलगिट-बाल्टिस्तान हा वादग्रस्त भूभाग आहे. त्यामुळे येथील नागरिकांना संयुक्त राष्ट्रे, श्रीनगरमधील काश्मीर सरकार आणि नवी दिल्लीतील भारत सरकार यांच्याशी थेट चर्चा करण्याचा अधिकार असायला हवा. पाकिस्तानकडून भारतीय काश्मिरात अतिरेकी कारवायांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. दहशतवाद हा पाकिस्तान सरकारच्या राजकीय धोरणाचा भाग झाला आहे. या पार्श्वभूमीवर गिलगिट-बाल्टिस्तानमधून उठत असलेल्या पाकविरोधी असंतोष महत्त्वाचा ठरतो. हा भूभाग पाकिस्तानपासून वेगळा करण्याची मागणी येथील नागरिक करू लागले आहेत. गिलगिट-बाल्टिस्तान नॅशनल काँग्रेस त्यासाठीच काम करते. (वृत्तसंस्था)