शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पाकमध्ये पूरस्थिती; मदत कार्यासाठी लष्कर तैनात

By admin | Updated: September 11, 2014 23:45 IST

देशात न भूतो पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानला बचाव आणि मदत कार्यासाठी गुरुवारी लष्कर तैनात करावे लागले. २६० नागरिकांचा बळी घेणाऱ्या या पुराचा लाखो लोकांना फटका बसला आहे.

इस्लामाबाद : देशात न भूतो पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानला बचाव आणि मदत कार्यासाठी गुरुवारी लष्कर तैनात करावे लागले. २६० नागरिकांचा बळी घेणाऱ्या या पुराचा लाखो लोकांना फटका बसला आहे. पाकिस्तानची प्रमुख नदी असलेल्या चिनाबने देशाचा कृषिकणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाब प्रांतात आधीच प्रचंड विध्वंस घडवून आणला असून, ही नदी अद्यापही दुथडी भरून वाहत आहे.मुलकी प्रशासनाने पूरस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे सांगितल्यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आले. लष्कर लोकांना वाचविण्यासाठी तसेच त्यांना अन्न व पाणी पुरविण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करत आहे. लष्कराने पाच सप्टेंबरपासून पंजाब व पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोहीम राबवून पुरामध्ये अडकून पडलेल्या २२ हजार लोकांना वाचविले. त्यांना नावा आणि हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले, असे लष्कराने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. पंजाबमध्ये दहा लाखांहून अधिक लोकांना पुराचा तडाखा बसला आहे, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले. नदीकाठाजवळील सखल भागात राहणाऱ्या दहा लाख लोकांना नावा, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. हा पूर पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात घातक पूर असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे. पाकमध्ये पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत २६० नागरिकांचा बळी गेला आहे. (वृत्तसंस्था)